शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

१५ बोगींच्या रेल्वेने आले महाव्यवस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:18 IST

: रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते; परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बुधवारी औरंगाबादेत अधिकारी-कर्मचाºयांच्या फौजफाट्यासह १५ बोगींच्या रेल्वेने दाखल झाले. यावेळी या रेल्वेला ‘सलून’ जोडण्यात आलेले होते.

ठळक मुद्देव्हीआयपी संस्कृ ती कायम : रेल्वेला सलूनही जोडलेले, रेल्वेमंत्र्यांच्या आदेशाला खोडा

औरंगाबाद : रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते; परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बुधवारी औरंगाबादेत अधिकारी-कर्मचाºयांच्या फौजफाट्यासह १५ बोगींच्या रेल्वेने दाखल झाले. यावेळी या रेल्वेला ‘सलून’ जोडण्यात आलेले होते. त्यामुळे रेल्वेत अद्यापही व्हीआयपी संस्कृती कायम असल्याचे पाहायला मिळाले.रेल्वेचे अधिकारी जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांचा राजेशाही थाट दिसतो. त्यांच्यासाठी रेल्वेला विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असे सलून अथवा ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ची बोगी जोडली जाते; परंतु अधिकाºयांनी ही शानशोकी बंद करावी आणि रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश आॅक्टोबर २०१७ मध्ये पीयूष गोयल यांनी दिले होते. रेल्वे अधिकाºयांचा पाहणी दौरा म्हणजे हा केवळ देवदर्शन, पर्यटन असे समीकरणच बनले होते. रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानंतर यावर चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार अधिकाºयांनी काही दिवस सर्वसामान्य प्रवाशांबरोबर प्रवास करून सूचनेचे पालन सुरू केले होते; परंतु पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळत आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी रुजू झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी विनोदकुमार यादव औरंगाबादच्या पहिल्याच दौºयात विशेष सलूनने दाखल झाले होते. आता पुन्हा एकदा वार्षिक निरीक्षणासाठी ते बुधवारी औरंगाबादेत आले. यावेळी निरीक्षणासाठी १५ बोगींच्या रेल्वेने ते दाखल झाले. या रेल्वेला लाल रंगाची सलूनदेखील जोडण्यात आल्याचे पाहायला मिळाले. देशातील सर्वात मोठा सेवा उद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले होते; परंतु त्यास खोडा बसत असल्याचे दिसते.एका बोगीसाठी ३० हजारांचा खर्चपाहणी दौºयासाठी वापरण्यात येणाºया एका बोगीसाठी किमान ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे १५ बोगींच्या वापरातून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसते. रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले, निरीक्षणासाठी विविधअधिकारी असतात. महाव्यवस्थपक काही बाबींची पाहणी करतात; परंतु संबंधित विभागाचे अधिकारी संपूर्ण बाबींची तपासणी करतात. त्यामुळे बोगींचा वापर करावा लागतो. त्यास मंजुरीही असते.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन