शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

गोदेने पात्र सोडले; वैजापूर, गंगापूर तालुक्यात महापुराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:16 IST

वहन क्षमता सव्वालाख, आवक ३ लाख क्युसेक

ठळक मुद्दे: वैजापूर, गंगापुरातील गावांना बसणार फटका; प्रशासनाची कसोटी

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने गोदावरी पात्रात होणारा विसर्ग रविवारी २ लाख ६२ हजार १५० क्युसेक, अशा मोठ्या क्षमतेने वाढविण्यात आला.  गोदावरी पात्राची वहन क्षमता सरासरी १ लाख २५ हजार क्युसेक आहे. त्यामुळे सध्या गोदावरीत महापूरजन्य परिस्थिती असून, अनेक ठिकाणी नदी पात्र सोडून वाहत आहे. वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील गोदावरी काठावरील गावांना याचा फटका बसणार आहे. सोमवारी अधिक गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार असल्याने प्रशासाची  कसोटी लागणार आहे.

रविवारी सकाळी जायकवाडी धरणात ७५,४१६ क्युसेक क्षमतेने आवक होत होती. धरणात येणारी आवक तासातासाला वाढत असल्याने सोमवारपासून धरणात जवळपास दीड ते दोन लाख क्युसेक आवक अपेक्षित असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी धरणात १८% जलसाठा झाला होता. सोमवारी सकाळपर्यंत २५% जलसाठा होण्याची अपेक्षा आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्यातील करंजवन ४८ मि.मी., वाघाड ७८ मि.मी., ओझरखेड ४० मि.मी., पालखेड ४१ मि.मी., गंगापूर १९५ मि.मी., गौतमी १५० मि.मी., कश्यपी १३३ मि.मी.,  कडवा ८५ मि.मी., दारणा ८७ मि.मी., भावली २३३ मि.मी., मुकणे ७३ मि.मी., नाशिक ९५ मि.मी., त्र्यंबकेश्वर ३१५ मि.मी., इगतपुरी २२० मि.मी., घोटी १४२ मि.मी. अशा जबरदस्त पावसाची नोंद झाली.  रविवारी सकाळपासून पुन्हा  नाशिक जिल्ह्यात  पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तेथील धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील दारणा धरणातून ३९,२५० क्युसेक, कडवा धरणातून १६,२२० क्युसेक व गंगापूर धरणातून ४५,४८६ क्युसेक, पालखेड धरणातून ५७,७०६ क्युसेक, विसर्ग रविवारी दुपारपासून वाढविण्यात आला. 

या सर्व धरणांचे पाणी नांदूर-मधमेश्वर वेअरमध्ये येत असल्याने, नांदूर-मधमेश्वर वेअरमधून रविवारी दुपारी ३ वाजता २ लाख क्युसेक क्षमतने गोदावरी पात्रात विसर्ग वाढविण्यात आला. गोदावरी पात्राची वहन क्षमता सरासरी १,२५,००० क्युसेकची असून, क्षमतेपेक्षा जास्त विसर्ग वाढविण्यात आल्याने महापुराचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे. गोदावरीच्या पुराचा फटका नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यांतील अनेक गावांना बसला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणाची पाणीपातळी १,५०१.५९ फूट झाली होती, तर धरणात १,१०९.२६७ दलघमी (३९.१६ टीएमसी) एकूण जलसाठा झाला असून, यापैकी ३७१.१६१ दलघमी (१३.१० टीएमसी ) जिवंत जलसाठा झाला आहे. धरणात रविवारी सायंकाळी १८% जलसाठा झाला होता. 

अहमदनगर जिल्ह्यातील विसर्ग जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात गत आठवड्यापासून जोरदार पाऊस होत आहे. नगर जिल्ह्यातील धरणाचा जलसाठा चांगला झाल्याने तेथील धरणातून आज मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. भंडारदरा धरणातून निळवंडेत २१,३५७ क्युसेक असा विसर्ग होत असून, ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात २,१२१ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. शनिवारी भंडारदरा १६० मि.मी., निळवंडे ३५ मि.मी., वाकी १९८ मि.मी., अशा पावसाची नोंद झाली. पाऊस झाल्यामुळे सोमवारी सकाळी प्रवरेच्या पात्रात २० ते २५ हजार क्युसेक असा विसर्ग करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. हे पाणीसुद्धा लवकरच जायकवाडीत दाखल होईल. जायकवाडी धरणात यंदा ६०६.७२ दलघमी  (२१.४२ टीएमसी) पाण्याची आवक झाली आहे. गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीपातळीत २.३४ फुटांनी वाढ झाली असून, जलसाठ्यात ७% वाढ झाली आहे.

जायकवाडी प्रशासन सतर्कजायकवाडी धरणात येणारी मोठी आवक व जलसाठ्यात झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. जायकवाडीच्या धरण नियंत्रण कक्षात पुरेसे अभियंते, कर्मचारी, नियुक्त करण्यात आले असून, वायरलेस कक्ष, दूरध्वनी आदी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, तसेच वरिष्ठांना धरणाचे अपडेट देण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील धरणाचा जलसाठाकरंजवण    -    ७६.०१%वाघाड    -    १००% ओझरखेड    -    २४.४५%पालखेड    -     ७०.४१%गंगापूर    -    ८८.१०% गौतमी    -    ९८.८९%कश्यपी    -    ९५.४१%कडवा    -    ८५.९५% दारणा    -    ८८.४०%भावली    -    १००%मुकणे    -     ९४.००%

अहमदनगर जिल्ह्यातील जलसाठाभंडारदरा    -    ९५.०६%निळवंडे    -    ६०.९८%मुळा    -    ५५.३३%वालदेवी    -    १००%आढळा    -    १००%

टॅग्स :floodपूरgodavariगोदावरीAurangabadऔरंगाबादRainपाऊस