शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महापुराचा फटका ! नारेगावात दोन हजार कुटुंबियांचा दु:ख, अश्रूचा पूर थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 16:30 IST

Flood in Aurangabad : शनिवारी शहर साखरझोपेत असताना विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पावसाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देकोणाला काही कळण्यापूर्वी सुखना नदीपात्राने रौद्ररूप धारण केले. अनेक घरांमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले.

औरंगाबाद : सुखना नदीपात्राने ( Sukhana river flood ) शनिवारी पहाटे रौद्ररूप धारण केल्याने नारेगाव परिसरातील किमान दोन हजार कुटुंबांना पुराचा तडाखा बसला. अनेकांचे संसारच उघड्यावर आले. कालपासून कोणाच्याही घरात चूल पेटली नाही. आसपासच्या नागरिकांनी जे दिले, त्यावरच पोटाची खळगी भरली. शासकीय यंत्रणांकडून कोणतीही मदत नाही. माणिकनगर, पटेलनगर, आनंद गाडेनगर, अझीझ कॉलनी, बिस्मिल्लाह कॉलनीतील रहिवाशांच्या वेदना कायम आहेत. ( The grief of two thousand families in Naregaon, the flood of tears will not stop) 

सावंगी तलावासह पंचक्रोशील छोटे-छोटे तलाव, ओढ्याचे पाणी सुखना नदीपात्राला येऊन मिळते. शनिवारी शहर साखरझोपेत असताना विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पावसाला सुरुवात झाली. कोणाला काही कळण्यापूर्वी सुखना नदीपात्राने रौद्ररूप धारण केले. सर्वांत पहिला तडाखा नारेगावमधील माणिकनगर, पटेलनगर, आनंद गाडेनगर, अझीझ कॉलनी, बिस्मिल्लाह कॉलनीमधील गोरगरिबांना बसला. अनेक घरांमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले. यात गृहोपयोगी वस्तू वाहून गेल्या. अन्न-धान्य भिजले. दीड ते दोन हजार घरांमध्ये पाणीच पाणी होते. सकाळी ११ वाजेनंतर पुराचे पाणी ओसरू लागले. परंतु, शनिवारी या भागातील घरांमध्ये चूल पेटली नाही. आसपासच्या अनेक नागरिकांनी भात शिजवून आणून दिला. रविवारीही अनेक घरांमध्ये चिखलच चिखल होता. लोकांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

चिकलठाण्यात दोन पूल, भिंत पडल्याचिकलठाण्यात आठवडी बाजार येथील पूल वाहून गेला. त्यामुळे महालप्रिंप्रीकडे ये-जा करणारी वाहतूक बंद झाली. दोन घरांच्या भिंती कोसळल्या. पुराचे पाणी एक ते दोन फुटांपर्यंत घरात शिरल्याने घरात गाळ भरला. स्मशानभूमीच्या भिंती काेसळल्या. स्मशानभूमीकडे जाणारा पूलही खचला.

राजकीय नेत्यांचे पर्यटनआ. अंबादास दानवे यांनी रविवारी नारेगाव भागाला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे आ. हरिभाऊ बागडे यांनी चिकलठाणा येथील आठवडी बाजाराच्या पुलाची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे त्वरित करायला लावतो, मनपा प्रशासनाकडून खचलेले पूल पुन्हा बांधून घेण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादfloodपूर