शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींना न्याय द्यावा, अन्यथा आम्ही निवडणुकाच होऊ देणार नाही : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 13:08 IST

मराठा आरक्षण देण्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार अयशस्वी ठरले. आता ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले.

ठळक मुद्दे ओबीसी आरक्षणप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापना कराओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याच मताचे आम्ही आहोत

औरंगाबाद : सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले. आता काहीही करून सरकारने ओबीसींना न्याय द्यावा. अन्यथा आम्ही या निवडणुकाच होऊ देणार नाही, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी दिला. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. यासंदर्भात आपण उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

त्यांनी आरोप केला की, मराठा आरक्षण देण्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार अयशस्वी ठरले. आता ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले. हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. सरकार सर्वोच्च असते. सरकार काहीही करू शकते. काहीही करून सरकारने ओबीसींना न्याय द्यावा. अन्यथा आम्ही या निवडणुकाच होऊ देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उद्देशाने आरक्षण आणले, त्या वंचित घटकांना सत्तेत येण्याची संधी मिळणार नसेल, तर मग या निवडणुका कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतो. सरकारने न्यायालयात ओबीसींची बाजूच नीट मांडली नाही किंबहुना ओबीसींच्या बाबतीत हे सरकार उदासीनच आहे, असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.

एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याच मताचे आम्ही आहोत. भाजपही आहे. गोपीनाथ मुंडे यांनी तर अखेरपर्यंत ही मागणी लावून धरली होती; परंतु जनगणनेचा आता जो निकाल लागला आहे, त्याच्याशी संबंध नाही. गेल्या पंधरा महिन्यांत सरकारने एकदाही चर्चा केली नाही. सरकारने मंत्रिमंडळाच्या उपसमितीची तत्काळ स्थापना करून देवेंद्र फडणवीस व त्या खात्याची मंत्री राहिल्यामुळे माझ्याशीही चर्चा करावी, अशी अपेक्षा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने पोस्टाने पाकीट काढले, याबद्दल मला याचा आनंद आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या चाहत्यांनी हे पाकीट विकत घेऊन त्याद्वारे आपल्या भावना पंतप्रधानांना पाठवाव्यात. एखाद्या चांगल्या भावनेचा ते ‘मन की बात’मध्ये उल्लेख करू शकतील. पत्रपरिषदेस खा. डॉ. प्रीतम मुंडे, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड, प्रवीण घुगे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रा. डॉ. राम बुधवंत, समीर राजूरकर, राजेश मेहता, दिलीप थोरात आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेOBC Reservationओबीसी आरक्षणAurangabadऔरंगाबाद