शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी कुटुंबात राजकारण आणले असते तर मी अंबानींचा पार्टनर असतो, प्रल्हाद मोदींचे मत

By विकास राऊत | Updated: December 12, 2022 12:29 IST

'मी स्वस्त धान्य दुकानावरून गरिबांना धान्य कसे मिळेल, याकडे पाहतो. मोदी राष्ट्रसेवेतून जनकल्याणाचे काम करीत आहेत.’

औरंगाबाद : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आमच्या कुटुंबात राजकारण आणले असते, तर मी उद्योगपती किंवा अंबानींचा पार्टनर राहिलो असतो. परंतु, एका तत्त्वाचे संस्कार आमच्या कुटुंबावर आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा दोन वर्षांनी वडील असलेले पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कुटुंबात राजकारण आणले नाही, असे ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष व पंतप्रधानांचे लहान बंधू प्रल्हादभाई मोदी यांनी येथे सांगितले.

बुलढाणा येथे आज, १२ डिसेंबर रोजी रेशन दुकानदारांचे अधिवेशन, वर्कर्स कमिटीची बैठक होत आहे. त्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी प्रल्हादभाई, फेडरेशनचे सचिव विश्वंभर बासू शहरात आले होते. यावेळी राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे राज्याध्यक्ष डी. एन. पाटील यांची उपस्थिती होती. मोदी यांनी काही निवडक माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांचे बंधू आहात, त्यामुळे हक्काने काही बाबी सांगून त्यांच्याकडून कामे करून घेता येत असतील, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘पंतप्रधान कुटुंबात राजकारण आणत नाहीत. तसे केले असते, तर मी अंबानींचा पार्टनर राहिलो असतो. आम्ही गरीब कुटुंबातील आहोत. परिवारातून राजकारणाचा कोणताही वारसा आम्हाला नाही. नरेंद्र यांनी जे मिळविले व आज ते ज्या पदावर आहेत, ते त्यांनी स्वकर्तृत्वावर मिळविले आहे. राजकारणाचा व्यवहार करणे हे त्यांच्या तत्त्वात नाही. मी स्वस्त धान्य दुकानावरून गरिबांना धान्य कसे मिळेल, याकडे पाहतो. मोदी राष्ट्रसेवेतून जनकल्याणाचे काम करीत आहेत.’

पंतप्रधान मोदी यांच्याशी भेटीचा योग वारंवार येतो काय, यावर प्रल्हादभाई म्हणाले, ‘नाही, तसा योग येत नाही. मध्यंतरी गुजरातमधील एका पदयात्रेत स्वागतासाठी हार घेऊन गर्दीत उभा होतो. त्यावेळी त्यांनी मला जवळ बोलवून स्वागत स्वीकारले. मतदानासाठी असलेला पत्ता गुजरातमधील आहे, त्यामुळे त्यांना कुटुंबाकडे येता आले, नाहीतर त्यांनी राष्ट्रसेवेसाठी कुटुंब केव्हाच सोडले आहे.’

नीती आयोगात दोन सदस्य असावेत...देशातील रेशनदुकानदार आणि ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी नीती आयोगात फेडरेशनचे दोन सदस्य असावेत. दुकानदारांचे कमिशन वाढले पाहिजे; तसेच कार्डधारकांची संख्या वाढली पाहिजे. ५ किलो मोफत तांदूळ आणखी सहा महिन्यांनी वाढवावा. २०११ च्या जनगणनेनुसार कार्डधारकांची संख्या आहे. त्यात आताच्या लोकसंख्येनुसार वाढ झाली पाहिजे. धान्य गळती प्रती क्विंटल १ किलो मिळावी. शहरात ४८ टक्के, तर ग्रामीण भागात ७५ टक्के कार्डधारक आहेत. देशभरात ५ लाख ३६ हजार ३८ दुकाने आहेत. ई-पॉस मशीनमुळे ग्राहक व दुकानदारांत वाद होत आहेत. या सगळ्या बाबींवर फेडरेशन अधिवेशनात चर्चा करणार असल्याचे सचिव बासू व राज्य अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAurangabadऔरंगाबादprime ministerपंतप्रधान