शहरं
Join us  
Trending Stories
1
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
2
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
3
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
4
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
5
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
6
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
7
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
8
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
9
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
10
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
11
तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
12
आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात
13
IPL ला हलक्यात घेणाऱ्यांना लिलावात भाव देऊ नका! 'त्या' परदेशी खेळाडूंवर भडकले गावसकर, म्हणाले...
14
Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा
15
अलर्ट! 'या' ४ समस्या दिसल्यास त्वरित बदला तुमचा स्मार्टफोन; नाहीतर होईल मोठे नुकसान!
16
भारतासाठी गेमचेंजर ठरणार 'हा' नवा कॉरिडोर; रशियाला ४० दिवसांऐवजी आता २४ दिवसांत सामान पोहचणार
17
रुपया पुन्हा घसरला! डॉलरच्या तुलनेत ९०.११ च्या नीचांकी स्तरावर; महत्त्वाचं कारण आलं समोर
18
काश्मीरमध्ये विनापरवाना फिरताना सापडला चिनी नागरिक, फोनमधून समोर आली धक्कादायक माहिती
19
Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल
20
दुभाजक ओलांडताना धडक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; पतीसह चालक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोटापाण्यासाठी २००० विद्यार्थी शाळा सोडून उसाच्या फडात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:26 IST

वैजापूर तालुक्यात दुष्काळदाह : परजिल्ह्यात गेलेल्या मजूर आई-वडिलांची शिक्षण विभागाकडून मनधरणी

मोबीन खानवैजापूर : तालुक्यात यावर्षी दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. त्यामुळे मजुरीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या अनेक आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणापेक्षा पोटाच्या प्रश्नाला जास्त प्राधान्य दिले. त्यामुळे तालुक्यातील १६४ गावांतून जवळपास दोन हजार विद्यार्थी शाळेत गैरहजर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने कें द्र प्रमुखांमार्फ त अशा विद्यार्थ्यांची माहिती मागवून ऊसतोडीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या मजुरांची मनधरणी करून त्यांच्या मुलांना गावात परत आणायचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.तालुक्यातील मन्याड खोरे व डोंगरथडी भाग ऊसतोड कामगारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. घरातील कर्ती मंडळी ऊसतोडीला गेल्यावर ज्येष्ठ नागरिक आणि शाळेत जाणारे विद्यार्थी गावात थांबत असत. गावी राहून शिक्षण पूर्ण करायचे, मात्र गेला पावसाळा कोरडा गेला. त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले. दुष्काळी परिस्थिती असल्याने शाळेतील विद्यार्थीही कामासाठी आई-वडिलांसोबत उसाच्या फडात तोडणीसाठी गेले आहेत.जगण्याच्या संघर्षात शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ तालुक्यातील दोन हजार विद्यार्थ्यांवर आली आहे. दिवाळीच्या सुट्यांनंतर शाळा सुरू झाली; मात्र तालुक्यातील १६४ गावांतील प्रत्येक शाळेतून १५ ते २५ विद्यार्थी गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची कें द्र प्रमुख माहिती गोळा करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहेत.जि.प. शाळांची पटसंख्या रोडावलीयापूर्वीही मुले ऊसतोडीच्या हंगामात शाळेत गैरहजर राहत होती; मात्र हे प्रमाण खूप कमी होते. यावर्षी हे प्रमाण लक्षणीय आहे. दुष्काळामुळे यावर्षी विशेषत: मन्याड खोरे, डोंगरथडी व बरमळा येथील विद्यार्थ्यांनी शाळेकडे चक्क पाठ फिरवल्याने जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या रोडावली आहे. त्यामुळे मजुरीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या मजुरांची मनधरणी करण्यासाठी येथील शिक्षकांनी टीम बनवून थेट उसाच्या फडात जाऊन त्यांच्या मुलांना गावात परत आणायचे काम सुरू केले आहे. आजपर्यंत १०० पेक्षा अधिक बालके शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात शिक्षकांना यश आले आहे.हंगामी वसतिगृह सुरू कराआई-वडिलांसोबत ऊसतोडीसाठी गेलेल्या मुलांना गावात परत आणायचे काम शिक्षकांनी सुरू केले आहे; मात्र गावात आल्यानंतर या मुलांच्या जेवणाचे, राहण्याचे वांधे होत आहेत. त्यांच्यासाठी शासनाने तालुक्यात अद्याप एकही हंगामी वसतिगृह सुरू केले नाही; मात्र पोरांची आबाळ लक्षात घेऊन काही शिक्षकांनी स्वखर्चातून मुलांसाठी राहण्याची, जेवणाची व्यवस्था करून प्रशासनाच्या कारभाराला चपराक दिली आहे.शिक्षक स्वखर्चातून करताहेत विद्यार्थ्यांची सोयतालुक्यातील खंडाळा परिसरातील बरमळा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी प्रशासनाची वाट न पाहता मुलांची राहण्याची व जेवणाची स्वखचार्तून व्यवस्था केली आहे. त्यामुळे तेथील स्थलांतरित मजुरांच्या मुलांची सोय झाली आहे; परंतु या शाळेप्रमाणेच भादली, नारळा, पारळा, तलवाडा, लोणी, बिलोणी, जानेफळ, सुदामवाडीसह ५० ते ६० शाळांपुढे ही समस्या कायम आहे. त्यांना शिक्षण विभाग वसतिगृह सुरू करण्याचा आदेश कधी देणार, हा प्रश्न आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३२४ शाळा असून, त्यापैकी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत २७,७०५, नववी ते दहावीच्या वर्गात १,६६९ असे २९,३७४ विद्यार्थी आहेत. शिक्षकांनी स्वीकारली बालरक्षकाची जबाबदारीतालुक्यात विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेपेक्षा ऊसतोडीच्या कामाला प्राधान्य दिले आहे. यापूर्वीच्या शाळांच्या तुलनेत यावर्षी गैरहजर विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांनी बालरक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी ऊसतोडीसाठी गेलेल्या बालकांना यापासून परावृत्त करून शिक्षणासाठी प्रवृत्त करून शाळेच्या अंगणात आणणे सुरू केले आहे.-मनीष दिवेकर, गटशिक्षणाधिकारी

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा