शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 19:30 IST

Subhash Desai: क्रांती चौकातील पुलावर पडलेल्या गॅपबाबत तातडीचे निर्देश

औरंगाबाद : शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.

लोकमतने सोमवारच्या अंकात क्रांती चौक उड्डाणपुलामध्ये धोकादायक गॅप पडल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याचे पडसाद नियोजन समितीच्या बैठकीत उमटले. पालकमंत्र्यांनी क्रांती चौक पुलावर पडलेला गॅप कशामुळे आला आहे, हे तातडीने पाहण्याचे आदेश दिले.

बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींनी लोकमतमध्ये आलेले वृत्त पालकमंत्री देसाईंच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर बैठकीला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी पुलाच्या ऑडिटबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असल्याचे नमूद केले. तसेच याचिकेच्या अनुषंगाने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत असून, १० दिवसांत ते काम संपेल, असे नमूद केले.

शहर व परिसरात सहा उड्डाणपूल आहेत. यामध्ये रेल्वे स्टेशनचा आणि झाल्टा येथील उड्डाणपूल सर्वात जुना आहे. जालना रोडवर सेव्हन हिल्स येथे पहिला उड्डाणपूल बांधण्यात आला. त्यानंतर सिडको, महावीर चौक, मोंढा नाका, क्रांती चौक येथे उड्डाणपूल बांधण्यात आले. संग्रामनगर येथेही उड्डाणपूल बांधला. हे सगळे पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधले. सुमारे २०० कोटींतून हे सगळे पूल बांधले असून, या पुलांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अद्याप एमएसआरडीसी व इतर कोणतीही संस्था पुढे आलेली नाही.

हस्तांतरणाची अशी ही टोलवाटोलवीएमएसआरडीसीच्या सुत्रांनी सांगितले, क्रांती चौक आणि सेव्हन हिल येथील उड्डाणपुलाचा ’लॅबिलिटी’ काळ संपल्यामुळे ते मनपाकडे हस्तांतरित केले आहेत. सिडको, मोंढा नाका, महावीर चौकातील पुलांचा ‘लॅबिलिटी’ काळ अजून संपलेले नाही. तर मनपाच्या सुत्रांनी सांगितले, मनपाकडे एमएसआरडीसीने एकही पूल हस्तांतरित केलेला नाही. तोंडी बोलून पूल हस्तांतरित कुठे होत असतात काय, असा सवालही मनपा सुत्रांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई