शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 19:30 IST

Subhash Desai: क्रांती चौकातील पुलावर पडलेल्या गॅपबाबत तातडीचे निर्देश

औरंगाबाद : शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.

लोकमतने सोमवारच्या अंकात क्रांती चौक उड्डाणपुलामध्ये धोकादायक गॅप पडल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याचे पडसाद नियोजन समितीच्या बैठकीत उमटले. पालकमंत्र्यांनी क्रांती चौक पुलावर पडलेला गॅप कशामुळे आला आहे, हे तातडीने पाहण्याचे आदेश दिले.

बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींनी लोकमतमध्ये आलेले वृत्त पालकमंत्री देसाईंच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर बैठकीला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी पुलाच्या ऑडिटबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असल्याचे नमूद केले. तसेच याचिकेच्या अनुषंगाने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत असून, १० दिवसांत ते काम संपेल, असे नमूद केले.

शहर व परिसरात सहा उड्डाणपूल आहेत. यामध्ये रेल्वे स्टेशनचा आणि झाल्टा येथील उड्डाणपूल सर्वात जुना आहे. जालना रोडवर सेव्हन हिल्स येथे पहिला उड्डाणपूल बांधण्यात आला. त्यानंतर सिडको, महावीर चौक, मोंढा नाका, क्रांती चौक येथे उड्डाणपूल बांधण्यात आले. संग्रामनगर येथेही उड्डाणपूल बांधला. हे सगळे पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधले. सुमारे २०० कोटींतून हे सगळे पूल बांधले असून, या पुलांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अद्याप एमएसआरडीसी व इतर कोणतीही संस्था पुढे आलेली नाही.

हस्तांतरणाची अशी ही टोलवाटोलवीएमएसआरडीसीच्या सुत्रांनी सांगितले, क्रांती चौक आणि सेव्हन हिल येथील उड्डाणपुलाचा ’लॅबिलिटी’ काळ संपल्यामुळे ते मनपाकडे हस्तांतरित केले आहेत. सिडको, मोंढा नाका, महावीर चौकातील पुलांचा ‘लॅबिलिटी’ काळ अजून संपलेले नाही. तर मनपाच्या सुत्रांनी सांगितले, मनपाकडे एमएसआरडीसीने एकही पूल हस्तांतरित केलेला नाही. तोंडी बोलून पूल हस्तांतरित कुठे होत असतात काय, असा सवालही मनपा सुत्रांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई