शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात पाणी व्यवस्थापनाद्वारे अद्रक शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:24 IST

यशकथा : पारंपरिक शेतीस छेद देत आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत शेती केली.

- सय्यदलाल ( औरंगाबाद) 

दुष्काळाची तीव्रता वाढत असून, औरंगाबाद जिल्ह्यातील दरेगाव, ता. खुलताबाद येथील तुकाराम दादाराव गायकवाड हा तरुण शेतकरी अद्रक लागवडीतून लाखो रुपये नफा कमवीत आहे. दुष्काळातही पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून शेतीत यश मिळविणारे गायकवाड यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला.

दरेगाव येथील तुकाराम गायकवाड यांनी पारंपरिक शेतीस छेद देत आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत शेती केली. अद्रक लागवड करण्यासाठी प्रथम जमिनीची चांगली मशागत केली. पाच फूट अंतराचे व दीड फूट उंचीचे बेड पाडले. नंतर या बेडमध्ये ठिंबक नळ्या अंथरल्या. प्रतिएकर मळीचे दोन व शेणखताचे दोन ट्रॅक्टर खत टाकला तसेच लागवडीपूर्वीच प्रतिएकर दोन गोणी १०-२६-२६ निंबोळी पेंड, सुपरफॉस्पेट दोन गोणी  व एक गोणी पोटॅश बेडवर टाकून कालवून पसरविला. यानंतर जास्तीचे उत्पादन  देणाऱ्या माहीम या अद्रक वाणाची निवड केली. त्यासाठी प्रतिएकर ८ क्विंटल बेणे ३ हजार ८५० या दराने खरेदी केले. १ जून ते ७ जूनदरम्यान बुरशीनाशक द्रावणात अद्रकचे बियाणे बुडवून बेडवर  दोन्ही बाजूला नऊ इंच व दोन खड्ड्यातील अंतर ६ इंच ठेवून लागवड केली. ऋतुमानानुसार ठिंबकद्वारे पाणी सोडले.

तुकाराम गायकवाड व त्यांचे बंधू प्रतिवर्षी किमान सात ते दहा एकर क्षेत्रात  अद्रक पीक घेतात. यात नांगरणी, कोळपणी, शेणखत व इतर खते, बेणे आदी एक लाख तीस हजार रुपये खर्च आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सध्या अद्रक पिकास ५५०० ते ६००० पर्यंत मालाच्या प्रतवारीनुसार भाव सुरू असल्यामुळे लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण खर्च वजा जाता प्रतिएकरातून सहा लाखांवर निव्वळ नफा मिळणार असल्याचे तुकाराम गायकवाड यांनी सांगितले. अद्रक पिकास पाण्याची कमतरता पडू नये यासाठी त्यांनी दोन शेततळे निर्माण करून या शेततळ्यात पावसाळ्यात विहीर व नदी-नाल्याचे पाणी साठवले.

एका शेततळ्यात ६५ लाख लिटर याप्रमाणे दोन्हीही  शेततळ्यात आजमितीस १ कोटी ३० लाख लिटर पाणीसाठा हा फक्त उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्यासाठीच राखीव ठेवल्याने अडीच लाखांवरील नफा हा फक्त शेततळ्याच्या पाण्यामुळेच मिळत असल्याचे तुकाराम गायकवाड यांनी सांगितले. विहीर व शेततळे व यातील पाण्याचा अंदाज घेतल्यास डिसेंबर ते जानेवारीत काढणी केल्यास प्रतिएकर १०० ते ११० क्विंटल तर पाणी असल्यास हीच अद्रक जून ते जुलै महिन्यात काढणी केल्यास प्रतिएकर १५५ क्विंटलच्या वर हमखास उत्पादन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमच्या परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेततळ्यांची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांनासुद्धा दुष्काळाचे चटके सहन करावे लागले नाहीत. ते शेततळ्याच्या माध्यमातून शेतीत विविध उत्पन्न काढत असल्याचेही गायकवाड म्हणाले. पाण्याचे योग्य नियोजन केले तर शेती यशस्वी ठरते याचे उदाहरण तुकाराम गायकवाड यांनी घालून दिले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी