शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

शासन निर्देशांकडे कानाडोळा; पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 19:27 IST

आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. त्यामुळे ही व्याजवसुली आवश्यक असल्याची भूमिका जिल्हा बँकेने घेतली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या स्पष्ट निर्देशांकडे जिल्हा बँकांचा जाणीवपूर्वक कानाडोळा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात दोन मंत्री

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद :  शासनाच्या स्पष्ट निर्देशांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून जिल्हा बँका व्याजवसुलीवर भर देत आहेत. त्यामुळे शेतकरी नवीन पीक कर्जापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. त्यामुळे ही व्याजवसुली आवश्यक असल्याची भूमिका जिल्हा बँकेने घेतली आहे. विशेष म्हणजे, यासाठी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेण्यात आला. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार आहेत. शासनातील दोन मंत्री संचालक असतानाही शासनाच्या निर्णयाविरुद्ध ठराव करून त्याची अंमलबजावणी सुरू केली, हे आश्चर्यकारक आहे. याच संचालक मंडळात हरिभाऊ बागडे यांच्यासारखे विधानसभा सभापती राहिलेले व जुने जाणते नेतेही आहेत. सहकार खात्याचे काही जबाबदार अधिकारीही संचालक मंडळात असतात, तरीही असा ठराव मंजूर व्हावा, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शासनाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीच्या लाभाची रक्कम अद्याप  जमा  झालेली नाही, अशाप्रकरणी संबंधित लाभार्थ्यास थकबाकीदार न  मानता खरीप २०२० साठी पीक कर्ज देण्याच्या स्पष्ट सूचना आहेत, तसेच संबंधितांकडून यादीनुसार येणे असलेली रक्कम शासनाकडून   देय दर्शवावी व  शेतकऱ्यांना पीक  कर्जापासून वंचित ठेवू नये, असे बजावले आहे. 

... तरीही व्याज वसुली चालूच महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना आॅक्टोबर-२०१९ पासून देय असतानाही बँकांमार्फत व्याजवसुली होत आहे. योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांच्या पात्र थकीत  रकमेवर १ आॅक्टोबर २०१९  ते  योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत  जिल्हा बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याज आकारणी करू नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. तरीही व्याजवसुली चालूच आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँकAurangabadऔरंगाबाद