शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:33 IST

अनेकदा शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात.

उंडणगाव (औरंगाबाद ) :  लाखो रुपये किंमतीच्या जमिनीचा मालक उच्चशिक्षित असला तरीही लग्न गाठ बांधायला कुणी हो म्हणत नाही. लग्नासाठी मुलगी वाले नोकरी वाल्यांचा शोधात आहे. शेतकरी नवरदेवांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी लग्नासाठी प्रस्ताव पाठवले. पण लग्नगाठ बांधायला कुणी तयार नाही. शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई... 

शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात. तसेच गरीबातील गरीब ही नोकरी वाला नवर देव मिळावा हाच हटहास धरून बसतात. तुळशी विवाह सोहळा झाल्यावर लग्न गाठी बांधण्याची जुळवा जुळव सुरू होऊन लग्न सराईला सुरूवात होते. सनई चौघड्याचे सुर वाजण्याला सुरूवात होते. सर्वेत्र मंगलमय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

काही जणांचे जमले तर ते साखरपुड्यातच उरकून टाकण्याला मागे पुढे पहात नाही. लग्न गाठी जमवितांना सध्या मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण प्रत्येकांनी स्थळ हे नोकरी चेच पाहिजे. मग देणे कितीही मोजावे लागले तरी ते मागे न हटता लग्न जमविण्याचा प्रयत्न करतातच. शेतकरी मुलांना पसंती कमी दाखवू लागले आहेत. सगळ्यांनी शेतकरी असल्याने नकार देतात. शेतकरी नवरा नको, सरकारी नोकरी आणि तोही एखाद्या विभागात शिपाई असला तरी चालेल असे अनेक जण म्हणतात. 

...मग शेती कोण करेल शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटं आले तरी शेतकरी महिन्याला हजारो रुपये कमवितात. पण लग्न करण्यासाठी हे उत्पन्न ही पुरेसे असते. शेतकरी असल्याने अनेक मुलींनी नकार देऊन टाकतात. जे तरुण शेती करतात. त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशीच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुण शेतकऱ्यांच्या पिढीला लग्नाशिवाय काही वर्षे तसेच राहावे लागते असलेल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे तरुणांनी शेती करणं सोडून दिले तर आता आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कोण करेल, हा आकडा भविष्यात आणखी वाढेल. अशी भीती काही जाणकार शेतकऱ्यांना वाटत आहे. 

टॅग्स :marriageलग्नFarmerशेतकरीagricultureशेती