शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
2
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
3
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
4
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
5
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
6
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
7
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
9
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
10
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
12
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
13
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
14
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
15
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
16
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
17
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
18
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
19
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
20
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद

आश्रमशाळांमधील १५ हजार कर्मचाऱ्यांचा "जीपीएफ" निघेना, आर्थिकसह मानसिक ताण वाढला

By राम शिनगारे | Updated: April 19, 2024 19:43 IST

अनेक कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नात आर्थिक अडचणी

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्याय विभागातून इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे वर्ग केलेल्या ९७७ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील तब्बल १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना पगारासह हक्काचे भविष्य निर्वाह निधीचे (जीपीएफ) पैसे काढता येत नाहीत. त्यासाठी तांत्रिक कारणे देण्यात येत आहेत. मात्र, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न, घर बांधकाम, शिक्षणाचे वांधे झाले आहेत. याविषयी प्रहार शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी संघटनेने विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांना निवेदनाद्वारे तोडगा काढण्याची मागणी केली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्थापना झाल्यानंतर या विभागाकडे समाजकल्याण विभागातील अनेक शाळांसह आस्थापना वर्ग करण्यात आल्या. वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांचा विभाग बदलल्यामुळे त्यांना जीपीएफसह परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनांचा (डीसीपीएस) नवीन सांकेतांक मिळालेला नाही. हा सांकेतांक मिळाल्यानंतरच संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जीपीएफची रक्कम पाठवता येणार नाही. सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या घरी लग्नसमारंभ आयोजित केले जात आहेत. त्या कार्यक्रमांसाठी हक्काचे जीपीएफमधून कर्मचारी पैसे काढत असतात.

मात्र, सध्या जीपीएफसाठी अर्ज केल्यानंतर कोषागार कार्यालयाकडे प्रस्ताव गेल्यावर त्याठिकाणी नवीन सांकेतांक मिळेपर्यंत पैसे मिळणार नसल्याचे स्पष्ट केले जात आहे. प्रहार शिक्षक संघटनेने चार महिन्यांत वेळोवेळी त्याकडे विभागाचे लक्ष वेधले आहे. नुकतेच पुण्यातील विभागाच्या संचालकांना प्रहारचे राज्य समन्वयक विजय धनेश्वर, जिल्हा कार्याध्यक्ष पंकज काळे, पवन डोभाल, गोविंद लहाने, शिवाजी घुगे आदींनी निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

यावेळी जयंती, ईदला वेतन झालेच नाहीआश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. निधी वितरण प्रणाली (बीडीएस) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण दिले जात आहे. विशेष म्हणजे शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, रमजान ईदनिमित्त आगाऊ वेतन करावे लागते. मात्र, दोन्ही सण होऊन गेले, तरीही वेतन झालेले नाही.

मानसिकसह आर्थिक ताणकर्मचाऱ्यांच्या जीपीएफ, डीसीपीएसचा सांकेतांक हा मंत्रालय पातळीवर दिला जातो. चार महिने उलटले तरी तो अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिकसह आर्थिक ताणातून जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ शिक्षकांच्या मागण्या मंजूर कराव्यात.- विजय धनेश्वर, राज्य समन्वयक, प्रहार शिक्षक संघटना

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTeacherशिक्षक