शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगेचे पाणी गुजरातला न देता मराठवाड्याला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:51 IST

दमणगंगा, नार-पार, तापी या पश्चिमी वाहिन्यांतील नदी खोऱ्यांचे पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस होत आहे. राज्य सरकार पश्चिमी वाहिन्यांतील पाणी गुजरातला देण्यासाठी तयार झाले

औरंगाबाद : दमणगंगा, नार-पार, तापी या पश्चिमी वाहिन्यांतील नदी खोऱ्यांचे पाणी गुजरातला देण्याच्या हालचाली सुरू असून, ते पाणी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मिळावे, अशी मागणी पाणी यात्रा या एनजीओचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. नितीन भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद नदी खोऱ्यात पाणी सोडण्यावरून अनेकदा वाद होतात. पाण्याचा राजकीय दुष्काळ आहे, पाण्याचा दुष्काळ नाही; परंतु नियोजन नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १९९९ साली चितळे समितीने दिलेल्या अहवालानुसार नाशिकच्या पश्चिमेकडील पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी उचलून वळण बांधाऱ्यांमार्फत कायमस्वरूपी गोदावरीपात्रात आणले जावे. काही वर्षांपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस होत आहे. असे असताना राज्य सरकार पश्चिमी वाहिन्यांतील पाणी गुजरातला देण्यासाठी तयार झाले आहे. गुजरातला पाणी वळविल्यास केंद्र शासनाकडून राज्याला निधी मिळेल; परंतु निधी दिल्यानंतर गुजरातला पाणी वळविण्याच्या करारानुसार दमणगंगेचे पाणी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वळविणे शासनाला शक्य होणार नाही. 

मे २०१० मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पश्चिमी वाहिन्यांचे पाणी गुजरातला देण्याबाबत सामंजस्य कराराच्या हालचाली सुरू केल्या. त्याआधारेच विद्यमान सरकार पुढे जात आहे. हा सगळा प्रकार विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसमोर मांडला होता काय? तर त्याचे उत्तर नाही आहे. दोन विभागातील सुमारे ५ कोटी लोकसंख्येला फसविण्याचा, अंधारात ठेवण्याचा हा प्रकार आहे. पाणी वाटप लवादांसमोर देखीलही बाब आणली नसल्याचे पत्रकार परिषदेत भोसले यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. प्रदीप देशमुख, महेंद्र ज्ञाते, शाहू भोसले यांची उपस्थिती होती. 

दोन्ही विभाग पिंजून काढणार ४४६ टीएमसी पाणी गुजरातला आणि १६ टीएमसी पाणी मुंबईला देण्याचा करार होऊ नये, यासाठी जनआंदोलन झाले पाहिजे. जनता आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे या विरोधात लढा दिला पाहिजे. यासाठी पाणी यात्रा ही संस्था औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, धुळे, नाशिकमध्यै दौरा करून आंदोलनाची दिशा ठरवीत आहे.  

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकार