शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

टंचाईचा तीन कोटींचा निधी मिळेना

By admin | Updated: May 6, 2015 00:28 IST

जालना : जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेला

जालना : जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेला तीन कोटींचा निधी शासनाकडून अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे टँकरधारकांसमोर डिझेलचा तर ज्या शेतकऱ्यांनी विहिरी अधिग्रहणासाठी दिल्या, त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या आॅक्टोबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते जून या कालावधीत टंचाई निवारणासाठी अंदाजित ३७ कोटींचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या आराखड्यानुसार टंचाईजन्य परिस्थितीत ५५० टँकरची अपेक्षा करण्यात आली असली तरी मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सद्यस्थितीत २११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून ३५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत टँकर व विहिर अधिग्रहणावर २ कोटींचा खर्च झाला. तर नळयोजना दुरूस्ती, तात्पुरती नळयोजना इत्यादी उपाययोजनांसाठी १ कोटींचा खर्च झाला. त्यामुळे या तीन कोटींचा खर्च मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांना विहिर अधिग्रहणाचे तसेच संबंधितांना टँकर व उपाययोजनांच्या कामांचे देयके अदा करता येतील, याबाबतचा प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला. हा खर्च मिळण्याची मागणी विहिर मालकांनी लावून धरली आहे. मात्र शासनाकडून अद्याप या खर्चाची रक्कम मिळालेली नाही. टँकरमालकांना डिझेलचा खर्च न मिळाल्याने त्यांच्याकडूनही खर्च देण्याची मागणी होत आहे. तर नळयोजनांची कामे केलेले कंत्राटदारही देयकाच्या प्रतीक्षेत आहेत.याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे म्हणाले की, आम्ही शासनाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठविलेला आहे. अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. राज्यात अन्य जिल्ह्यांनाही हा निधी मिळाला नसल्याचे समजते. (प्रतिनिधी)