शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहांना बारा वर्षांपासून दुरुस्तीची प्रतीक्षा; एखाद्याचा जीव गेल्यास जाग येणार का?

By विजय सरवदे | Updated: April 16, 2024 18:38 IST

किलेअर्क परिसरात एक हजार विद्यार्थी क्षमतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे.

छत्रपती संभाजीनगर : मागील बारा वर्षांपासून किलेअर्क परिसरातील शासकीय वसतिगृहांची दुरुस्तीच झालेली नाही. वसतिगृहांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी अनेकदा जखमीही झाले आहेत. दरम्यान, समाजकल्याण विभागाने बांधकाम विभागाच्या सहकार्याने अडीच कोटींचा सुधारित प्रस्ताव पुणे येथील आयुक्त कार्यालयाकडे सादर केला; मात्र तो चार महिन्यांपासून प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत पडून आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यावरच समाजकल्याण आयुक्तालयास जाग येणार आहे का, असा सवाल आता विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

किलेअर्क परिसरात एक हजार विद्यार्थी क्षमतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे. तेथील इमारतीत वसतिगृहांचे पाच युनिट चालतात. काही महिन्यांपासून तेथे मुलांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याचे शुद्धीकरण यंत्र (फिल्टर) सातत्याने नादुरुस्त होते. खोल्यांचे दरवाजे, खिडक्या, काचा, कडीकोयंडे तुटलेले आहेत. जानेवारीमध्ये दोन नंबरच्या युनिटमध्ये ‘बी-२१’ या खोलीत अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर छताच्या स्लॅबचे तुकडे कोसळले. या घटनेत तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी समाजकल्याण प्रशासनाचे दुरवस्थेकडे लक्ष वेधले.

दरम्यान, वसतिगृहाचे पाचही युनिट सन २०११ पासून वापरात आहेत. आता जवळपास १३ वर्षांचा कालावधी होत आला असून, वसतिगृहाची डागडुजी करणे गरजेचे आहे. यामुळेच समाजकल्याण विभागाच्या स्थानिक प्रशासनाने इमारतींची तपासणी करून दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार बांधकाम विभागाने अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव समाजकल्याण आयुक्तालयाकडे सादर केला होता. मात्र, त्यात काही त्रुटी असल्यामुळे तो प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे परत आला. बांधकाम विभागाने त्रुटींची पूर्तता करून सुधारित प्रस्ताव पाठविला; पण तो आजपर्यंत आयुक्तालयातच रखडला आहे. आता निवडणूक आचारसंहितेनंतरच जून-जुलैमध्ये त्यास मुहूर्त मिळू शकेल, असा अंदाज प्रशासनाने लावला आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटला लागला मुहूर्तपदमपुरा परिसरात वसतिगृहासाठी १९६२ मध्ये बांधण्यात आलेली एक इमारत २५० विद्यार्थिनी क्षमतेची, तर लागून १९८२ मध्ये उभारण्यात आलेली दुसरी तीन मजली इमारत १७५ विद्यार्थिनी क्षमतेची आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वीच या दोन्ही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून, या इमारती विद्यार्थिनींसाठी राहण्यायोग्य नसल्याचा अभिप्राय बांधकाम विभागाने दिला आहे. त्यानुसार सध्या एक वसतिगृह किरायाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय