शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कचरा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:34 IST

एक आठवडा झाला तरी शहरातील कचरा कोंडी फुटत नसल्याने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घातले. तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत मनपाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते

ठळक मुद्देआज पालकमंत्री येणार : नारेगाव आंदोलकांसोबत सायंकाळी चर्चा; कोंडी फुटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एक आठवडा झाला तरी शहरातील कचरा कोंडी फुटत नसल्याने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घातले. तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत मनपाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. तब्बल २० मिनिटे शहरातील कचरा प्रश्नावर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत शहरात दाखल होणार आहेत. नारेगाव येथील कचरा डेपोची पाहणी करून पालकमंत्री आंदोलक शेतकºयांसोबतही चर्चा करणार आहेत.मागील ७ दिवसांपासून मनपा प्रशासन, पदाधिकाºयांनी कचरा प्रश्नात तोडगा काढण्याचा बराच प्रयत्न केला. नारेगाव येथील आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने महापालिकेची मोठी कोंडी झाली. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे कचरा प्रश्नात शासनाने लक्ष घालावे अशी विनंती केली. पालकमंत्र्यांनी त्वरित मुख्यमंत्र्यांना शहरातील परिस्थितीची माहिती दिली. गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याचे निश्चित झाले. सकाळीच महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, आयुक्त डी. एम. मुगळीकर मुंबईला रवाना झाले. कॅबिनेटची बैठक संपताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबाद शहरातील कचराप्रश्नी बैठक घेतली. यावेळी पालकमंत्र्यांसह नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची उपस्थिती होती.सायंकाळी मुंबईहून परतल्यानंतर महापौर घोडेले यांनी बैठकीचा सविस्तर तपशील पत्रकारांना दिला. यावेळी त्यांनी नमूद केले की, मुख्यमंत्री शहरातील कचरा प्रश्नात प्रचंड सकारात्मक होते. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये मनपाने कचरा प्रश्नावर काय काम केले याची माहिती त्यांनी घेतली. शहरातील ओला व सुका कचरा १०० टक्के वेगळा केलाच पाहिजे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारायला हवी. सध्या मनपाने तयार केलेल्या डीपीआरनुसार सर्व यंत्रणा उभारण्यासाठी किमान चार महिने लागणार आहेत. सहा महिन्यांचा कालावधी आंदोलकांकडून वाढवून घ्यावा, असेही बैठकीत ठरले. मागील अनेक वर्षांपासून नारेगाव परिसरातील गावे कचºयाची दुर्गंधी सहन करीत आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आर्थिक मदतही देण्यास तयार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. उद्या पालकमंत्री डॉ. सावंत यांनी तातडीने औरंगाबादला जाऊन नारेगाव कचरा डेपोची पाहणी करावी, आंदोलकांसोबत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा, असेही फडणवीस यांनी नमूद केले.