शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

गोसंवर्धन केंद्राला मूर्तरूप मिळेना

By admin | Updated: August 7, 2014 01:28 IST

कंधार: गऊळ येथे बळीराजाला आर्थिक आधार व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली़

कंधार: गऊळ येथे बळीराजाला आर्थिक आधार व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली़ परंतु त्याला अद्याप मूर्तरूप मिळाले नसल्याने मन्याड खोऱ्यासह लगतच्या जिल्ह्यातील बळीराजाची उपेक्षा चालूच असल्याने शेतकरी-पशुपालकांतून संताप व्यक्त केला जात आहे़मन्याड खोऱ्यातील लालकंधारी पशुधन आकाराने बांधेसुद, डौलदार, आकर्षक, मजबूत व देखणे आहे़ चपळ, सालस, हुशार आणि शेतीसाठी उपयुक्त आहेत़ पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील तत्कालीन अधिष्ठाता गफूर आणि माजी खा़ व आ़ डॉ़ भाई केशवराव धोंडगे यांनी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला़ आणि लालकंधारी जात ही इतर जातीपेक्षा भिन्न असल्याची मान्यता मिळविली़ त्यानंतर या पशुधनाची व्याप्ती वाढावी, पशुपालकांना शेतीसाठी जोडधंदा व्हावा, आर्थिक स्तर वाढावा, यासाठी लालकंधारी गोसंवर्धन केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली़ १९८७ साली गऊळ येथे केंद्र स्थापन करण्यात आले़ लालकंधारी गोसंवर्धन केंद्र हे सतत समस्येचा सामना करत राहिले़ जमिनीचा प्रश्न, वर्ग-३ चे कर्मचारी निवासस्थान, पाणीप्रश्न, खावटी अनुदान आदीमुळे केंद्र व बळीराजा पेचात सापडला़ लालकंधारी पशुधनाचे संगोपन करणाऱ्या बोरी, उमरज, कारतळा, हासूळ, गऊळ, पोखर्णी, पानशेवडी, उमरगा, वाखरड, मसलगा, आंबुलगा, फुलवळ, हरबळ, वहाद, भोजूचीवाडी, घागरदरा, मुंडेवाडी, जांभूळवाडी आदी गावच्या पशुपालकांनी संगोपन केले़ परंतु केंद्राअभावी हाती निराशाच आली़ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या लालकंधारी नर पशुधनाची जोडी ८० ते ९० हजाराला बाजारात विक्री होते़ गायीची प्रजनन क्षमता व दुधासाठी वरदान असलेले पशुधन शासनाच्या उदासीनतेमुळे केंद्राचे स्वरूप बदलले असून नाव सोनूबाई़़़ अशी अवस्था झाली आहे़ केंद्र आता उपचारापुरते उरले आहे़लालकंधारी पशुधनातून शेतीसाठी जोडधंदा तेजीत राहिला असता़ गोवसंवर्धन नसल्याने शेतीचे नुकसान झाले तर आर्थिक उभारी घेता आली असती़ मार्चमध्ये गारपीट झाली़ आता पावसाळा असूनही शिवाराचा उन्हाळा शिल्लक झाला आहे़ (वार्ताहर)१९८८ ला सुरु झाले केंद्रतत्कालीन मुख्यमंत्री कै़शंकरराव चव्हाण यांनी १९८८ ला केंद्राचे उद्घाटन केले़ केंद्राची व्याप्ती गऊळसह, घागरदरा, पानशेवडी, आंबुलगा, कंधारेवाडी, सोमठाणा, सावरगाव, हरबळ होती़ त्यामुळे पशुपालकाच्या आनंदाला पारावार उरला नाही़ आनंदाला आलेली भरती दीर्घकाळ टिकू शकली नाही़ नवीन पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन झाले़ आणि गऊळचे केंद्र गऊळ, भोजूचीवाडी, फुलवळ, मुंडेवाडी, सावरगाव, हरबळ, घागरदरा गावापुरते मर्यादित राहिले़