शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

लाचखोरांवर सरकार मेहरबान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:43 IST

राज्यात भ्रष्टाचार निर्मूलनाचा गाजावाजा होत असला तरी, शिक्षा होऊनही लाचखोर अधिकारी, कर्मचा-यांवर सरकार मेहरबान असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देराज्यातील ३० अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कृपा : शिक्षा होऊनही बडतर्फीची कारवाई नाही

भागवत हिरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यात भ्रष्टाचार निर्मूलनाचा गाजावाजा होत असला तरी, शिक्षा होऊनही लाचखोर अधिकारी, कर्मचा-यांवर सरकार मेहरबान असल्याचे स्पष्ट झाले आहे.लाच घेतल्याच्या विविध प्रकरणांत ३० जणांना न्यायालयाने कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली; पण या लाचखोरांवर अद्याप बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे भ्रष्टाचार करणा-यांना चांगले दिवस असल्याचे ‘एसीबी’च्या आकडेवारीतून दिसत आहे.सर्वसामान्यांची कामे करून देण्यासाठी लाच घेणाºया अधिका-यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी कारवाई करून अटक केली होती.यात राज्यभरातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचा-यांचा समावेश आहे. यात लाच घेतल्याप्रकरणी ३० जण दोषी आढळल्याने स्थानिक न्यायालयांनी त्यांना तुरुंगवासासह दंडाची शिक्षा ठोठावली; मात्र वर्ष उलटून गेल्यानंतरही ३० अधिकारी, कर्मचा-यांवर बडतर्फीची कारवाईच झालेली नाही.‘एसीबी’ने या संदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पारदर्शक आणि भ्रष्टाचाराची चीड असणा-या प्रशासनाच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सापळ्यातील आरोपी बिनधास्तलाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांची संख्याही शंभरीपार आहे.च्एसीबीने सापळा प्रकरणात १२१ जणांविरुद्ध कारवाई केली आहे; मात्र त्यांच्यावरही प्रशासन दयाळू झाल्याची परिस्थिती आहे. १२१ जणांचे अद्यापही निलंबन केले नसल्याचे एसीबीच्या आकडेवारीतून समोर आले.मालमत्ता गोठविण्याचे प्रस्ताव धुळीतच्लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या राज्यभरातील आजी-माजी अधिका-यांच्या मालमत्ता गोठविण्याचे प्रस्ताव ‘एसीबी’ने शासनाकडे पाठविले आहेत.च्१६ जणांच्या मालमत्ता गोठविण्याचे प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडले आहेत.गृहविभाग अव्वलगृहविभागात सर्वाधिक १० जणांना शिक्षा झालेली आहे, तर त्यापाठोपाठ महसूल ४, सार्वजनिक आरोग्य ४, ऊर्जा, वन विभाग प्रत्येकी २, तर ग्रामविकास, नगरविकास, म्हाडा, समाजकल्याण, विधि व न्याय, आदिवासी, राज्य उत्पादन शुल्क, कृषी विभागातील प्रत्येकी एका जणाला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालय