शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

धरणासाठी घर दिलेल्या ग्रामस्थाची खंडपीठात धाव

By admin | Updated: April 7, 2015 01:28 IST

औरंगाबाद : अंजना मध्यम प्रकल्पासाठी शासनाने पळशी बुद्रुक (ता. कन्नड) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच सुमारे तीनशे ते साडेतीनशे घरे संपादित केली होती. शासनाने संपादित जमिनीचा मावेजा दिला.

औरंगाबाद : अंजना मध्यम प्रकल्पासाठी शासनाने पळशी बुद्रुक (ता. कन्नड) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच सुमारे तीनशे ते साडेतीनशे घरे संपादित केली होती. शासनाने संपादित जमिनीचा मावेजा दिला. मात्र, ग्रामस्थांना त्यांच्या घराचे अनुदान अद्याप दिलेले नाही. त्यामुळे एका गावकऱ्याने खंडपीठात याचिका दाखल करून अनुदान देण्याचे निर्र्देश शासनाला द्यावेत, अशी विनंती केली आहे. याचिकाकर्ता छगन देवराव गायकवाड यांच्यासह सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे लोकांची घरे आणि शेतजमीन अंजना मध्यम प्रकल्पासाठी १९९४ मध्ये शासनाने संपादित केली. शेतजमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना देण्यात आला. गावकऱ्यांचे चांगले पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या घरांच्या किमतीनुसार शासन त्यांना अनुदान देत असते. याचिकाकर्त्यांनी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडे अनुदान मिळावे, यासाठी अर्ज दाखल केला. त्यांनी शपथपत्रावर स्पष्ट नमूद केले की, कलम १८ नुसार शासनाकडे वाढीव मावेजासाठी अर्ज केलेला नाही. तसेच कलम २८ अ भूसंपादन कायद्याप्रमाणे कारवाई केलेली नाही. मात्र, अद्याप त्यांना पुनर्वसन अनुदान मिळालेले नाही. अधिकारी पुनर्वसन अनुदानाची रक्कम देण्यासंदर्भात टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे त्यांनी अ‍ॅड. प्रमोद कुलकर्णी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर २५ मार्च रोजी सुनावणी झाली असता, न्यायालयाने जिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी जायकवाडी प्रकल्प-१, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांना नोटीस बजावली आहे. याचिकेची सुनावणी २२ एप्रिल रोजी ठेवली आहे.