शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीला विधानसभेत जमले; ग्रामपंचायतीत का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 13:53 IST

Gram Panchayat Election : या निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या तरीही पक्षीय कार्यकर्तेच पॅनलच्या माध्यमातून आपापले अस्तित्व सिद्ध करतात.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांमुळे नेते व नेत्यांमुळे कार्यकर्ते रिंगणातआगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर डोळानिकालानंतर मित्रपक्ष एकत्र येण्याची शक्यता

- योगेश पायघन

औरंगाबाद : राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्रितपणे महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेत आले. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांचे कार्यकर्ते अजूनही आपला वेगळा झेंडा घेऊन फिरत असल्याने महाविकास आघाडी बहुतांंश ठिकाणी दिसत नाही. शेवटी पुढाऱ्यांनाही कार्यकर्त्यांच्या इच्छा आकाक्षांपुढे जाता येत नसल्याने नाइलाज झाल्याने कार्यकर्त्यांच्या कलाने घ्यावे लागत आहे.

जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. २०९० प्रभागात होणाऱ्या निवडणुकीत ११ हजार ४९९ उमेदवार रिंगणात असून, दोन हजार ४७ केंद्रांवर यासाठी मतदान होणार आहे. पाच हजार ५४८ उमेदवारांनी माघार घेतली असून, ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काही ग्रामपंचायतींत काही जागा बिनविरोध झाल्याने मोजक्या जागांसाठी चुरशीची लढाई पहायला मिळत आहे. गावात आमच्या पक्षाचे, गटाचे प्राबल्य असल्याचे सिद्ध करण्याचा खटाटोप लक्षात घेता कार्यकर्त्यांत झुंज रंगली आहे. अनेक नेत्यांनी गाव पातळीवर सलोख्यासाठी एकत्र येऊन बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले होते. मात्र, कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वाटा सुकर करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे अनेक नवखेही रिंगणात उतरल्याचे चित्र आहे.

या निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्या तरीही पक्षीय कार्यकर्तेच पॅनलच्या माध्यमातून आपापले अस्तित्व सिद्ध करतात. कुठे काॅंग्रेस, कुठे सेना तर कुठे राष्ट्रवादी तर कुठे भाजप वरचढ आहे. बिनविरोध झालेल्या ३५ ग्रामपंचायतींतही आपल्या गटाच्या त्यात किती ग्रामपंचायती आहेत याचे दावे करताहेत. मात्र, जिथे निवडणुका होत आहेत, तेथेही आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारावी यासाठी नेतेमंडळी गुंतलेले असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती सध्या ओस पडल्या आहेत. शिवसेनेकडून ३० टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी असल्याचे सांगण्यात आले, तर राष्ट्रवादी बहुतांश ठिकाणी शिवसेनेसोबत तर अनेक ठिकाणी काॅंग्रेससोबत आणि काही ठिकाणी महाविकास आघाडीत लढत असल्याचे चित्र आहे.

कार्यकर्त्यांमुळे नेते व नेत्यांमुळे कार्यकर्ते रिंगणातयापूर्वी शेवटची निवडणूक विधानसभेची झाली. काॅंग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढले; मात्र, शिवसेना भाजप विरोधात लढले. तिरंगी लढतीत विधानसभा चुरशीची झाली. त्याचा वचपा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काढण्याचा प्रयत्नही सुरू आहे. या वचप्याच्या नादात सत्तेतील सध्याचे मित्रपक्षच एकमेकांविरोधात उभे असल्याचे चित्र अनेक गावांतून दिसून येत आहे. यात कुठे नेते तर कुठे कार्यकर्ते जोर लावताना दिसून येत आहे.

निकालानंतरही अडचणअनेक ठिकाणी मित्रपक्षातच लढती होत आहेत, तर थेट भाजपशीही काही ग्रामपंचायतींत थेट लढत होत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही अनेक गावांत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांत सलगीचे चिन्हे नाहीत. भाजपच्या पॅनलमध्येही मित्रपक्षांतील सदस्य दिसून येत असल्याने गावाच्या राजकारणात आघाडी बिघाडीचा संबंध दिसून येत नसल्याचेही समोर येत आहे.

निकालानंतर मित्रपक्ष एकत्र येतीलजिल्ह्यात शिवसेनेकडून ३० टक्के गावात महाविकास आघाडी केलेली आहे. ५० टक्के ग्रामपंचायतीत स्वबळावर लढत आहोत. निकालानंतरही मित्रपक्ष बऱ्याच ठिकाणी एकत्र येतील. त्यामुळे महाविकास आघाडीला काही अडचण नाही. काही ठिकाणी गावचे स्थानिक राजकारणी असल्याने तिथे स्वतंत्र लढल्या जात आहे.- आमदास अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

एका विचाराचे लोक एकत्र येऊ शकतातप्रत्येक नेत्याला वाटते आपली ग्रामपंचायत ताब्यात यावी; पण ते प्रत्यक्ष प्रचारात नसतात. ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय चिन्हावर लढल्या जात नाही. गावातले पुढारी एकत्र येऊन पॅनल करून त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवतात. एका विचाराचे लोक एकत्र येऊ शकतात. मात्र, शंभर टक्के पक्षनिहाय काम ग्रामपंचायतीत काम चालत नाही.- कल्याण काळे, जिल्हाप्रमुख, कॉंग्रेस

आघाडीवर परिणाम होणार नाहीबहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना सोबत लढत आहे. अनेक ठिकाणी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र आहे. फुलंब्री, गंगापूर, कन्नडमध्ये महाविकास आघाडीचे चित्र अधिक आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे. ते गावातील कार्यकर्ते आणि पुढाऱ्यांचा निर्णय आहे. मात्र, याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही.- कैलास पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक