शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीला मारहाण

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

औरंगाबाद : आजही समाजात आंतरजातीय प्रेमविवाह करण्यास खुल्या मनाने मान्यता दिली जात नाही. त्यामुळे अनेक जोडप्यांना पळून जाऊन गुपचूप लग्न करावे लागते.

औरंगाबाद : आजही समाजात आंतरजातीय प्रेमविवाह करण्यास खुल्या मनाने मान्यता दिली जात नाही. त्यामुळे अनेक जोडप्यांना पळून जाऊन गुपचूप लग्न करावे लागते. आंतरजातीय प्रेमविवाहावर आधारित सैराट चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम करीत आहे. या चित्रपटात तरुणीचे नातेवाईक शेवटी त्या युगुलाचा खात्मा करताना दाखविण्यात आले आहे. या चित्रपटातील दृश्याप्रमाणेच शहरातील एका प्रेमविवाह केलेल्या तरुणीला तिच्या माहेरकडील मंडळींनी बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना २६ मे रोजी दुपारी गारखेडा परिसरातील विजयनगर येथे घडली.पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अंजली (नाव बदलले आहे) ही आई-वडिलांसह तर समीर पाटील (नाव बदलले) मावशीच्या घरी एका कॉलनीत राहत असत. दोन वर्षांपासून त्यांचे प्रेम होते. त्यामुळे त्यांनी परिवाराकडे आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, मुलीच्या नातेवाईकांकडून त्यांच्या प्रेमविवाहाला विरोध होता. त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी या लग्नास नकार दिला. शेवटी महिनाभरापूर्वी अंजली आणि समीर यांनी प्रेमविवाह केला. नवविवाहित दाम्पत्य विजयनगर येथे राहू लागले. याबाबतची माहिती तिच्या माहेरच्या मंडळींना मिळाली. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अंजली घरी एकटी असताना तिच्या माहेरचे चार जण तिच्या घरी गेले. यावेळी त्यांनी तिला तू प्रेमविवाह का केला असे विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रसंगी झालेल्या आवाजामुळे शेजारी मदतीसाठी धावत आल्याने तिची सुटका झाली. या घटनेनंतर तिने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.