शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

सरकारने बेवारस दिव्यांगांची जबाबादारी घेतल्यावरच पुरस्कार स्वीकारेन - शंकरबाबा पापळकर

By admin | Updated: July 16, 2017 19:33 IST

दुर्लक्षीत या दिव्यांगांना जोपर्यंत केंद्र व राज्य सरकार त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विशेषगृहात राहण्याचा, त्यांच्या पुर्नवसनाचा कायदा करीत नाही, तोपर्यंत

 प्रशांत तेलवाडकर/ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 16 -  वयाच्या १८ वर्षपूर्ण झाले की, दरवर्षी देशभरातील एक लाख बेवारस दिव्यांगांना सरकारच्या विशेषगृहातून हकलून देते. ते कसे जगणार याचा विचारही केला जात नाही. दुर्लक्षीत या दिव्यांगांना जोपर्यंत केंद्र व राज्य सरकार त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विशेषगृहात राहण्याचा, त्यांच्या पुर्नवसनाचा कायदा करीत नाही, तोपर्यंत मी कोणताही पुरस्कार स्विकारणार नाही, असे दृढनिश्चिय सेवाव्रती शंकरबाबा पापळकर यांनी येथे व्यक्त केला. १२३ दिव्यांगांचे पालकत्व स्विकारलेले सेवाव्रती शंकरबाबा पापळकर यांनी तिनदा पद्मश्री पुरस्कार नाकारला. याशिवाय विविध सामाजिक संस्थांनी जाहीर केलेले पुरस्कारही त्यांनी स्विकारले नाहीत. अमरावती जिल्ह्यातील ओझर येथील स्व.अंबादासपंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहाचे संस्थापक असलेले पापळकर कामाच्या निमित्ताने रविवारी शहरात आले होते. ह्यलोकमतह्णशी बोलताना पापळकर यांनी बेवारस दिव्यांगाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त केली. मात्र, दिव्यांगाचे प्रश्नकडे समाज डोळसपणे पाहू लागला आहे, समाजामध्ये हा सकारात्मक बदल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. साधी राहणी असलेले पापळकर हे आता ७६ वर्षांचे आहेत. त्यांच्या संस्थेत १९९० ते १९९५ या पाचवर्षात १२३ बेवारस दिव्यांग मुल-मुली आश्रयाला आले होते. त्यात अंध,मुकबधीर,अपंग,मतिमंदांचा समावेश होता. या १२३ दिव्यांगांच्या आधारकार्डवर पिता म्हणून शंकरबाबा पापळकर यांचे नाव आहे. शंकरबाबा या दिव्यांगांमध्ये एवढे समरस झाले आहे की, कामानिमित्ताने राज्यात कुठेही ते गेले तरी तिथे एक दिवसापेक्षा ते जात राहू शकत नाही. एवढा त्यांना या दिव्यांग मुला-मुलींचा लळा लागला आहे. शंकरबाबा म्हणाले की, १२३ पैकी १४ दिव्यांग औरंगाबादेतील आहेत. ज्यांना बालन्यायालयाच्या आदेशाने आमच्या संस्थेत आश्रयाला पाठविण्यात आले. हे मुल-मुली जेव्हा संस्थेत आली तेव्हा अवघे १ वर्ष ते ५ वर्ष वयोगटातील होते. त्यातील १९ दिव्यांग मुलींचे लग्न लावण्यात आली. तर १२ मुलांना शासकीय नोकरी मिळाली आहे. जे मतीमंदपणाच्या बॉर्डरवर आहेत, अशा मतिमंद तरुणींचे लग्न आम्ही लावून दिले. मुकबधीर तरुणींचे लग्नही लावून दिले.शंकरबाबा म्हणाले की, या दिव्यांगांना त्यांचे आई-वडीलांनी सोडून दिले, भाऊ विचारत नाही. लग्न लावल्यावर समजा पुढे पतीने विचारले नाही पण पोटची मुल त्यांचा सांभाळकरतील. सलमा नावाच्या मतिमंद मुलीचे २००३ मध्ये लग्न लावून दिले. आज तिला एक सृदृढ मुलगा, मुलगी आहे ते शाळेत जातात व आपल्या आईची काळजी घेतात. दिव्यांगांनी संस्थेच्या परिसरात १५ हजार झाडे लावली आहेत. एवढेच नव्हे तर सर्व दिव्यांग एकामेकांची जीवापाड काळजी घेतात, हे सुद्धा शंकरबाबा यांनी अभिमानाने सांगितले. संस्थेत ९० दिव्यांग असे आहेत की, त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत त्यांना सांभाळणार आहे ते सुद्धा कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, असा निर्धारही शंकरबाबांनी व्यक्त केला.