शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

१ जूनचे आंदोलन सरकार पुरस्कृत; शेतकरी सुकाणू समितीच्या रघुनाथ पाटील यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 13:23 IST

कोणत्याही शेतकरी संघटनांना विचारात न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर १ ते १० जूनदरम्यान देशव्यापी आंदोलन काही संघटनांनी पुकारले आहे.

ठळक मुद्दे या आंदोलनाच्या माहितीपत्रकापासून सर्व रसद सरकारने पुरवली आहे.

औरंगाबाद : कोणत्याही शेतकरी संघटनांना विचारात न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर १ ते १० जूनदरम्यान देशव्यापी आंदोलन काही संघटनांनी पुकारले आहे. ज्यांनी वर्षभरापूर्वी सरकारशी हातमिळवणी करून शेतकरी आंदोलनाचा फज्जा उडविला तेच लोक हे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या माहितीपत्रकापासून सर्व रसद सरकारने पुरवली आहे. हे आंदोलन म्हणजे सरकार पुरस्कृत आहे, असा गंभीर आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने रघुनाथ पाटील यांनी केला आहे. 

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची राज्यव्यापी बैठक मंगळवारी औरंगाबादेत झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत १ जूनपासून होऊ घातलेल्या शेतकरी आंदोलनावर कडाडून टीका करण्यात आली. यावेळी ‘जय किसान आंदोलन स्वराज अभियान’चे सुभाष लोमटे, शेतकरी संघटनेचे कालिदास आपटे, सत्यशोधक शेतकरी-कष्टकरी परिषदेचे किशोर ढमाले, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले आदींची उपस्थिती होती.  रघुनाथ पाटील म्हणाले की, राजा कोणी उठतो व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतो. आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिला आहे. मात्र, रस्त्यावर दूध फेकून देणे, दूध फुकट वाटप करणे, भाज्या रस्त्यावर फेकून देणे हे चुकीचे आहे.

१० दिवस पालेभाज्या अन्य शेतीमालाचा पुरवठा बंद करण्याची ताकद आंदोलनकर्त्यांमध्ये आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा आंदोलनाने काही साध्य होत नाही. यात शेतीमालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांनाच फटका बसतो. सुकाणू समितीची भूमिका आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या चळवळीतील सर्व संघटनांना विश्वासात घेऊन देशव्यापी आंदोलन केले तरच ते यशस्वी होऊ शकते. १ जूनपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाला सुकाणू समितीचा पाठिंबा नाही. आम्ही फक्त शुभेच्छा देणार आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी आसाराम पाटील लहाने, नामदेव गावंडे, राजू देसले, गणेश जगताप, अंकुश देशमुख, विवेक रणदिवे, बाळासाहेब पठारे आदींची उपस्थिती होती. 

१२ जून रोजी आंदोलन सुभाष लोमटे म्हणाले की, शेतीमाल आयातीच्या सरकार धोरणाविरोधात १२ जून रोजी सुकाणू समितीच्या वतीने मुंबई मंत्रालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर  ‘सोसायटी बचाव, शेतकरी बचाव’ राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी हिंगोली येथे राज्यव्यापी शेतकरी परिषद घेण्यात येणार असल्याचे लोमटे यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंपAgriculture Sectorशेती क्षेत्र