शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पशूसंवर्धनच्या जागेवरुन जिल्हा परिषदेत गदारोळ

By admin | Updated: August 26, 2014 23:55 IST

परभणी: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला.

परभणी: जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिंतूर येथील पशूसंवर्धन विभागाच्या जागेवर बीओटी तत्वावर पंचायत समितीची इमारत व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान उभारण्याच्या कारणावरुन जोरदार गदारोळ झाला. जिल्हा परिषदेची मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अध्यक्षा मीनाताई बुधवंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा सुरु झाली. या सर्व साधारण सभेत सर्वाधिक चर्चा ही जिंतूर येथील पशूसंवर्धन विभागाच्या जागेवरुनच झाली. सदरील जागेवर जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत समितीची इमारत व कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यासाठी सर्व्हे नं.१४६ मध्ये बीओटी तत्वावर बांधकाम करण्यासाठी निविदा काढण्यास मंजुरी देण्यासंबंधी ठरावावर चर्चा झाली. सत्ताधाऱ्यांनी हा ठराव मंजूर करुन घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालविले. त्याला काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. या प्रकरणी राष्ट्रवादीकडून लक्ष्मण मुंडे, रामेश्वर जावळे, दादासाहेब टेंगसे, जगन्नाथ जाधव यांनी तर काँग्रेसकडून मेघना बोर्डीकर, आत्माराम पवार यांनी बाजू मांडली. याच विषयावरुन या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. याच दरम्यान, राज्याच्या कृषी, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभागाचे अव्वर सचिव प्रा.प्र.वसईकर यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे मुंबईहून पत्र पाठविण्यात आले. त्यामध्ये आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी २५ आॅगस्ट रोजी दिलेल्या पत्राचा संदर्भ देऊन सर्व्हे नं.१४६ मधील जागेच्या सात-बारा उताऱ्यावर सदर जागा जनावरांच्या दवाखान्यासाठी आहे. या प्रकरणी या प्रस्तावाची छाननी करण्यासंदर्भात तसेच कार्यवाहीस स्थगिती देण्याचे आदेश पशूसंवर्धन मंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सुरु झालेली सर्वसाधारण सभा सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास संपली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये याच विषयावर प्रमुख सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या वादावादीत अधिकारीही चांगलेच संतापल्याचे दिसून आले. रात्री ८ वाजेपर्यंत या विषयावर चर्चा सुरुच होती. (प्रतिनिधी)जि.प.ची शेवटची सर्वसाधारण सभा ?सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कालावधी सप्टेंबरमध्ये संपत आहे. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. याच दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा ही विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची सर्वसाधारण सभा होती़ त्यामुळे विविध प्रस्ताव मंजूर करुन घेण्याची घाई या सर्वसाधारण सभेतून झाली असल्याचेही समजले.