शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

कचरा संकलनास कंपन्या अनुत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:52 IST

महापालिकेत एकही प्रकल्प यशस्वी होत नाही. येथील राजकीय मंडळी कोणालाही काम करूच देत नाही, अशी कुख्याती सर्वदूर पसरली आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेने काढलेली सर्वात मोठी निविदा घेण्यास एकही कंपनी तयार नाही. त्यामुळे महापालिकेवर तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याची नामुष्की ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत एकही प्रकल्प यशस्वी होत नाही. येथील राजकीय मंडळी कोणालाही काम करूच देत नाही, अशी कुख्याती सर्वदूर पसरली आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेने काढलेली सर्वात मोठी निविदा घेण्यास एकही कंपनी तयार नाही. त्यामुळे महापालिकेवर तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याची नामुष्की ओढावली आहे. २४ आॅगस्टपर्यंत एका तरी कंपनीने निविदा भरावी, अशी प्रार्थना प्रशासनाकडून करण्यात येत आहे.शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडी झाली आहे. कचºयाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून राज्य शासनाने सढळ हाताने ९० कोटी रुपये मनपाला दिले आहेत. शहरातील कचरा संकलनासाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एकाही कंत्राटदाराने ही निविदा भरलेली नाही. शनिवारी महापालिकेला तिस-यांदा निविदा प्रसिद्ध करावी लागली.प्रत्येक घरातून कचरा जमा करण्याचे काम या कंत्राटदाराला देण्यात येईल. सध्या मनपा ३५० रिक्षा लावून कचरा संकलित करीत आहे. ११५ वॉर्डांतील प्रत्येक घरातील कचरा जमा करण्याचे दायित्व कंत्राटदारावर राहणार आहे. नागरिकांकडून महापालिका दररोज एक रुपयाप्रमाणे महिना ३० रुपये या कामाचे घेणार आहे. इंदूर मनपा २ रुपये एका मालमत्ताधारकांकडून वसूल करते. या अभिनव पद्धतीतून मनपाला दरवर्षी १५ कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.प्रकल्प अयशस्वी झाल्यास...२०१० मध्ये महापालिकेने हैदराबाद येथील रॅमकी कंपनीला शहरातील कचरा उचलण्याचे काम दिले होते. दरवर्षी फक्त १० कोटी रुपये देण्याचा करार झाला होता. कंपनीला हे काम परवडत नव्हते. तरीही कंपनी कोट्यवधी रुपयांची वाहने आणून काम करीत होती.महापालिकेने या कंपनीची अक्षरश: हकालपट्टी केली. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेत काम करण्यास देशभरातील मोठ्या कंपन्या तयार नाहीत. मनपा प्रशासनाने काही मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधून निविदा भरा, अशी विनंती केली आहे. मनपाच्या या विनंतीला अद्याप तरी प्रतिसाद मिळालेला नाही.कोट्यवधींची गुंतवणूकशहरातील तब्बल ३ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांकडून दररोज कचरा संकलनासाठीकंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. प्रत्येक वॉर्डात ४ पेक्षा अधिक रिक्षा, अत्याधुनिक वाहने आणावी लागतील. जमा झालेला ओला व सुका कचरा चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रक्रिया केंद्रावर नेऊन टाकण्याचे काम कंत्राटदाराला करावे लागणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका