शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भुईमुगास ३६०० भाव

By admin | Updated: June 15, 2014 00:37 IST

हिंगोली : मागील महिन्यापासून स्थिर असलेल्या भुईमुगाच्या दराने अचानक उडी घेतली. शनिवारी सकाळी अडीच हजारांपासून सुरू झालेला लिलाव उत्तरोत्तर वाढत जाऊन ३ हजार ६०० रूपयांपर्यंत पोहोचला

हिंगोली : मागील महिन्यापासून स्थिर असलेल्या भुईमुगाच्या दराने अचानक उडी घेतली. शनिवारी सकाळी अडीच हजारांपासून सुरू झालेला लिलाव उत्तरोत्तर वाढत जाऊन ३ हजार ६०० रूपयांपर्यंत पोहोचला. भाववाढीची अपेक्षा ठेवून घरीच भुईमूग ठेवलेल्या उत्पादकांना याचा फायदा झाला. शिवाय यंदाच्या हंगामातील हा भाव सर्वोच्च असल्याचे उत्पादकांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात पेरा नगण्य असल्याने भूईमुगाचे उत्पादन कमी प्रमाणात होते. पाण्याची सुविधा असणाऱ्या उत्पादकांकडून भुईमुगाचा पेरा केला जातो. त्यातही हिवाळी भुर्ईमुगाच्या आगमनापासून उन्हाळी भुईमुगाचे प्रमाणही घटत गेले. कारण उन्हाळ्यात भरमसाठ पाणी देवूनही अपेक्षित उत्पादन निघत नाही. उत्पादन निघाले तरी भुईमुगाला रास्त भाव मिळत नाही. प्रतिवर्षीची ही स्थिती असल्याने उत्पादकांनी भुईमुगास दूर लोटल्याचे दिसते; परंतु काही प्रमाणात लागवड केलेल्या उत्पादकांनी भुईमुगास बाजार दाखविण्यास सुरूवात केली आहे. मागील महिनाभरापासून हिंगोली बाजार समितीत भुईमुगाची आवक होत आहे. पण पाऊस पडताच भुर्ईमुगाची आवक वाढली. कारण खरीप हंगामात लागणारे खत-बियाणे खरेदीसाठी भुर्ईमूग विकून पैैसा उभा करण्याचा उत्पादकांचा मानस आहे; मात्र भाव स्थिर असल्यामुळे घरीच ठेवलेल्या उत्पादकांना शनिवारी फायदा झाला. शनिवारी सकाळी २ हजार ४९० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. नेहमीपेक्षा लिलाव अधिक वाढत गेल्याने ३ हजार ६०० रूपयांपर्यंत कमाल दर गेला. पहिल्यांदाच शनिवारी भुईमुगाच्या दराने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत हिंगोली रास्तभाव मिळाल्याने उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. हिंगोली सोबतच धुळे बाजार समितीत देखील ३ हजार ६५० रूपयांचा भाव होता. त्याखालोखाल शुक्रवारी परळी वैजनाथ येथील ३ हजार ९९ रूपयांचा कमाल भाव होता. याच दिवशी साक्री बाजारपेठेतही ३ हजार ५०० रूपयांपर्यंत भाव गेला होता. जिल्ह्याशेजारी नांदेड बाजार समितीत ३ हजार २५० रूपयांपर्यंत दर मिळाला. मागील महिन्याभरापासून वाट पाहणाऱ्या उत्पादकांना उशिरा को होईना चांगला भाव मिळाला. पेरणीच्या तोंडावर वाढलेल्या दरांमुळे उत्पादकांना खत-बियाणे खरेदीसाठी फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)हिंगोली जिल्ह्यात पेरा नगण्य असल्याने भुईमुगाचे उत्पादन कमी प्रमाणात होते.पाण्याची सुविधा असणाऱ्या उत्पादकांकडून भुईमुगाचा पेरा केला जातो. गत महिनाभरापासून हिंगोली बाजार समितीत भुईमुगाची आवक होत आहे. पण पाऊस पडताच भुईमुगाची आवक वाढली आहे.प्रमुख बाजार समित्यांचे भाव कृउबा कमाल  किमान  उदगीर३ २००३०००नांदेड३ २५०३०००परळी  ३३९९२८००कोटल  ३२५०२०००अकलूज  ३२००३१५०खामगाव  २९००२४५०  किनवट  ३२००३०००धुळे  ३६००२०००कोटल  ३२५०२०००सक्री  २२००३५००श्रीरामपूर  २०००२५००