शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे मोठे यश ! जीवन गुणवत्तेत शहर देशामध्ये १३ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 11:40 IST

Ease of Living Index केंद्र शासनाकडून २०१८ पासून सर्वेक्षणाला सुरुवात

ठळक मुद्दे औरंगाबादचे जीवनमान चंदीगड, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड, जयपूरपेक्षा चांगलेराहण्यायोग्य शहरांच्या यादीत औरंगाबाद ३४ व्या क्रमांकावर

औरंगाबाद : केंद्र सरकारकडून राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची यादी गुरुवारी दुपारी (इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स) जाहीर करण्यात आली आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा क्रमांक मागील वर्षी ६३ वा होता. अवघ्या वर्षभरात शहराने गरुड झेप घेत ३४ वे स्थान मिळविले. अत्यंत भूषणावह बाब म्हणजे नागरिकांच्या जीवन गुणवत्तेत शहराने चक्क १३ वे स्थान पटकावले.

''इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स'' पहिल्यांदा २०१८ मध्ये जारी करण्यात आला होता. या सर्वेक्षणात प्रशासन, शिक्षण, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या अनेक गोष्टींच्या आधारावर प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे गुणवत्ता, आर्थिक योग्यता, विकासाची स्थिरता या तीन गोष्टींचा विचार मुख्यत्वे केला जातो. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा, स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक कुणाल कुमार आणि राहुल कपूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वेगवेगळ्या शहरांची क्रमवारी घोषित करण्यात आली.

औरंगाबादला इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्समध्ये एकूणच ३४ वा क्रमांक मिळाला आहे, जो नाशिक, रांची आणि जबलपूरसारख्या शहरांपेक्षा उच्च आहे. औरंगाबादची जीवनमान गुणवत्ता चंदीगड, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि जयपूरसारख्या शहरांपेक्षा चांगली आहे. औरंगाबादचा सिटी स्कोअर ५२.९० आहे, जी सरासरी स्कोअर ५२.३८ च्या सिटी स्कोअरपेक्षा चांगला आहे. नगरपालिका कामगिरी निर्देशांकात औरंगाबाद १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ४७ व्या क्रमांकावर आहे. मुनिसिपल परफॉर्मन्स इंडेक्सचे परिणाम जाहीर करण्यात आले. यात औरंगाबादने देशात ४७ वा क्रमांक मिळवला. शहराने गव्हर्नन्स या निकषात चांगली कामगिरी केली आहे.

शहराची रँकिंग अत्यंत उत्साहवर्धककेंद्र शासनाने घोषित केलेल्या रँकिंगबद्दल बोलताना मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, रँकिंग उत्साहवर्धक आहे आणि हे दाखवत आहे की मागच्या वर्षात मनपा, स्मार्ट सिटी आणि अन्य संस्थांद्वारे चांगले काम झालेले आहे. शहरातील विकासकामांचा वेग असाच कायम राहिला तर पुढच्या वर्षी यापेक्षा चांगल्या परिणामांची अपेक्षा करू शकतो.

सर्वेक्षणात कोणकोणत्या गोष्टींना महत्त्वसर्वेक्षणात संस्थात्मक (इन्स्टिट्यूशनल), सामाजिक (सोशल), आर्थिक (इकॉनॉमिक) आणि भौतिक सुविधा (फिजिकल) असे चार प्रमुख निकष तपासले जातात. त्याचप्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार निर्मिती, वाहतूक, गृहनिर्माण, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण, वीजवापर, सार्वजनिक मोकळ्या जागा अशा इतर पूरक निकषांवर प्रमुख शहरांची काटेकोर तपासणी करण्यात येते. त्यासाठी, संबंधित शहरातील काही नागरिकांशी संवाद साधण्यात येतो. नागरिकांकडून ऑनलाइन स्वरूपातही शहरातील राहणीमानाच्या दर्जाविषयी त्यांची मते जाणून घेण्यात येतात. या सर्व माहितीचे विश्लेषण केल्यानंतर राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची क्रमवारी निश्चित केली जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका