शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

कचरा संकलनास कंपन्या अनुत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:52 IST

महापालिकेत एकही प्रकल्प यशस्वी होत नाही. येथील राजकीय मंडळी कोणालाही काम करूच देत नाही, अशी कुख्याती सर्वदूर पसरली आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेने काढलेली सर्वात मोठी निविदा घेण्यास एकही कंपनी तयार नाही. त्यामुळे महापालिकेवर तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याची नामुष्की ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत एकही प्रकल्प यशस्वी होत नाही. येथील राजकीय मंडळी कोणालाही काम करूच देत नाही, अशी कुख्याती सर्वदूर पसरली आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेने काढलेली सर्वात मोठी निविदा घेण्यास एकही कंपनी तयार नाही. त्यामुळे महापालिकेवर तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याची नामुष्की ओढावली आहे. २४ आॅगस्टपर्यंत एका तरी कंपनीने निविदा भरावी, अशी प्रार्थना प्रशासनाकडून करण्यात येत आहे.शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडी झाली आहे. कचºयाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून राज्य शासनाने सढळ हाताने ९० कोटी रुपये मनपाला दिले आहेत. शहरातील कचरा संकलनासाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एकाही कंत्राटदाराने ही निविदा भरलेली नाही. शनिवारी महापालिकेला तिस-यांदा निविदा प्रसिद्ध करावी लागली.प्रत्येक घरातून कचरा जमा करण्याचे काम या कंत्राटदाराला देण्यात येईल. सध्या मनपा ३५० रिक्षा लावून कचरा संकलित करीत आहे. ११५ वॉर्डांतील प्रत्येक घरातील कचरा जमा करण्याचे दायित्व कंत्राटदारावर राहणार आहे. नागरिकांकडून महापालिका दररोज एक रुपयाप्रमाणे महिना ३० रुपये या कामाचे घेणार आहे. इंदूर मनपा २ रुपये एका मालमत्ताधारकांकडून वसूल करते. या अभिनव पद्धतीतून मनपाला दरवर्षी १५ कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.प्रकल्प अयशस्वी झाल्यास...२०१० मध्ये महापालिकेने हैदराबाद येथील रॅमकी कंपनीला शहरातील कचरा उचलण्याचे काम दिले होते. दरवर्षी फक्त १० कोटी रुपये देण्याचा करार झाला होता. कंपनीला हे काम परवडत नव्हते. तरीही कंपनी कोट्यवधी रुपयांची वाहने आणून काम करीत होती.महापालिकेने या कंपनीची अक्षरश: हकालपट्टी केली. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेत काम करण्यास देशभरातील मोठ्या कंपन्या तयार नाहीत. मनपा प्रशासनाने काही मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधून निविदा भरा, अशी विनंती केली आहे. मनपाच्या या विनंतीला अद्याप तरी प्रतिसाद मिळालेला नाही.कोट्यवधींची गुंतवणूकशहरातील तब्बल ३ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांकडून दररोज कचरा संकलनासाठीकंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. प्रत्येक वॉर्डात ४ पेक्षा अधिक रिक्षा, अत्याधुनिक वाहने आणावी लागतील. जमा झालेला ओला व सुका कचरा चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रक्रिया केंद्रावर नेऊन टाकण्याचे काम कंत्राटदाराला करावे लागणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका