शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

जीवनदाता बनण्याचा आलेख वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:59 IST

रक्तदान म्हणजे जीवनदान. अपघात असो की मोठी शस्त्रक्रिया अथवा अन्य काही आजाराप्रसंगी रुग्णांना रक्त लागतेच. गेली अनेक वर्षे अज्ञान, गैरसमजुतीमुळे रक्तदानाचे प्रमाण अंत्यत कमी होते. मात्र, जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांत कोणतीही अपेक्षा न ठेवता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, अनेकांचा जीव वाचत आहे.

ठळक मुद्देजागतिक रक्तदाता दिन : तरुणाई आघाडीवर, रक्तदानामुळे मिळतेय रुग्णांना जीवदान

संतोष हिरेमठऔरंगाबाद : रक्तदान म्हणजे जीवनदान. अपघात असो की मोठी शस्त्रक्रिया अथवा अन्य काही आजाराप्रसंगी रुग्णांना रक्त लागतेच. गेली अनेक वर्षे अज्ञान, गैरसमजुतीमुळे रक्तदानाचे प्रमाण अंत्यत कमी होते. मात्र, जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांत कोणतीही अपेक्षा न ठेवता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, अनेकांचा जीव वाचत आहे.शहराची लोकसंख्या १३ लाखांवर गेली आहे. गोरगरिबांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाºया घाटी रुग्णालयात दररोज मराठवाड्यासह लगतच्या भागातून उपचारासाठी रुग्ण दाखल होतात. शहरात खाजगी रुग्णालयांचेही जाळे मोठे आहे. येथेही उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपचारादरम्यान अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते. शहरात आजघडीला आठ रक्तपेढ्या आहेत. रक्तपेढ्यांमधून वर्षभरात ४५ ते ५० हजार बॅग रक्तसंकलन होते. शहरातील लोकसंख्येच्या काही टक्के रक्तदानाचे प्रमाण आहे. मात्र, त्यामध्ये दरवर्षी वाढ होत असल्याचे दिलासा देणारे चित्र आहे. रक्तदानाचे मूल्य ओळखून स्वेच्छा रक्तदानाविषयी समाजात जनजागृती वाढत आहे. त्यामुळे रक्तदान करणाºयांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये तरुणाई आघाडीवर आहे. शहरातील रक्तदात्यांपैकी ५० टक्के रक्तदाते हे वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करतात.पुणे-मुंबईला ज्या प्रमाणात स्वेच्छा रक्तदान होते, त्या तुलनेत शहरात रक्तदान होत नसल्याची ओरड केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढदिवसाच्या दिवशी स्वत:हून रक्तदान करण्याकडे ओढा वाढत आहे. कोणताही गाजावाजा न करता रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले जाते. त्याबरोबर विविध संस्था, संघटनांकडून नियमितपणे रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. त्यामध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.रक्तदानाचे प्रमाण वाढत असले, तरी मे, जून महिन्यांत दरवर्षी रक्ताच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते. गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्याचे आवाहन करण्याची वेळ रक्तपेढ्यांवर ओढावते. अशा वेळीही दाते रक्तदानासाठी धावून येतात. गोरगरीब रुग्णांसाठी घाटीतील विभाग रक्तपेढी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. याठिकाणी दरवर्षी १५ हजारांवर दात्यांकडून रक्तदान केले जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तसंकलनासाठी डॉ. अनिल जोशी, डॉ. सुरेश गवई, डॉ. शुभज्योती पोरे, विभागीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, सुनीता बनकर आदींकडून प्रयत्न केले जातात.एका दात्यामुळे तीन रुग्णांना जीवदानप्रत्येक निरोगी माणसाच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. गरजेपेक्षा ५०० मि.लि. जास्तीचे रक्त यकृत आणि पाणथरीमध्ये साठविलेले असते. रक्तदानाच्या वेळी ३५० मि.लि. रक्त घेतले जाते. ते रक्त ४८ तासांत भरून निघते. लालरक्तपेशी, प्लेटलेट, रक्तातील द्रव भाग आदी वेगवेगळे केले जातात. त्यामुळे एका रक्तदात्यामुळे किमान तीन रुग्णांना फायदा होतो.नागरिकांत जागृतीरक्तदात्यांमध्ये वाढ होत आहे. १५ हजारांवर रक्त पिशव्यांचे दरवर्षी संकलन होते. मे आणि जूनचा पहिला, दुसºया आठवड्यातच फक्त रक्ताचा तुटवडा असतो. नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. सामाजिक संस्था रक्तदान शिबिरे घेतात. त्यातून रक्तदानाचे प्रमाण वाढत आहे.- डॉ. शुभज्योती पोरे, सहायक प्राध्यापक, विकृतीशास्त्र विभाग, घाटी२७ हजार दात्यांचे रक्तदानहळूहळू फरक पडत आहे. रक्तदानाचे दरवर्षी प्रमाण वाढत आहे. रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर त्याचे वेगवेगळे घटक केले जातात. त्याचा रुग्णांना मोठा फायदा होतो. रक्तपेढीत गेल्या वर्षी २७ हजार दात्यांनी रक्तदान केले. यावर्षी आतापर्यंत १२ हजार दात्यांनी रक्तदान केले आहे.- डॉ. मंजूषा कुलकर्णी, वैद्यकीय संचालक, दत्ताजी भाले रक्तपेढीघाटीतील विभागीय रक्तपेढीतील स्थितीवर्ष रक्तदाते२०१७ १४,४८२२०१८ १५,२४४२०१९ (१२ जूनपर्यंत) ६,७३०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य