शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

आठ दिवसांत समान पाणी द्या, टँकर बंद करा; महापौरांचा निर्वाणीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 13:22 IST

शहरात उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ठळक मुद्देमुख्य जलवाहिनीवरील जोडण्या तोडापालिका आयुक्तांच्या जलकुंभांना भेटी सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक वॉर्डांचे पाण्यासाठी आंदोलन

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. सिडको-हडकोसह अनेक भागांत पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. आठ दिवसांमध्ये मनपा प्रशासनाने समान पाणी वाटपाचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन युद्धपातळीवर तोडावेत, एन-५ व एन-७ च्या जलकुंभावरून भरण्यात येणारे टँकर त्वरित बंद करा, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना सूचित केले.

शहरात उन्हाळा सुरू झाल्यापासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक वॉर्डांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. ज्या भागात जलवाहिनी नाही, त्या भागातील नागरिकांना टँकरसाठी पैसे भरूनही टँकर मिळत नसल्यामुळे रोष अधिक वाढला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक दिलीप थोरात, कीर्ती शिंदे, नितीन चित्ते, ज्योती अभंग, प्रदीप बुरांडे, राहुल रोजतकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते. 

प्रारंभी महापौरांनी पाणी प्रश्नावर अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. शहरात येणारे पाणी कमी झाले तरी नियोजन नसल्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील अहंकारवृत्तीमुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. शहरात पाण्याचे समान वाटप करावे लागेल. काही भागांत तीन दिवसाआड, तर काही ठिकाणी आठ दिवसांआड असे होता कामा नये. आठ दिवसांत योजनेतील दोष दूर करून नियोजन करा, अशी सूचना त्यांनी केली.

गुन्हे दाखल कराशहरात मुख्य जलवाहिनीवर असलेले सर्व नळ कनेक्शन काढून टाकावेत. पोलिसांना सोबत घेऊन मुख्य जलवाहिनीवरून नळजोडणी घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असेही महापौरांनी बजावले.

सहा कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्यापाणीपुरवठा विभागात सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ११ अभियंत्यांपैकी ६ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या पाणीपुरवठा विभागात करून उपअभियंता अशोक पद्मे व शेख खाजा यांना प्रत्येकी ३ अभियंते मदतीस देण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले, तसेच सेवानिवृत्त झालेले अभियंता गिरी यांना तातडीने पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले.

एमआयडीसीचे पाणी टँकरसाठी एमआयडीसीने अडीच एमएलडी पाणी मंजूर केले आहे; परंतु एन-१ च्या जलवाहिनीवरून मनपा केवळ ०.५० एमएलडी पाणी घेत आहे. एन-५ आणि एन-७ च्या जलकुंभावरून भरण्यात येणारे टँकर बंद करावेत. एमआयडीसीचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे नागरिकांना पटवून द्यावे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर योग्य कारवाई होत नाही. आठ दिवसांत सर्व त्रुटी दूर कराव्यात. आठ दिवसांनंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यात सुधारणा न दिसल्यास पुढे काय करायचे ते ठरवू, असे घोडेले यांनी नमूद केले.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद