शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:33 IST

अनेकदा शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात.

उंडणगाव (औरंगाबाद ) :  लाखो रुपये किंमतीच्या जमिनीचा मालक उच्चशिक्षित असला तरीही लग्न गाठ बांधायला कुणी हो म्हणत नाही. लग्नासाठी मुलगी वाले नोकरी वाल्यांचा शोधात आहे. शेतकरी नवरदेवांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी लग्नासाठी प्रस्ताव पाठवले. पण लग्नगाठ बांधायला कुणी तयार नाही. शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई... 

शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात. तसेच गरीबातील गरीब ही नोकरी वाला नवर देव मिळावा हाच हटहास धरून बसतात. तुळशी विवाह सोहळा झाल्यावर लग्न गाठी बांधण्याची जुळवा जुळव सुरू होऊन लग्न सराईला सुरूवात होते. सनई चौघड्याचे सुर वाजण्याला सुरूवात होते. सर्वेत्र मंगलमय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

काही जणांचे जमले तर ते साखरपुड्यातच उरकून टाकण्याला मागे पुढे पहात नाही. लग्न गाठी जमवितांना सध्या मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण प्रत्येकांनी स्थळ हे नोकरी चेच पाहिजे. मग देणे कितीही मोजावे लागले तरी ते मागे न हटता लग्न जमविण्याचा प्रयत्न करतातच. शेतकरी मुलांना पसंती कमी दाखवू लागले आहेत. सगळ्यांनी शेतकरी असल्याने नकार देतात. शेतकरी नवरा नको, सरकारी नोकरी आणि तोही एखाद्या विभागात शिपाई असला तरी चालेल असे अनेक जण म्हणतात. 

...मग शेती कोण करेल शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटं आले तरी शेतकरी महिन्याला हजारो रुपये कमवितात. पण लग्न करण्यासाठी हे उत्पन्न ही पुरेसे असते. शेतकरी असल्याने अनेक मुलींनी नकार देऊन टाकतात. जे तरुण शेती करतात. त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशीच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुण शेतकऱ्यांच्या पिढीला लग्नाशिवाय काही वर्षे तसेच राहावे लागते असलेल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे तरुणांनी शेती करणं सोडून दिले तर आता आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कोण करेल, हा आकडा भविष्यात आणखी वाढेल. अशी भीती काही जाणकार शेतकऱ्यांना वाटत आहे. 

टॅग्स :marriageलग्नFarmerशेतकरीagricultureशेती