शहरं
Join us  
Trending Stories
1
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
2
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
3
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
4
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
5
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
6
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
7
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
8
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
9
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
10
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
11
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
12
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
14
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
15
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
16
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
17
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
18
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
19
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
20
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाची मजुरी देताना होतोय लिंगभेद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:39 IST

किमान गरजा पूर्ण करण्यासाठी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांना किमान वेतन निश्चिती मिळावी, पुरुष आणि महिला कामगारांना मजुरी देण्यात लिंगभेद करू नये, अशा प्रमुख मागण्या कामगार दिनाच्या निमित्ताने पुढे आल्या आहेत.

ठळक मुद्दे वेतनात लिंगभेद होऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समान काम, समान वेतन’ अशी तरतूद संविधानातच करून ठेवली आहे.समान काम करणाऱ्या स्त्री- पुरुषांना मिळणाऱ्या मजुरीत तफावत होत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : किमान गरजा पूर्ण करण्यासाठी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांना किमान वेतन निश्चिती मिळावी, पुरुष आणि महिला कामगारांना मजुरी देण्यात लिंगभेद करू नये, अशा प्रमुख मागण्या कामगार दिनाच्या निमित्ताने पुढे आल्या आहेत. केवळ खाजगी कंत्राटदारांकडूनच नव्हे, तर मनरेगासारख्या शासकीय योजनांमध्येही लिंगभेद होत असून, समान काम करणाऱ्या स्त्री- पुरुषांना मिळणाऱ्या मजुरीत तफावत होत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांना मिळणाऱ्या वेतनात लिंगभेद होऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समान काम, समान वेतन’ अशी तरतूद संविधानातच करून ठेवली आहे. पण तरीही महिला कामगारांची या विवंचनेतून सुटका झालेली नाही. शेतमजूर, बांधकाम मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, असे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. किमान वेतन निश्चिती, कामाची हमी, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, लिंगभेद, आर्थिक पिळवणूक, व्यसनाधीनता, आरोग्य, मुलांचे शिक्षण यासारखे अनेक प्रश्न या महिलांसमोर आहेत, पण तरीही याबाबतीत कोणतेही ठोस धोरण नाही. 

कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने २०१६-१७ या काळात रेणुका कड, सुरेश शेळके , डॉ. युसूफ बेन्नूर या सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील कामगार महिलांचे सर्वेक्षण केले असून, त्याद्वारे काही प्रमुख मागण्या पुढे आल्या आहेत. सिडको परिसरातील कामगार चौक, सेंट्रल नाका, शहागंज आणि रेल्वेस्टेशन या चार प्रमुख ठिकाणी जमणाऱ्या महिला कामगारांचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला.

बांधकाम किंवा शेतमजुरी या क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. कामाचे स्वरुप आणि वेळ सारखीच असते. पण तरीही स्त्री पुरुषांपेक्षा कमीच काम करते, अशा धारणेने तेथे लिंगभेद होऊन महिलांना पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत निम्मीच मजुरी दिली जाते. मनरेगासारख्या शासकीय योजनाही या गोष्टीला अपवाद नाहीत. अनेकदा महिलांची मजुरी ठरविताना त्यांना ठराविक रक्कम सांगितली जाते, पण दिवसाच्या शेवटी त्यांच्या कामात त्रुटी दाखवून ठरविण्यात आलेल्या रकमेपेक्षाही कमी रक्कम दिली जाते. ही आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी या महिलांचे किमान वेतन निश्चित होण्याची गरज आहे. अनेक प्रकारच्या लैंगिक शोषणालाही या महिला बळी पडतात. संघटित क्षेत्रात महिलांची बाजू मांडण्यासाठी  विशाखा समिती आहे, पण असंघटित क्षेत्रातील महिलांना मात्र असा कोणताही आधार नसून विशाखा समिती, नोडल अधिकारी, तक्रार निवारण समिती या सर्वच गोष्टींबद्दल त्या अनभिज्ञ आहेत. त्यामुळे लैंगिक अत्याचार होऊनही दाद कुणाकडे मागावी, हे न कळून या महिला गप्प राहिल्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची खूप कमी प्रमाणात वाच्यता होते.

किमान वेतन प्रतिदिन २०१ रुपयेमार्च २०१७ मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे काढलेल्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रात मनरेगांतर्गत कामगारांना किमान वेतन प्रतिदिन २०१ रुपये एवढे निश्चित के ले आहे. पण क म्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सर्वेक्षणानुसार प्रत्यक्षात मात्र पुरुषांना २०० रुपये तर महिलांना १५० ते १८० रुपये एवढे वेतन मिळते, अशी माहिती रेणुका कड यांनी दिली. 

आरोग्याच्या समस्या आणि व्यसनाधीनतासर्वेक्षणाच्या अहवालानुसार असंघटित कामगार क्षेत्रात गुटखा आणि तंबाखूचे व्यसन असणाऱ्या महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे तोंडाचे, आतड्याचे आजार या महिलांना अधिक भेडसावतात. कामाच्या ठिकाणी गेल्यावर तेथील प्रसाधनगृह वापरण्याची परवानगी अनेकदा या महिलांना दिली जात नाही. त्यामुळे नैसर्गिक विधींना रोखून ठेवणे, पाणी कमी पिणे, जेवण कमी करणे यासारखा त्रासही या महिलांना सहन करावा लागतो, त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतात.कामाचे स्वरूप अवघड असल्यामुळे पाठीच्या मणक्यांचे दुखणे, कंबरेचे दुखणे, अशक्तपणा, अंगदुखी यासारख्या आरोग्याच्या समस्या भेडसावतात.

रोजगार हमी, किमान वेतननिश्चिती मिळावीपैशाअभावी असंघटित क्षेत्रातील बहुतांश महिला कामगारांच्या मुलांनी शिक्षण सोडले आहे. मजुरीत होणारा लिंगभेद ही एक मोठी अडचण या महिलांसमोर आहे. ठराविक वेळेला नाक्यावर जाऊन उभे राहिले तरच या महिलांना रोजगार मिळते अन्यथा उपवास घडतो, या अडचणींवर मात करण्यासाठी असंघटित क्षेत्रातील महिलांची आर्थिक बाजू भक्कम होणे आवश्यक आहे. यासाठी या महिलांना रोजगार हमी आणि किमान वेतननिश्चिती मिळावी. कामगार कल्याण मंडळांतर्गत संघटित क्षेत्रातील महिला कामगारांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी काम केले जाते. हेच काम विस्तारून त्यात असंघटित क्षेत्रातील महिलांचाही समावेश करावा. - रेणुका कड, सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :WomenमहिलाMONEYपैसाgovernment schemeसरकारी योजनाState Governmentराज्य सरकार