शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

१ जूनचे आंदोलन सरकार पुरस्कृत; शेतकरी सुकाणू समितीच्या रघुनाथ पाटील यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 13:23 IST

कोणत्याही शेतकरी संघटनांना विचारात न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर १ ते १० जूनदरम्यान देशव्यापी आंदोलन काही संघटनांनी पुकारले आहे.

ठळक मुद्दे या आंदोलनाच्या माहितीपत्रकापासून सर्व रसद सरकारने पुरवली आहे.

औरंगाबाद : कोणत्याही शेतकरी संघटनांना विचारात न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर १ ते १० जूनदरम्यान देशव्यापी आंदोलन काही संघटनांनी पुकारले आहे. ज्यांनी वर्षभरापूर्वी सरकारशी हातमिळवणी करून शेतकरी आंदोलनाचा फज्जा उडविला तेच लोक हे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या माहितीपत्रकापासून सर्व रसद सरकारने पुरवली आहे. हे आंदोलन म्हणजे सरकार पुरस्कृत आहे, असा गंभीर आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने रघुनाथ पाटील यांनी केला आहे. 

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची राज्यव्यापी बैठक मंगळवारी औरंगाबादेत झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत १ जूनपासून होऊ घातलेल्या शेतकरी आंदोलनावर कडाडून टीका करण्यात आली. यावेळी ‘जय किसान आंदोलन स्वराज अभियान’चे सुभाष लोमटे, शेतकरी संघटनेचे कालिदास आपटे, सत्यशोधक शेतकरी-कष्टकरी परिषदेचे किशोर ढमाले, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले आदींची उपस्थिती होती.  रघुनाथ पाटील म्हणाले की, राजा कोणी उठतो व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतो. आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिला आहे. मात्र, रस्त्यावर दूध फेकून देणे, दूध फुकट वाटप करणे, भाज्या रस्त्यावर फेकून देणे हे चुकीचे आहे.

१० दिवस पालेभाज्या अन्य शेतीमालाचा पुरवठा बंद करण्याची ताकद आंदोलनकर्त्यांमध्ये आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा आंदोलनाने काही साध्य होत नाही. यात शेतीमालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांनाच फटका बसतो. सुकाणू समितीची भूमिका आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या चळवळीतील सर्व संघटनांना विश्वासात घेऊन देशव्यापी आंदोलन केले तरच ते यशस्वी होऊ शकते. १ जूनपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाला सुकाणू समितीचा पाठिंबा नाही. आम्ही फक्त शुभेच्छा देणार आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी आसाराम पाटील लहाने, नामदेव गावंडे, राजू देसले, गणेश जगताप, अंकुश देशमुख, विवेक रणदिवे, बाळासाहेब पठारे आदींची उपस्थिती होती. 

१२ जून रोजी आंदोलन सुभाष लोमटे म्हणाले की, शेतीमाल आयातीच्या सरकार धोरणाविरोधात १२ जून रोजी सुकाणू समितीच्या वतीने मुंबई मंत्रालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर  ‘सोसायटी बचाव, शेतकरी बचाव’ राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी हिंगोली येथे राज्यव्यापी शेतकरी परिषद घेण्यात येणार असल्याचे लोमटे यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंपAgriculture Sectorशेती क्षेत्र