शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

घाटीच्या अजब कारभाराचा स्वाईन फ्लू रुग्णांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:15 IST

या सगळ्यात रुग्ण आणि नातेवाईकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या.

औरंगाबाद : स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचाराची जबाबदारी नसल्याचे म्हणत वॉर्ड बंद करणाऱ्या घाटी प्रशासनाच्या अजब कारभाराचा गुरुवारी रुग्णांना फटका बसला. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे बोट दाखविणाऱ्या घाटीने सहा तासांत स्वाईन फ्लूचा वॉर्ड पुन्हा उभा केला. परंतु या सगळ्यात रुग्ण आणि नातेवाईकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या.

घाटी रुग्णालयातील स्वाईन फ्लूचा वॉर्ड बंद करून गुरुवारपासून चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार होणार होते. याठिकाणी घाटीतील डॉक्टर्स कार्यरत ठेवण्याचेही नियोजन करण्यात आले होते. खाजगी रुग्णालयांत स्वाईन फ्लूचा रुग्ण दाखल असेल तर त्याच्यावर शासकीय यंत्रणेच्या देखभालीत उपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री घाटीतील डॉक्टरांशी संपर्क साधला, तेव्हा रुग्णाला गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे सकाळी रुग्णाचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात गेले. परंतु याठिकाणी उपचार सुविधा सुरू झालेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पुन्हा संपर्क करून दुपारी दीड वाजेच्या सुमारास रुग्णाला घेऊन ते घाटीत अपघात विभागात आले. रुग्णाला नेमके कुठे दाखल करावे, याची सहज माहिती मिळाली नाही. कशीबशी माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी स्वत:च रुग्णाला मेडिसीन विभागात दाखल केले. येथेही स्वाईन फ्लूचा वॉर्ड नेमका कुठे आहे, ही माहिती नसल्याने ते थेट दुसऱ्या मजल्यावर गेले. परंतु नव्याने तयार केलेला स्वाईन फ्लूचा वॉर्ड क्रमांक-५ तळमजल्यावर असल्याची माहिती मिळाली. वॉर्डात रुग्ण दाखल करेपर्यंत दुपारचे अडीच वाजून गेले होते. स्ट्रेचर स्वत:च ओढण्याची वेळ आली. रुग्णाला दाखल करेपर्यंत अनेक अडचणी आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, घाटीतील वॉर्डासाठी आम्हीच ५ व्हेंटिलेटर दिले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे म्हणाले, घाटीतच उपचार करणे योग्य असल्याने वॉर्ड तयार केला. सध्या दोन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीSwine Flueस्वाईन फ्लूhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय