शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

औरंगाबादमधील कचरा अज्ञातस्थळी रवाना,मनपा म्हणते तीन दिवसांत सर्व कचरा उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 19:36 IST

पावसामुळे सडणारा कचरा व त्याच्या प्रचंड दुर्गंधीने त्रस्त नागरिकांचा संयम ढळू लागताच सोमवारी मध्यरात्रीपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली.

ठळक मुद्दे मंगळवारी दिवसभरात २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आल्याचा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला

औरंगाबाद : पावसामुळे सडणारा कचरा व त्याच्या प्रचंड दुर्गंधीने त्रस्त नागरिकांचा संयम ढळू लागताच सोमवारी मध्यरात्रीपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये मागील दोन महिन्यांपासून साचलेला तब्बल दहा हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यास सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभरात २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आल्याचा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला; पण  हा कचरा नेमका कोठे नेण्यात येत आहे, यावर त्यांनी मौन बाळगले. 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एप्रिल महिन्यात शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत शहरातील कचरा उचलून हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव आदी भागात नेऊन टाकण्यात आला होता. १ मेपासून शहरातील कचरा उचलणे बंद होते. त्यामुळे जिकडे तिकडे कचऱ्याचे डोंगरच उभे राहिले.  

मध्यरात्रीपासून सुरुवातशहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचरा सोमवारी मध्यरात्रीपासून उचलणे सुरू होते. मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत कचरा उचलून अज्ञातस्थळी रवाना करण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सकाळी मध्यवर्ती जकात नाका येथे पाहणी केली. त्यानंतर पुन्हा कचरा उचलणे सुरू झाले. औरंगपुरा, किलेअर्क, पदमपुरा, समर्थनगर आदी भागातील किमान २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आला. हा कचरा ३० पेक्षा अधिक वाहनांमध्ये भरून पाठविला. हा कचरा टाकण्यासाठी महापालिकेने दोन स्थळांचा शोध घेतला आहे.  कचरा कुठे टाकतोय हे   सांगितल्यावर पंचक्रोशीतील नागरिक विरोध करतात. त्यामुळे आम्ही ही बाब गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी नमूद केले.

काहीही करा, पण कचऱ्यावर प्रक्रिया करून द्यामहापालिकेने जंगजंग पछाडल्यानंतरही नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून द्यायला तयार नाहीत. घंटागाडी पाठवूनही नागरिक रस्त्यावर मिक्स कचरा टाकतच आहेत. मागील दोन महिन्यांपासून कचरा न उचलल्याने २० ते २५ हजार मेट्रिक टन कचरा ठिकठिकाणी पडून आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. सोमवारी कंपन्या आपला डेमो सादर करतील. त्यानंतर लगेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे तात्पुरते काम देण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. साडेचार महिन्यांत महापालिकेने कचरा प्रश्नावर ठोस निर्णयच घेतला नाही.

आणीबाणीमुळे घेतला निर्णयकचरा प्रश्नात औरंगाबादकर कमालीचे संतप्त होत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने मंगळवारी तातडीने विविध कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती जकात नाका, चिकलठाणा, हर्सूल येथे पडून असलेल्या कचऱ्यावर त्वरित कंपन्यांनी प्रक्रिया करून द्यावी. दररोज निघणाऱ्या कचऱ्यावरही प्रक्रिया करण्याचे दायित्व कंपन्यांवर सोपविण्यात येणार आहे. 

जकात नाक्यावर डेमोसोमवार ९ जुलै रोजी देशभरातील कंपन्यांना डेमो सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. सध्या पडून असलेल्या मिक्स कचऱ्यावर प्रक्रिया करून दाखवावी, अशी विनंती करण्यात येणार आहे. चांगला डेमो असलेल्या कंपनीला जागेवरच काम देण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद