शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

शुभ वार्ता ! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ३१ कंपन्या सुरू करणार विविध उद्योग

By बापू सोळुंके | Updated: December 8, 2023 13:05 IST

कृषी उत्पादक कंपन्यांना शासनाकडून त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के अनुदान मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरे कृषी तंत्रज्ञान योजना (स्मार्ट)अंतर्गत जिल्ह्यातील ३२ कृषी उत्पादक कंपन्या त्यांच्याच गावांत स्वत:चे विविध उद्योग उभारणार आहे. कृषी उत्पादक कंपन्यांना शासनाकडून त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांची कृषी उत्पादक कंपनी स्थापन करावी, या कंपनीच्या शेतीपूरक उपक्रमांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या समूहाला आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या विविध योजना आहेत. ज्या शेतकरी उत्पादक कंपनीची मागील तीन वर्षांची उलाढाल चांगली आहे, अशा कंपन्यांना शासनाकडून स्वत:चा कृषीपूरक उद्योग उभारण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी तंत्रज्ञान योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४३ कंपन्यांचे अर्ज कृषी विभागाच्या ‘आत्मा’च्या उपसंचालक कार्यालयास प्राप्त झाले होते. या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर आत्मा कार्यालयाच्यावतीने सर्व प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत ४० कंपन्यांचे प्रस्ताव कृषी आयुक्तालयास मंजुरीसाठी पाठविले होते.

यावर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ३१ कृषी कंपन्यांच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे कृषी आयुक्तालयांकडून जिल्ह्यातील ३१ कृषी उत्पादक कंपन्यांच्या उद्योग उभारणीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती आत्माचे उपसंचालक बी. एस. तौर यांनी दिली. ते म्हणाले की, प्रत्येक कंपनीमध्ये सुमारे २५०हून अधिक सभासद आहेत. शिवाय या कंपन्यांनी पशुखाद्य तयार करणे, धान्य स्वच्छता प्रतवारी युनिट उभारणे, कांदा, आले, हळद, सुकवणी उद्योग उभारणे, मुरघास उद्योगासाठी मशिनरी खरेदी करून शेड उभारणे, फळे प्रक्रिया उद्योग, पशुखाद्य, गोदाम, आटा मील आणि दाल मील उभारणे, गोदाम अवजारे बँक उभारणे आदी प्रकारच्या उद्योगाचे प्रस्ताव यात आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनीचा ४० टक्के वाटाएकूण प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के रक्कम शेतकरी उत्पादक कंपनीला जमा करावी लागते. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. ज्या कंपनीची आर्थिक कुवत चांगली आहे, अथवा बँका ज्या कंपनीला कर्ज देण्यास तयार आहे, अशा कंपन्यांच्याच प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. मंजूर प्रस्तावांपैकी काही कंपन्यांचे प्रस्ताव ५ कोटींहून अधिक रकमेचे आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्नFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र