शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
3
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
4
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
5
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
6
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
7
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
8
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
9
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
10
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
11
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
12
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
13
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
14
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
15
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
16
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
17
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
18
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
19
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
20
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!

आठ दिवसांत समान पाणी द्या, टँकर बंद करा; महापौरांचा निर्वाणीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 13:22 IST

शहरात उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ठळक मुद्देमुख्य जलवाहिनीवरील जोडण्या तोडापालिका आयुक्तांच्या जलकुंभांना भेटी सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक वॉर्डांचे पाण्यासाठी आंदोलन

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. सिडको-हडकोसह अनेक भागांत पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. आठ दिवसांमध्ये मनपा प्रशासनाने समान पाणी वाटपाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन युद्धपातळीवर तोडावेत, एन-५ व एन-७ च्या जलकुंभावरून भरण्यात येणारे टँकर त्वरित बंद करा, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना सूचित केले.

शहरात उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक वॉर्डांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. ज्या भागात जलवाहिनी नाही, त्या भागातील नागरिकांना टँकरसाठी पैसे भरूनही टँकर मिळत नसल्यामुळे रोष अधिक वाढला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक दिलीप थोरात, कीर्ती शिंदे, नितीन चित्ते, ज्योती अभंग, प्रदीप बुरांडे, राहुल रोजतकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते. 

प्रारंभी महापौरांनी पाणी प्रश्नावर अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. शहरात येणारे पाणी कमी झाले तरी नियोजन नसल्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील अहंकारवृत्तीमुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. शहरात पाण्याचे समान वाटप करावे लागेल. काही भागांत तीन दिवसाआड, तर काही ठिकाणी आठ दिवसांआड असे होता कामा नये. आठ दिवसांत योजनेतील दोष दूर करून नियोजन करा, अशी सूचना त्यांनी केली.

गुन्हे दाखल कराशहरात मुख्य जलवाहिनीवर असलेले सर्व नळ कनेक्शन काढून टाकावेत. पोलिसांना सोबत घेऊन मुख्य जलवाहिनीवरून नळजोडणी घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असेही महापौरांनी बजावले.

सहा कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्यापाणीपुरवठा विभागात सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ११ अभियंत्यांपैकी ६ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या पाणीपुरवठा विभागात करून उपअभियंता अशोक पद्मे व शेख खाजा यांना प्रत्येकी ३ अभियंते मदतीस देण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले, तसेच सेवानिवृत्त झालेले अभियंता गिरी यांना तातडीने पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले.

एमआयडीसीचे पाणी टँकरसाठी एमआयडीसीने अडीच एमएलडी पाणी मंजूर केले आहे; परंतु एन-१ च्या जलवाहिनीवरून मनपा केवळ ०.५० एमएलडी पाणी घेत आहे. एन-५ आणि एन-७ च्या जलकुंभावरून भरण्यात येणारे टँकर बंद करावेत. एमआयडीसीचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे नागरिकांना पटवून द्यावे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर योग्य कारवाई होत नाही. आठ दिवसांत सर्व त्रुटी दूर कराव्यात. आठ दिवसांनंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यात सुधारणा न दिसल्यास पुढे काय करायचे ते ठरवू, असे घोडेले यांनी नमूद केले.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद