शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा द्या; अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 19:20 IST

सन्मानाने जगण्यासाठी मिळावे दरमहा १० हजार रुपये मानधन 

ठळक मुद्देज्येष्ठांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकता

औरंगाबाद :  केंद्र सरकारने  देशातील साडेचौदा कोटी ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा द्यावा. तसेच त्यांना आयुष्याची संध्याकाळ सन्मानाने जगण्यासाठी दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात यावे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळतील, स्थलांतर थांबेल, नोकऱ्या मिळणार नाहीत, पण अन्न व आरोग्याच्या सेवेत लाखो युवकांना रोजगार मिळेल. जीएसटीतून सरकारलाही उत्पन्न मिळेल, असा विचार अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी गुरुवारी येथे मांडला. 

आस्था फाऊंडेशनच्या वतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी आपले विचार मांडले. त्यास सर्व ज्येष्ठांनी हात उंचावून जोरदार पाठिंबा दिला. सायंकाळी तापडिया नाट्यमंदिर ज्येष्ठ नागरिकांनी भरून गेले होते. बोकील म्हणाले की, आजची तरुण पिढी आई-वडिलांच्या औषधांवर व मुलांच्या शैक्षणिक खर्चामुळे पिळून निघत आहे. ६० वर्षांवरील व ज्यांना पेन्शन मिळत नाही, अशा ज्येष्ठांना जर केंद्र सरकारने दरमहा १० हजार रुपये मानधन दिले तरुण पालकांचा एक खर्च वाचेल व ते मुलांना आणखी चांगले शिक्षण देऊ शकतील. ६० वर्षे नागरिकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सरकारकडे ‘कर’ भरलेला आहे. तसेच या देशाला एक किंवा दोन नागरिकही दिले आहेत. यामुळे मानधन त्यांचा हक्क आहे. ते किती व्यावहारिक आहे हे पटवून देताना बोकील म्हणाले की, सध्या देशाची अर्थव्यवस्था १८४ लाख कोटी रुपयांची आहे. त्यातील साडेचौदा लाख कोटी मानधन म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेपैकी फक्त ७.५ टक्के इतकी रक्कम देणे सरकारला अशक्य नाही. ज्येष्ठांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल, स्वतंत्र फुटपाथ, स्वतंत्र उद्यान तयार करण्यात यावेत, यावरही त्यांनी भर दिला. प्रास्ताविक डॉ. नरेंद्र वैद्य यांनी, तर सूत्रसंचालन सुरेश कुलकर्णी यांनी केले. 

ज्येष्ठांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची आवश्यकताअनिल बोकील यांनी सांगितले की, साडेचौदा कोटी ज्येष्ठ नागरिक ही सर्वात मोठी व्होट बँक आहे. मात्र, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय नाही किंवा राज्यमंत्रीही नाही. आजपर्यंत याचा विचार झाला नाही. पण आता केंद्र सरकारला ज्येष्ठांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEconomyअर्थव्यवस्था