शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन होणार आता बँकेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 18:43 IST

राज्यभरातील जवळपास २८ हजार ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने थेट कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना वेतन अदा करताना ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा हस्तक्षेप थांबणार आहे. 

ठळक मुद्देग्रामविकास विभागाच्या वतीने या कर्मचार्‍यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय ६ जानेवारीला घेण्यात आला आहे.या योजनेंतर्गत बँकेमार्फत ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनप्रणाली विकसित करण्यात येणार असून, कर्मचार्‍यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे.

- शेख महेमूद औरंगाबाद : राज्यभरातील जवळपास २८ हजार ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने थेट कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना वेतन अदा करताना ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा हस्तक्षेप थांबणार आहे. 

ग्रामविकास विभागाच्या वतीने या कर्मचार्‍यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय ६ जानेवारीला घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करारनामा करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बँकेमार्फत ग्रामपंचायत कर्मचारी आॅनलाईन वेतनप्रणाली विकसित करण्यात येणार असून, कर्मचार्‍यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. ग्रामसेवकांमार्फत कर्मचार्‍यांची सर्वंकष माहिती या वेतनप्रणालीवर भरून ही माहिती गटविकास अधिकार्‍यांकडून प्रमाणित केली जाणार आहे. कर्मचार्‍यांच्या वेतन देयकातील शासनाचा हिस्सा संबंधित ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या व उत्पन्नाच्या आधारावर संगणकाद्वारे अंतिम करण्यात येणार आहे.

या वेतनप्रणालीमध्ये ग्रामपंचायत, तालुका व जिल्हानिहाय ताळमेळाचे अहवाल संगणकाद्वारे बँकेमार्फत राज्यस्तरीय प्रशासक, राज्य प्रकल्प संचालक, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, पुणे यांना व जिल्हानिहाय ताळमेळाचा अहवाल संबंधित जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरीय प्रशासक म्हणून ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांकडे जबाबदारी राहणार आहे.

पदाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपाला लगामपूर्वी शासनाकडून वेतनासाठी प्राप्त झालेले अनुदान काही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी तात्काळ कर्मचार्‍यांना देण्यास टाळाटाळ करीत होते. कर्मचार्‍यांच्या वेतनाचा निधी पदाधिकारी इतर कामांसाठी खर्च करीत असल्यामुळे कर्मचार्‍यांना वेतनाअभावी हलाखीचे जीवन जगावे लागत होते. आता सरळ बँक खात्यावर कर्मचार्‍यांचे वेतन जमा होणार असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांचा हस्तक्षेप थांबणार असून, मनमानी कारभारावर लगाम लागेल. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची वेतनाअभावी होणारी हेळसांड थांबवून त्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने बँक खात्यावर जमा करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश गायके, जिल्हाध्यक्ष उमेश जाधव, सचिन नाना इंगळे तसेच इतर कर्मचारी संघटनांची जिल्हा परिषद तसेच ग्रामविकास मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता.            

१ लाख कर्मचार्‍यांना लाभमहाराष्ट्रात जवळपास २७ हजार ७७५ ग्रामपंचायती असून, त्यात  जवळपास १ लाखाच्या वर  कर्मचारी काम करतात. या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, या आदेशावर राज्य शासनाचे सचिव असीम गुप्ता यांची स्वाक्षरी आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसा