शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

गोसंवर्धन केंद्राला मूर्तरूप मिळेना

By admin | Updated: August 7, 2014 01:28 IST

कंधार: गऊळ येथे बळीराजाला आर्थिक आधार व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली़

कंधार: गऊळ येथे बळीराजाला आर्थिक आधार व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली़ परंतु त्याला अद्याप मूर्तरूप मिळाले नसल्याने मन्याड खोऱ्यासह लगतच्या जिल्ह्यातील बळीराजाची उपेक्षा चालूच असल्याने शेतकरी-पशुपालकांतून संताप व्यक्त केला जात आहे़मन्याड खोऱ्यातील लालकंधारी पशुधन आकाराने बांधेसुद, डौलदार, आकर्षक, मजबूत व देखणे आहे़ चपळ, सालस, हुशार आणि शेतीसाठी उपयुक्त आहेत़ पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील तत्कालीन अधिष्ठाता गफूर आणि माजी खा़ व आ़ डॉ़ भाई केशवराव धोंडगे यांनी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला़ आणि लालकंधारी जात ही इतर जातीपेक्षा भिन्न असल्याची मान्यता मिळविली़ त्यानंतर या पशुधनाची व्याप्ती वाढावी, पशुपालकांना शेतीसाठी जोडधंदा व्हावा, आर्थिक स्तर वाढावा, यासाठी लालकंधारी गोसंवर्धन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली़ १९८७ साली गऊळ येथे केंद्र स्थापन करण्यात आले़ लालकंधारी गोसंवर्धन केंद्र हे सतत समस्येचा सामना करत राहिले़ जमिनीचा प्रश्न, वर्ग-३ चे कर्मचारी निवासस्थान, पाणीप्रश्न, खावटी अनुदान आदीमुळे केंद्र व बळीराजा पेचात सापडला़ लालकंधारी पशुधनाचे संगोपन करणाऱ्या बोरी, उमरज, कारतळा, हासूळ, गऊळ, पोखर्णी, पानशेवडी, उमरगा, वाखरड, मसलगा, आंबुलगा, फुलवळ, हरबळ, वहाद, भोजूचीवाडी, घागरदरा, मुंडेवाडी, जांभूळवाडी आदी गावच्या पशुपालकांनी संगोपन केले़ परंतु केंद्राअभावी हाती निराशाच आली़ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या लालकंधारी नर पशुधनाची जोडी ८० ते ९० हजाराला बाजारात विक्री होते़ गायीची प्रजनन क्षमता व दुधासाठी वरदान असलेले पशुधन शासनाच्या उदासीनतेमुळे केंद्राचे स्वरूप बदलले असून नाव सोनूबाई़़़ अशी अवस्था झाली आहे़ केंद्र आता उपचारापुरते उरले आहे़लालकंधारी पशुधनातून शेतीसाठी जोडधंदा तेजीत राहिला असता़ गोवसंवर्धन नसल्याने शेतीचे नुकसान झाले तर आर्थिक उभारी घेता आली असती़ मार्चमध्ये गारपीट झाली़ आता पावसाळा असूनही शिवाराचा उन्हाळा शिल्लक झाला आहे़ (वार्ताहर)१९८८ ला सुरु झाले केंद्रतत्कालीन मुख्यमंत्री कै़शंकरराव चव्हाण यांनी १९८८ ला केंद्राचे उद्घाटन केले़ केंद्राची व्याप्ती गऊळसह, घागरदरा, पानशेवडी, आंबुलगा, कंधारेवाडी, सोमठाणा, सावरगाव, हरबळ होती़ त्यामुळे पशुपालकाच्या आनंदाला पारावार उरला नाही़ आनंदाला आलेली भरती दीर्घकाळ टिकू शकली नाही़ नवीन पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन झाले़ आणि गऊळचे केंद्र गऊळ, भोजूचीवाडी, फुलवळ, मुंडेवाडी, सावरगाव, हरबळ, घागरदरा गावापुरते मर्यादित राहिले़