शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

हमीभावाच्या आदेशाला ‘तुरी’!

By admin | Updated: January 23, 2017 23:32 IST

लातूर शासनाने तुरीसाठी हमीभाव केला असला, तरी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दर देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे़

हरी मोकाशे लातूरशासनाने तुरीसाठी हमीभाव केला असला, तरी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दर देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे़ लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी तुरीस कमाल भाव ५ हजार २१ रुपये मिळाला़ दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी सर्वच बाजार समित्यांना ४० ई प्रमाणे नोटिसा बजावल्या़ परंतु, या नोटिसांनाच झुगारण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने सोयाबीन, उडीद, तूर आदी शेतमालाचे चांगले उत्पन्न मिळाले आहे़ सध्या तुरीच्या राशी सुरु आहेत़ त्यामुळे ज्यांच्या राशी झाल्या ते शेतकरी सध्या बाजार समितीत तूर विक्रीसाठी आणत आहेत़ परिणामी, बाजार समितीत तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे़ लातूरच्या बाजार समितीत शेतमालास चांगला दर मिळतो, हा अनुभव अनेक शेतकऱ्यांनी घेतल्याने जिल्ह्याबरोबरच परिसरातील उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील काही शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात़ लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत परवानाधारक आडते दीड हजार असून त्यापैकी ५५० व्यवहार करतात़ तसेच ६५० पैकी जवळपास २०० खरेदीदार शेतमालाची खरेदी करतात़ तुरीची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत़ परिणामी, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ५० रुपयांपेक्षाही कमी दराने तुरीचा सौदा होत आहे़ होणारी ही लूट पाहून काही शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्याने दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा उपनिबंधक बी़एल़ वांगे यांनी जिल्ह्यातील अकराही बाजार समित्यांना ४० ई प्रमाणे नोटिसा बजावून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करु नये, असे बजावले होते़ परंतु, या नोटिसांकडे बाजार समित्यांनी दुर्लक्ष केले आहे़