शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गोदेने पात्र सोडले; वैजापूर, गंगापूर तालुक्यात महापुराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:16 IST

वहन क्षमता सव्वालाख, आवक ३ लाख क्युसेक

ठळक मुद्दे: वैजापूर, गंगापुरातील गावांना बसणार फटका; प्रशासनाची कसोटी

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने गोदावरी पात्रात होणारा विसर्ग रविवारी २ लाख ६२ हजार १५० क्युसेक, अशा मोठ्या क्षमतेने वाढविण्यात आला.  गोदावरी पात्राची वहन क्षमता सरासरी १ लाख २५ हजार क्युसेक आहे. त्यामुळे सध्या गोदावरीत महापूरजन्य परिस्थिती असून, अनेक ठिकाणी नदी पात्र सोडून वाहत आहे. वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील गोदावरी काठावरील गावांना याचा फटका बसणार आहे. सोमवारी अधिक गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार असल्याने प्रशासाची  कसोटी लागणार आहे.

रविवारी सकाळी जायकवाडी धरणात ७५,४१६ क्युसेक क्षमतेने आवक होत होती. धरणात येणारी आवक तासातासाला वाढत असल्याने सोमवारपासून धरणात जवळपास दीड ते दोन लाख क्युसेक आवक अपेक्षित असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी धरणात १८% जलसाठा झाला होता. सोमवारी सकाळपर्यंत २५% जलसाठा होण्याची अपेक्षा आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्यातील करंजवन ४८ मि.मी., वाघाड ७८ मि.मी., ओझरखेड ४० मि.मी., पालखेड ४१ मि.मी., गंगापूर १९५ मि.मी., गौतमी १५० मि.मी., कश्यपी १३३ मि.मी.,  कडवा ८५ मि.मी., दारणा ८७ मि.मी., भावली २३३ मि.मी., मुकणे ७३ मि.मी., नाशिक ९५ मि.मी., त्र्यंबकेश्वर ३१५ मि.मी., इगतपुरी २२० मि.मी., घोटी १४२ मि.मी. अशा जबरदस्त पावसाची नोंद झाली.  रविवारी सकाळपासून पुन्हा  नाशिक जिल्ह्यात  पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तेथील धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील दारणा धरणातून ३९,२५० क्युसेक, कडवा धरणातून १६,२२० क्युसेक व गंगापूर धरणातून ४५,४८६ क्युसेक, पालखेड धरणातून ५७,७०६ क्युसेक, विसर्ग रविवारी दुपारपासून वाढविण्यात आला. 

या सर्व धरणांचे पाणी नांदूर-मधमेश्वर वेअरमध्ये येत असल्याने, नांदूर-मधमेश्वर वेअरमधून रविवारी दुपारी ३ वाजता २ लाख क्युसेक क्षमतने गोदावरी पात्रात विसर्ग वाढविण्यात आला. गोदावरी पात्राची वहन क्षमता सरासरी १,२५,००० क्युसेकची असून, क्षमतेपेक्षा जास्त विसर्ग वाढविण्यात आल्याने महापुराचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे. गोदावरीच्या पुराचा फटका नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यांतील अनेक गावांना बसला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणाची पाणीपातळी १,५०१.५९ फूट झाली होती, तर धरणात १,१०९.२६७ दलघमी (३९.१६ टीएमसी) एकूण जलसाठा झाला असून, यापैकी ३७१.१६१ दलघमी (१३.१० टीएमसी ) जिवंत जलसाठा झाला आहे. धरणात रविवारी सायंकाळी १८% जलसाठा झाला होता. 

अहमदनगर जिल्ह्यातील विसर्ग जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात गत आठवड्यापासून जोरदार पाऊस होत आहे. नगर जिल्ह्यातील धरणाचा जलसाठा चांगला झाल्याने तेथील धरणातून आज मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. भंडारदरा धरणातून निळवंडेत २१,३५७ क्युसेक असा विसर्ग होत असून, ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात २,१२१ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. शनिवारी भंडारदरा १६० मि.मी., निळवंडे ३५ मि.मी., वाकी १९८ मि.मी., अशा पावसाची नोंद झाली. पाऊस झाल्यामुळे सोमवारी सकाळी प्रवरेच्या पात्रात २० ते २५ हजार क्युसेक असा विसर्ग करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. हे पाणीसुद्धा लवकरच जायकवाडीत दाखल होईल. जायकवाडी धरणात यंदा ६०६.७२ दलघमी  (२१.४२ टीएमसी) पाण्याची आवक झाली आहे. गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीपातळीत २.३४ फुटांनी वाढ झाली असून, जलसाठ्यात ७% वाढ झाली आहे.

जायकवाडी प्रशासन सतर्कजायकवाडी धरणात येणारी मोठी आवक व जलसाठ्यात झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. जायकवाडीच्या धरण नियंत्रण कक्षात पुरेसे अभियंते, कर्मचारी, नियुक्त करण्यात आले असून, वायरलेस कक्ष, दूरध्वनी आदी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, तसेच वरिष्ठांना धरणाचे अपडेट देण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील धरणाचा जलसाठाकरंजवण    -    ७६.०१%वाघाड    -    १००% ओझरखेड    -    २४.४५%पालखेड    -     ७०.४१%गंगापूर    -    ८८.१०% गौतमी    -    ९८.८९%कश्यपी    -    ९५.४१%कडवा    -    ८५.९५% दारणा    -    ८८.४०%भावली    -    १००%मुकणे    -     ९४.००%

अहमदनगर जिल्ह्यातील जलसाठाभंडारदरा    -    ९५.०६%निळवंडे    -    ६०.९८%मुळा    -    ५५.३३%वालदेवी    -    १००%आढळा    -    १००%

टॅग्स :floodपूरgodavariगोदावरीAurangabadऔरंगाबादRainपाऊस