शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

१५ बोगींच्या रेल्वेने आले महाव्यवस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:18 IST

: रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते; परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बुधवारी औरंगाबादेत अधिकारी-कर्मचाºयांच्या फौजफाट्यासह १५ बोगींच्या रेल्वेने दाखल झाले. यावेळी या रेल्वेला ‘सलून’ जोडण्यात आलेले होते.

ठळक मुद्देव्हीआयपी संस्कृ ती कायम : रेल्वेला सलूनही जोडलेले, रेल्वेमंत्र्यांच्या आदेशाला खोडा

औरंगाबाद : रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते; परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बुधवारी औरंगाबादेत अधिकारी-कर्मचाºयांच्या फौजफाट्यासह १५ बोगींच्या रेल्वेने दाखल झाले. यावेळी या रेल्वेला ‘सलून’ जोडण्यात आलेले होते. त्यामुळे रेल्वेत अद्यापही व्हीआयपी संस्कृती कायम असल्याचे पाहायला मिळाले.रेल्वेचे अधिकारी जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांचा राजेशाही थाट दिसतो. त्यांच्यासाठी रेल्वेला विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असे सलून अथवा ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ची बोगी जोडली जाते; परंतु अधिकाºयांनी ही शानशोकी बंद करावी आणि रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश आॅक्टोबर २०१७ मध्ये पीयूष गोयल यांनी दिले होते. रेल्वे अधिकाºयांचा पाहणी दौरा म्हणजे हा केवळ देवदर्शन, पर्यटन असे समीकरणच बनले होते. रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानंतर यावर चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार अधिकाºयांनी काही दिवस सर्वसामान्य प्रवाशांबरोबर प्रवास करून सूचनेचे पालन सुरू केले होते; परंतु पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळत आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी रुजू झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी विनोदकुमार यादव औरंगाबादच्या पहिल्याच दौºयात विशेष सलूनने दाखल झाले होते. आता पुन्हा एकदा वार्षिक निरीक्षणासाठी ते बुधवारी औरंगाबादेत आले. यावेळी निरीक्षणासाठी १५ बोगींच्या रेल्वेने ते दाखल झाले. या रेल्वेला लाल रंगाची सलूनदेखील जोडण्यात आल्याचे पाहायला मिळाले. देशातील सर्वात मोठा सेवा उद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले होते; परंतु त्यास खोडा बसत असल्याचे दिसते.एका बोगीसाठी ३० हजारांचा खर्चपाहणी दौºयासाठी वापरण्यात येणाºया एका बोगीसाठी किमान ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे १५ बोगींच्या वापरातून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसते. रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले, निरीक्षणासाठी विविधअधिकारी असतात. महाव्यवस्थपक काही बाबींची पाहणी करतात; परंतु संबंधित विभागाचे अधिकारी संपूर्ण बाबींची तपासणी करतात. त्यामुळे बोगींचा वापर करावा लागतो. त्यास मंजुरीही असते.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन