शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

शासन निर्देशांकडे कानाडोळा; पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 19:27 IST

आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. त्यामुळे ही व्याजवसुली आवश्यक असल्याची भूमिका जिल्हा बँकेने घेतली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या स्पष्ट निर्देशांकडे जिल्हा बँकांचा जाणीवपूर्वक कानाडोळा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात दोन मंत्री

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद :  शासनाच्या स्पष्ट निर्देशांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून जिल्हा बँका व्याजवसुलीवर भर देत आहेत. त्यामुळे शेतकरी नवीन पीक कर्जापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. त्यामुळे ही व्याजवसुली आवश्यक असल्याची भूमिका जिल्हा बँकेने घेतली आहे. विशेष म्हणजे, यासाठी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेण्यात आला. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार आहेत. शासनातील दोन मंत्री संचालक असतानाही शासनाच्या निर्णयाविरुद्ध ठराव करून त्याची अंमलबजावणी सुरू केली, हे आश्चर्यकारक आहे. याच संचालक मंडळात हरिभाऊ बागडे यांच्यासारखे विधानसभा सभापती राहिलेले व जुने जाणते नेतेही आहेत. सहकार खात्याचे काही जबाबदार अधिकारीही संचालक मंडळात असतात, तरीही असा ठराव मंजूर व्हावा, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शासनाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीच्या लाभाची रक्कम अद्याप  जमा  झालेली नाही, अशाप्रकरणी संबंधित लाभार्थ्यास थकबाकीदार न  मानता खरीप २०२० साठी पीक कर्ज देण्याच्या स्पष्ट सूचना आहेत, तसेच संबंधितांकडून यादीनुसार येणे असलेली रक्कम शासनाकडून   देय दर्शवावी व  शेतकऱ्यांना पीक  कर्जापासून वंचित ठेवू नये, असे बजावले आहे. 

... तरीही व्याज वसुली चालूच महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना आॅक्टोबर-२०१९ पासून देय असतानाही बँकांमार्फत व्याजवसुली होत आहे. योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांच्या पात्र थकीत  रकमेवर १ आॅक्टोबर २०१९  ते  योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत  जिल्हा बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याज आकारणी करू नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. तरीही व्याजवसुली चालूच आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँकAurangabadऔरंगाबाद