शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

दुष्काळात पाणी व्यवस्थापनाद्वारे अद्रक शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:24 IST

यशकथा : पारंपरिक शेतीस छेद देत आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत शेती केली.

- सय्यदलाल ( औरंगाबाद) 

दुष्काळाची तीव्रता वाढत असून, औरंगाबाद जिल्ह्यातील दरेगाव, ता. खुलताबाद येथील तुकाराम दादाराव गायकवाड हा तरुण शेतकरी अद्रक लागवडीतून लाखो रुपये नफा कमवीत आहे. दुष्काळातही पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून शेतीत यश मिळविणारे गायकवाड यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला.

दरेगाव येथील तुकाराम गायकवाड यांनी पारंपरिक शेतीस छेद देत आधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत शेती केली. अद्रक लागवड करण्यासाठी प्रथम जमिनीची चांगली मशागत केली. पाच फूट अंतराचे व दीड फूट उंचीचे बेड पाडले. नंतर या बेडमध्ये ठिंबक नळ्या अंथरल्या. प्रतिएकर मळीचे दोन व शेणखताचे दोन ट्रॅक्टर खत टाकला तसेच लागवडीपूर्वीच प्रतिएकर दोन गोणी १०-२६-२६ निंबोळी पेंड, सुपरफॉस्पेट दोन गोणी  व एक गोणी पोटॅश बेडवर टाकून कालवून पसरविला. यानंतर जास्तीचे उत्पादन  देणाऱ्या माहीम या अद्रक वाणाची निवड केली. त्यासाठी प्रतिएकर ८ क्विंटल बेणे ३ हजार ८५० या दराने खरेदी केले. १ जून ते ७ जूनदरम्यान बुरशीनाशक द्रावणात अद्रकचे बियाणे बुडवून बेडवर  दोन्ही बाजूला नऊ इंच व दोन खड्ड्यातील अंतर ६ इंच ठेवून लागवड केली. ऋतुमानानुसार ठिंबकद्वारे पाणी सोडले.

तुकाराम गायकवाड व त्यांचे बंधू प्रतिवर्षी किमान सात ते दहा एकर क्षेत्रात  अद्रक पीक घेतात. यात नांगरणी, कोळपणी, शेणखत व इतर खते, बेणे आदी एक लाख तीस हजार रुपये खर्च आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सध्या अद्रक पिकास ५५०० ते ६००० पर्यंत मालाच्या प्रतवारीनुसार भाव सुरू असल्यामुळे लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण खर्च वजा जाता प्रतिएकरातून सहा लाखांवर निव्वळ नफा मिळणार असल्याचे तुकाराम गायकवाड यांनी सांगितले. अद्रक पिकास पाण्याची कमतरता पडू नये यासाठी त्यांनी दोन शेततळे निर्माण करून या शेततळ्यात पावसाळ्यात विहीर व नदी-नाल्याचे पाणी साठवले.

एका शेततळ्यात ६५ लाख लिटर याप्रमाणे दोन्हीही  शेततळ्यात आजमितीस १ कोटी ३० लाख लिटर पाणीसाठा हा फक्त उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्यासाठीच राखीव ठेवल्याने अडीच लाखांवरील नफा हा फक्त शेततळ्याच्या पाण्यामुळेच मिळत असल्याचे तुकाराम गायकवाड यांनी सांगितले. विहीर व शेततळे व यातील पाण्याचा अंदाज घेतल्यास डिसेंबर ते जानेवारीत काढणी केल्यास प्रतिएकर १०० ते ११० क्विंटल तर पाणी असल्यास हीच अद्रक जून ते जुलै महिन्यात काढणी केल्यास प्रतिएकर १५५ क्विंटलच्या वर हमखास उत्पादन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमच्या परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेततळ्यांची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांनासुद्धा दुष्काळाचे चटके सहन करावे लागले नाहीत. ते शेततळ्याच्या माध्यमातून शेतीत विविध उत्पन्न काढत असल्याचेही गायकवाड म्हणाले. पाण्याचे योग्य नियोजन केले तर शेती यशस्वी ठरते याचे उदाहरण तुकाराम गायकवाड यांनी घालून दिले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी