शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

मोबाइल कंपन्यांचं ‘चांगभलं’; दररोज ‘डेटा’ वापरण्याची सक्तीच; न वापरलेला ‘पॅक’ जातो कुठे?

By संतोष हिरेमठ | Updated: March 18, 2024 15:29 IST

‘माझा डेटा, माझा अधिकार’ नाहीच, मोबाइलचा ‘डेटा’ होतो छुमंतर !

छत्रपती संभाजीनगर : एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर तिचा वापर कधी करायचा, याचा संपूर्ण अधिकार ग्राहकांना असतो. परंतु मोबाइलचा ‘डेटा’ खरेदी केल्यानंतरही त्यावर ग्राहकांचा म्हणजे मोबाइलधारकांचा अधिकारच नसल्याची परिस्थिती आहे. कारण रिचार्ज मारल्यानंतर दररोज ठरावीक डेटा वापरण्याची जणू सक्तीच होतेय. हा डेटा वापरला नाही तर तोही ‘छुमंतर’ होत असल्याची परिस्थिती आहे.

विविध कंपन्या, खासगी ऑपरेटर्सकडून वेगवेगळ्या रकमेचे रिचार्ज प्लॅन दिले जातात. यात काॅलिंग, एसएमएस आणि ‘डेटा’चा समावेश असतो. दररोज एक जीबी, दीड जीबी, दोन जीबी, अशा प्रकारे ‘डेटा’चा वापर करण्याचे रिचार्ज प्लॅनमध्ये नमूद केलेले असते. यानुसार वापर झाला नाही तर शिल्लक ‘डेटा’ पुढच्या दिवशी, पुढच्या रिचार्जमध्ये समावेश का केला जात नाही, अथवा ग्राहकाला एकाच वेळी महिन्याचा ‘डेटा’ वापरण्याची मुभा का दिली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही कंपन्या शिल्लक ‘डेटा’ आठवड्याच्या शेवटी वापरण्यासाठी देतात, असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, आठवड्याच्या शेवटी नाही तर ग्राहकांनी खरेदी केलेला ‘डेटा’ त्यांना कधीही वापरता आला पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे.

अशी आहे ‘डेटा’ची स्थिती? एका कंपनीचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन दररोज २ जीबी डेटा दिला जातो. त्यासाठी २८ दिवसांची मुदत दिली जाते. यानुसार मोबाइलधारकास ५६ जीबी ‘डेटा’ वापरण्यास मिळतो. पण दररोज २ जीबी ‘डेटा’ यानुसारच वापरण्याची सक्ती केली जाते. अनेक मोबाइलधारकांचा ‘डेटा’ वापर कमी असतो. दररोज वापरण्याच्या अटीने त्यांचा ‘डेटा’ एकप्रकारे गायबच होत असल्याची परिस्थिती आहे. मोबाइलधारकांना ५६ जीबी ‘डेटा’ केव्हाही वापरता आला पाहिजे, त्यांचा शिल्लक ‘डेटा’ पुढे ‘कॅरी फाॅरवर्ड’ झाला पाहिजे, अशी मागणी मोबाइलधारकांकडून होत आहे.

ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेतातशिल्लक ‘डेटा’ पुढे कायम राहावा. एक तर ‘डेटा’चे रेट अवाढव्य आहेत. त्यातही त्याचा वापर झाला तर तो इतरांना विकण्याचाच प्रकार खासगी ऑपरेटर्सकडून होत आहे. ग्राहकांचा उरलेला ‘डेटा’ पुढे कायम राहिला पाहिजे. रोजच्या रोज वापरण्याची सक्ती नसावी. त्याबरोबर रिचार्जचा कालावधी २८, ५६ दिवस असे न राहता पूर्ण महिन्यानुसार असावा. परंतु खासगी ऑपरेटर्स ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नफा मिळवीत आहेत.- दीपक जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकाॅम एम्प्लाॅइज, बीएसएनएल

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलInternetइंटरनेट