शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कचरा संकलनाच्या रिक्षाचे डिझाईन चुकीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:37 IST

शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा येणार असे मनपानेच जाहीर केले होते. शहरात दाखल झालेल्या रिक्षा मनपाच्या जुन्या रिक्षांप्रमाणेच आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व रिक्षा उघड्या आहेत. पावसाळ्यात कचरा जेवढा ओला होईल, त्याच्या वजनानुसार महापालिका कंत्राटदाराला पैसा देईल.

बंगळुरू येथील कंपनीने शहरात १ टन कचरा उचलला, तर महापालिका १८६३ रुपये देणार आहे. शहरात दररोज साधारण ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला मनपाने इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा तयार करून आणण्यास सांगितले होते. ओला व सुका कचरा टाकण्याची वेगळी व्यवस्था असावी. कंपनीने चार दिवसांपूर्वी ज्या रिक्षा आणल्या आहेत, त्या उघड्या आहेत. त्यावर ताडपत्री टाकण्यात येईल, अशी व्यवस्था आहे.

शहरात जमा झालेला कचरा कंपनी मनपाला वजन करून देणार आहे. पावसाळ्यात कचºयाचे वजन तीनपट होईल. महापालिकेने कंपनीला ३०० रिक्षा आणाव्यात, असे आदेशित केले आहे. मोजकीच वाहने सध्या कंपनीने आणली आहेत. ९०० कर्मचारी कंपनीला लागणार आहेत. प्रत्येक वाहनावर चालक, एक कर्मचारी, सुपरवायझर यांचा समावेश आहे.

शनिवारी करारमहापालिकेने कंपनीसोबत अंतिम करार शनिवारी केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती. कंपनीकडून मालक पी. गोपीनाथ रेड्डी, हर्षवर्धन रेड्डी यांची उपस्थिती होती. कंपनीने आणलेल्या वाहनांचे पासिंग लवकर करण्यात येईल. २६ जानेवारीपासून कचरा संकलनाला सुरुवात होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी नंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न