शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

औरंगाबादच्या वसतिगृहातही जाळला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:32 IST

आमखास मैदानाच्या जवळील अण्णाभाऊ साठे वसतिगृहातील विविध खोल्यांमध्ये महापालिकेने मागील दोन महिन्यांपासून सुका कचरा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. दररोज रात्री या कचऱ्याला आग लावण्याचे काम करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहाला कच-याचे डम्पिंग यार्ड बनविण्यात आल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे कृत्य: अण्णाभाऊ साठे वसतिगृहात दररोज रात्री आग लावण्याचे प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आमखास मैदानाच्या जवळील अण्णाभाऊ साठे वसतिगृहातील विविध खोल्यांमध्ये महापालिकेने मागील दोन महिन्यांपासून सुका कचरा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. दररोज रात्री या कचऱ्याला आग लावण्याचे काम करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहाला कच-याचे डम्पिंग यार्ड बनविण्यात आल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे.मातंग, मागासवर्गीय गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना राहण्याची सोय व्हावी या उदात्त हेतूने आमखास मैदानाजवळ भव्य वसतिगृह उभारण्यात आले. १९९९ मध्ये या वसतिगृहाचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. येथे राहणाºया विद्यार्थ्यांना कोणत्याच मूलभूत सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. मजबुरीने अनेक वर्षे विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात राहणे पसंत केले. पिण्याचे पाणी नाही, दरवाजे, खिडक्या तुटलेल्या, शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने अलीकडेच हे वसतिगृह बंद पडले. वसतिगृह परत सुरू करण्यासाठी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रयत्नही सुरू केले होते. मागील दोन महिन्यांपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. वॉर्ड अधिकाºयांवर कचरा उचलण्यासंदर्भात दररोज राजकीय दबाव येत आहे. वेगवेगळ्या वॉर्डांमधून उचलण्यात आलेला सुका कचरा ठेवायचा कुठे हा सर्वात मोठा प्रश्न होता. वॉर्ड अधिकारीही हा कचरा जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे गायब करू लागले. झोन क्रमांक १ अंतर्गत काही कचरा ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये लपवून ठेवल्याचे मागील आठवड्यात उघडकीस आले. मनपाचे बिंग फुटल्यानंतर टाऊन हॉलमधील कचरा उचलण्यात आला. आता आमखास मैदानाजवळील अण्णाभाऊ साठे वसतिगृहात वॉर्ड अधिकाºयांनी डम्पिंग यार्ड तयार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महापालिका अधिकाºयांनी वसतिगृहात फक्त कचरा साठवून ठेवला नाही, तर तेथील प्रत्येक खोलीत दररोज रात्री आग लावण्याचे ‘पाप’ही केले आहे. वसतिगृहातील सर्व भिंती धुराने काळवंडल्या आहेत. आगीने खोल्यांमधील विजेच्या तारा, दरवाजे, खिडक्याही जळून खाक झाल्या आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या मालमत्तेला आग लावल्याप्रकरणी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.कचरा उचलून माफी मागावीशिवसेनेचे उपविभागप्रमुख संदीप चांदणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी महापौरांची भेट घेतली. त्यांना अण्णाभाऊ साठे वसतिगृहात कचरा टाकण्यात येत असून, तो जाळण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. वसतिगृहातील कचरा महापालिकेने त्वरित काढून घ्यावा व मातंग समाजाची जाहीर माफी मागावी, वसतिगृहाचा वापर पुन्हा सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी लक्ष्मण लोखंडे, प्रल्हाद मिसाळ, गणेश रोकडे, नीलेश शिंदे, कृष्णा शिंदे, आकाश कांबळे, शंकर ताकवाले, किशोर रोकडे, विकास चांदणे आदींची उपस्थित होती.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका