शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कर्जमाफीत सेनेने सरकार झुकविले

By admin | Updated: June 27, 2017 01:05 IST

औरंगाबाद : राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर जरी केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर जरी केले असले, तरी ही आकडेवारी फसवी वाटू नये, यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याची यादी शासनाने प्रकाशित केली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचे मोजून घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. कर्जमाफीला फॅशन समजणाऱ्या, शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणून त्यांची हेटाळणी करणाऱ्यांना शिवसेनेने झुकविल्याचे म्हणत ठाकरे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना टीकेचे लक्ष्य बनविले.समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते औरंगाबादेत आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत कर्जमाफीवर अभ्यासगट स्थापन करून जून २०१७ पर्यंत कर्जमाफीची मागणी त्यांनी केली. कर्जमाफीच्या जाहिरातींमधून शिवसेनेला डावलले. भाजपने श्रेय लाटण्यात आघाडी घेतली. यावर ठाकरे म्हणाले, भाजपला सांगावे लागते, आम्हाला सांगावे लागत नाही. मी सरकारवर आरोप करीत नाहीये. सरकारने जी आकडेवारी दिली आहे, त्यामध्ये कुणाचीही फसगत होऊ नये, ही अपेक्षा आहे. जून २०१६ नंतरच्या कर्जाचे नवीनीकरण शेतकऱ्यांनी करून घेतले आहे. जवळपास ६० टक्के कर्ज जुन्याचे नवे झाले आहे. सरकार फक्त आकडेवारी सांगत आहे, यावर आपले मत काय आहे? ठाकरे म्हणाले, शेतकरी सुखावत असताना नोटाबंदीचा फटका त्याला बसला. रोखीचा तुटवडा झाला, जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचा पैसा अडकला. बँकेत घोटाळा झाला असेल तर घोटाळेबाजांना लटकवा. बँकेच्या माध्यमातून बसलेली ग्रामीण घडी विस्कटली.