शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

गुलमंडी मोकळा श्वास घेणार; सुपारी हनुमानपासून मनपाचा कारवाईचा श्रीगणेशा

By मुजीब देवणीकर | Updated: October 5, 2023 18:57 IST

मंदिरासमोरील अतिक्रमणे हटविण्याचे साहस कोणीही केले नव्हते. सर्व अतिक्रमणे हटविल्याने चारचाकी वाहनेही जाऊ लागली.

छत्रपती संभाजीनगर : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. एकाही रस्त्यावर ग्राहकांना पायी फिरणेही अशक्यप्राय ठरत आहे. बुधवारी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी गुलमंडीने मोकळा श्वास घ्यावा, यासाठी माेहीम सुरू केली. सुपारी हनुमान मंदिरासमोरील रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या फूल, भाजीपाला विक्रेत्यांना बुधवारी हटविण्यात आले. पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी दोन माजी सैनिकही नेमले.

जुन्या शहरातील अतिक्रमणांसंदर्भात ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला. नागरिकांना मुख्य रस्त्यांवरून ये-जा करताना किती त्रास सहन करावा लागतोय हे मांडण्यात आले. याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले. बुधवारी सकाळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सुपारी हनुमान मंदिरासमोरील फूल, भाजीपाला विक्रेत्यांना हटविले. साहित्य विक्रीनंतर व्यापारी रस्त्यावरच कचरा सोडून निघून जात असत. रस्त्याच्या मध्यभागी ते व्यवसाय करीत असल्याने दुचाकी वाहनही मंदिरासमोरून ये-जा करू शकत नव्हते. वर्षानुवर्षे हे अतिक्रमण होते. मंदिरासमोरील अतिक्रमणे हटविण्याचे साहस कोणीही केले नव्हते. सर्व अतिक्रमणे हटविल्याने चारचाकी वाहनेही जाऊ लागली. या भागातील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या कारवाईचे कौतुक केले. अनेक ज्येष्ठ नागरिक चारचाकी वाहनात बसून थेट मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत येत आहेत.

सर्व व्यापाऱ्यांना प्रशासनाचा इशारागुलमंडीवर बहुतांश व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर विविध साहित्य लटकवलेले आहेत. दुकानाच्या शटरपासून किमान पाच ते सात फूट अंतरापर्यंत ही अतिक्रमणे आहेत. अनेक ठिकाणी दुकानासमोर कोणी वाहने उभी करू नयेत म्हणून चक्क लोखंडी जाळ्या ठेवल्या आहेत. अशा प्रकारचे कोणतेही अतिक्रमण चालणार नाही. व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत. लवकरच पोलिस, वाहतूक पोलिस यांच्यासह मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली.

महत्त्वाचे सण जवळनवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येत आहेत. सणांमध्ये खरेदीसाठी गुलमंडीवरील प्रत्येक रस्त्यावर ग्राहकांची अलोट गर्दी असते. ग्राहकांना मुक्तपणे खरेदी करता आली पाहिजे. रस्त्यावर कोणताही अडथळा असता कामा नये. ग्राहकांना त्रास होणार नाही, याची काळजी मनपा घेणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTrafficवाहतूक कोंडी