शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा द्या; अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 19:20 IST

सन्मानाने जगण्यासाठी मिळावे दरमहा १० हजार रुपये मानधन 

ठळक मुद्देज्येष्ठांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकता

औरंगाबाद :  केंद्र सरकारने  देशातील साडेचौदा कोटी ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा द्यावा. तसेच त्यांना आयुष्याची संध्याकाळ सन्मानाने जगण्यासाठी दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात यावे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळतील, स्थलांतर थांबेल, नोकऱ्या मिळणार नाहीत, पण अन्न व आरोग्याच्या सेवेत लाखो युवकांना रोजगार मिळेल. जीएसटीतून सरकारलाही उत्पन्न मिळेल, असा विचार अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी गुरुवारी येथे मांडला. 

आस्था फाऊंडेशनच्या वतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी आपले विचार मांडले. त्यास सर्व ज्येष्ठांनी हात उंचावून जोरदार पाठिंबा दिला. सायंकाळी तापडिया नाट्यमंदिर ज्येष्ठ नागरिकांनी भरून गेले होते. बोकील म्हणाले की, आजची तरुण पिढी आई-वडिलांच्या औषधांवर व मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे पिळून निघत आहे. ६० वर्षांवरील व ज्यांना पेन्शन मिळत नाही, अशा ज्येष्ठांना जर केंद्र सरकारने दरमहा १० हजार रुपये मानधन दिले तरुण पालकांचा एक खर्च वाचेल व ते मुलांना आणखी चांगले शिक्षण देऊ शकतील. ६० वर्षे नागरिकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सरकारकडे ‘कर’ भरलेला आहे. तसेच या देशाला एक किंवा दोन नागरिकही दिले आहेत. यामुळे मानधन त्यांचा हक्क आहे. ते किती व्यावहारिक आहे हे पटवून देताना बोकील म्हणाले की, सध्या देशाची अर्थव्यवस्था १८४ लाख कोटी रुपयांची आहे. त्यातील साडेचौदा लाख कोटी मानधन म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेपैकी फक्त ७.५ टक्के इतकी रक्कम देणे सरकारला अशक्य नाही. ज्येष्ठांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल, स्वतंत्र फुटपाथ, स्वतंत्र उद्यान तयार करण्यात यावेत, यावरही त्यांनी भर दिला. प्रास्ताविक डॉ. नरेंद्र वैद्य यांनी, तर सूत्रसंचालन सुरेश कुलकर्णी यांनी केले. 

ज्येष्ठांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकताअनिल बोकील यांनी सांगितले की, साडेचौदा कोटी ज्येष्ठ नागरिक ही सर्वात मोठी व्होट बँक आहे. मात्र, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय नाही किंवा राज्यमंत्रीही नाही. आजपर्यंत याचा विचार झाला नाही. पण आता केंद्र सरकारला ज्येष्ठांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEconomyअर्थव्यवस्था