शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

कचरा संकलनाच्या रिक्षाचे डिझाईन चुकीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 17:37 IST

शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलनाचे काम महापालिकेने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. या कंपनीने आणलेल्या रिक्षांचे डिझाईन अत्यंत चुकीचे असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा येणार असे मनपानेच जाहीर केले होते. शहरात दाखल झालेल्या रिक्षा मनपाच्या जुन्या रिक्षांप्रमाणेच आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व रिक्षा उघड्या आहेत. पावसाळ्यात कचरा जेवढा ओला होईल, त्याच्या वजनानुसार महापालिका कंत्राटदाराला पैसा देईल.

बंगळुरू येथील कंपनीने शहरात १ टन कचरा उचलला, तर महापालिका १८६३ रुपये देणार आहे. शहरात दररोज साधारण ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला मनपाने इंदूर पॅटर्नप्रमाणे रिक्षा तयार करून आणण्यास सांगितले होते. ओला व सुका कचरा टाकण्याची वेगळी व्यवस्था असावी. कंपनीने चार दिवसांपूर्वी ज्या रिक्षा आणल्या आहेत, त्या उघड्या आहेत. त्यावर ताडपत्री टाकण्यात येईल, अशी व्यवस्था आहे.

शहरात जमा झालेला कचरा कंपनी मनपाला वजन करून देणार आहे. पावसाळ्यात कचºयाचे वजन तीनपट होईल. महापालिकेने कंपनीला ३०० रिक्षा आणाव्यात, असे आदेशित केले आहे. मोजकीच वाहने सध्या कंपनीने आणली आहेत. ९०० कर्मचारी कंपनीला लागणार आहेत. प्रत्येक वाहनावर चालक, एक कर्मचारी, सुपरवायझर यांचा समावेश आहे.

शनिवारी करारमहापालिकेने कंपनीसोबत अंतिम करार शनिवारी केला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती. कंपनीकडून मालक पी. गोपीनाथ रेड्डी, हर्षवर्धन रेड्डी यांची उपस्थिती होती. कंपनीने आणलेल्या वाहनांचे पासिंग लवकर करण्यात येईल. २६ जानेवारीपासून कचरा संकलनाला सुरुवात होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी नंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न