शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

कचरा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:34 IST

एक आठवडा झाला तरी शहरातील कचरा कोंडी फुटत नसल्याने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घातले. तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत मनपाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते

ठळक मुद्देआज पालकमंत्री येणार : नारेगाव आंदोलकांसोबत सायंकाळी चर्चा; कोंडी फुटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एक आठवडा झाला तरी शहरातील कचरा कोंडी फुटत नसल्याने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घातले. तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत मनपाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. तब्बल २० मिनिटे शहरातील कचरा प्रश्नावर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत शहरात दाखल होणार आहेत. नारेगाव येथील कचरा डेपोची पाहणी करून पालकमंत्री आंदोलक शेतकºयांसोबतही चर्चा करणार आहेत.मागील ७ दिवसांपासून मनपा प्रशासन, पदाधिकाºयांनी कचरा प्रश्नात तोडगा काढण्याचा बराच प्रयत्न केला. नारेगाव येथील आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने महापालिकेची मोठी कोंडी झाली. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे कचरा प्रश्नात शासनाने लक्ष घालावे अशी विनंती केली. पालकमंत्र्यांनी त्वरित मुख्यमंत्र्यांना शहरातील परिस्थितीची माहिती दिली. गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याचे निश्चित झाले. सकाळीच महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, आयुक्त डी. एम. मुगळीकर मुंबईला रवाना झाले. कॅबिनेटची बैठक संपताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबाद शहरातील कचराप्रश्नी बैठक घेतली. यावेळी पालकमंत्र्यांसह नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची उपस्थिती होती.सायंकाळी मुंबईहून परतल्यानंतर महापौर घोडेले यांनी बैठकीचा सविस्तर तपशील पत्रकारांना दिला. यावेळी त्यांनी नमूद केले की, मुख्यमंत्री शहरातील कचरा प्रश्नात प्रचंड सकारात्मक होते. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये मनपाने कचरा प्रश्नावर काय काम केले याची माहिती त्यांनी घेतली. शहरातील ओला व सुका कचरा १०० टक्के वेगळा केलाच पाहिजे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारायला हवी. सध्या मनपाने तयार केलेल्या डीपीआरनुसार सर्व यंत्रणा उभारण्यासाठी किमान चार महिने लागणार आहेत. सहा महिन्यांचा कालावधी आंदोलकांकडून वाढवून घ्यावा, असेही बैठकीत ठरले. मागील अनेक वर्षांपासून नारेगाव परिसरातील गावे कचºयाची दुर्गंधी सहन करीत आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आर्थिक मदतही देण्यास तयार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. उद्या पालकमंत्री डॉ. सावंत यांनी तातडीने औरंगाबादला जाऊन नारेगाव कचरा डेपोची पाहणी करावी, आंदोलकांसोबत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा, असेही फडणवीस यांनी नमूद केले.