शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:33 IST

अनेकदा शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात.

उंडणगाव (औरंगाबाद ) :  लाखो रुपये किंमतीच्या जमिनीचा मालक उच्चशिक्षित असला तरीही लग्न गाठ बांधायला कुणी हो म्हणत नाही. लग्नासाठी मुलगी वाले नोकरी वाल्यांचा शोधात आहे. शेतकरी नवरदेवांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी लग्नासाठी प्रस्ताव पाठवले. पण लग्नगाठ बांधायला कुणी तयार नाही. शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई... 

शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात. तसेच गरीबातील गरीब ही नोकरी वाला नवर देव मिळावा हाच हटहास धरून बसतात. तुळशी विवाह सोहळा झाल्यावर लग्न गाठी बांधण्याची जुळवा जुळव सुरू होऊन लग्न सराईला सुरूवात होते. सनई चौघड्याचे सुर वाजण्याला सुरूवात होते. सर्वेत्र मंगलमय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

काही जणांचे जमले तर ते साखरपुड्यातच उरकून टाकण्याला मागे पुढे पहात नाही. लग्न गाठी जमवितांना सध्या मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण प्रत्येकांनी स्थळ हे नोकरी चेच पाहिजे. मग देणे कितीही मोजावे लागले तरी ते मागे न हटता लग्न जमविण्याचा प्रयत्न करतातच. शेतकरी मुलांना पसंती कमी दाखवू लागले आहेत. सगळ्यांनी शेतकरी असल्याने नकार देतात. शेतकरी नवरा नको, सरकारी नोकरी आणि तोही एखाद्या विभागात शिपाई असला तरी चालेल असे अनेक जण म्हणतात. 

...मग शेती कोण करेल शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटं आले तरी शेतकरी महिन्याला हजारो रुपये कमवितात. पण लग्न करण्यासाठी हे उत्पन्न ही पुरेसे असते. शेतकरी असल्याने अनेक मुलींनी नकार देऊन टाकतात. जे तरुण शेती करतात. त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशीच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुण शेतकऱ्यांच्या पिढीला लग्नाशिवाय काही वर्षे तसेच राहावे लागते असलेल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे तरुणांनी शेती करणं सोडून दिले तर आता आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कोण करेल, हा आकडा भविष्यात आणखी वाढेल. अशी भीती काही जाणकार शेतकऱ्यांना वाटत आहे. 

टॅग्स :marriageलग्नFarmerशेतकरीagricultureशेती