शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

औरंगाबादकरांसाठी खुशखबर; ३१ मार्चपर्यंत मिळणार 5G सेवा

By बापू सोळुंके | Updated: October 3, 2022 19:47 IST

केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

औरंगाबाद : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतीची सुरूवात झाली असून, पहिल्या टप्प्यात देशातील १३ शहरांमध्ये फाईव्ह जी मोबाइल सेवेला सुरूवात झाली. ३१ मार्चपर्यंत औरंगाबाद शहरात फाईव्ह जी मोबाइल सेवेला सुरूवात होईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी केली.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर असोसिएशन (सीएमआयए)च्या वतीने सोमवारी ‘डेस्टिनेशन मराठवाडा’ या कार्यक्रमाचे आयोजन जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री वैष्णव बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, माजी खासदार राजकुमार धूत, उद्योजक एन. के. गुप्ता, राम भोगले, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांच्यासह विविध उद्योजक, सीएमआयए, मसिआ आणि जिल्हा व्यापारी महासंघ, इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधानांनी दिलेल्या ‘टार्गेट’मुळे आपल्या अभियंत्यांनी फोर जी, फाईव्ह जी तंत्रज्ञान विकसित केले. पहिल्या टप्प्यात १३ शहरांमध्ये फाईव्ह जी सेवा सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२३पर्यंत २०० शहरांमध्ये फाईव्ह जी सेवेला सुरूवात होणार असून, यात औरंगाबादचा समावेश आहे. लातूर येथे रेल्वे बोगी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ महिन्यांत या प्रकल्पातून रेल्वेच्या कोचच्या उत्पादनाला सुरूवात होईल. ऑरिकसह येथील उद्योगांच्या क्षमतेचा विचार करून देशात येणाऱ्या उद्योगांना ऑरिक एक चांगला पर्याय आहे. उत्सव माछर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी सीएमआयए सचिव अर्पित सावे, उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, सौरव भोगले, अथर्वेशराज नंदावत यांनी पुढाकार घेतला.

प्रास्ताविकात सीएमआयएचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता आणि येथील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी येथे डिजिटल डेटा सेंटर उभारण्याची मागणी केली. येथील ऑटोमोबाईल इंडस्ट्री सर्वोत्तम काम करत असल्याने हाय स्पीड रेल्वेचा प्रकल्प आल्यास या क्षेत्रात ‘बूम’ येईल, असे सांगितले. शिवाय पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशीपवर काम करण्याचा इंडस्ट्रीला अनुभव आहे. यामुळे पीपीपी मॉडेलवरील प्रकल्पावरही काम करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद5G५जी