शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील कचरा अज्ञातस्थळी रवाना,मनपा म्हणते तीन दिवसांत सर्व कचरा उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 19:36 IST

पावसामुळे सडणारा कचरा व त्याच्या प्रचंड दुर्गंधीने त्रस्त नागरिकांचा संयम ढळू लागताच सोमवारी मध्यरात्रीपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली.

ठळक मुद्दे मंगळवारी दिवसभरात २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आल्याचा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला

औरंगाबाद : पावसामुळे सडणारा कचरा व त्याच्या प्रचंड दुर्गंधीने त्रस्त नागरिकांचा संयम ढळू लागताच सोमवारी मध्यरात्रीपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये मागील दोन महिन्यांपासून साचलेला तब्बल दहा हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यास सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभरात २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आल्याचा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला; पण  हा कचरा नेमका कोठे नेण्यात येत आहे, यावर त्यांनी मौन बाळगले. 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एप्रिल महिन्यात शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत शहरातील कचरा उचलून हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव आदी भागात नेऊन टाकण्यात आला होता. १ मेपासून शहरातील कचरा उचलणे बंद होते. त्यामुळे जिकडे तिकडे कचऱ्याचे डोंगरच उभे राहिले.  

मध्यरात्रीपासून सुरुवातशहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचरा सोमवारी मध्यरात्रीपासून उचलणे सुरू होते. मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत कचरा उचलून अज्ञातस्थळी रवाना करण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सकाळी मध्यवर्ती जकात नाका येथे पाहणी केली. त्यानंतर पुन्हा कचरा उचलणे सुरू झाले. औरंगपुरा, किलेअर्क, पदमपुरा, समर्थनगर आदी भागातील किमान २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आला. हा कचरा ३० पेक्षा अधिक वाहनांमध्ये भरून पाठविला. हा कचरा टाकण्यासाठी महापालिकेने दोन स्थळांचा शोध घेतला आहे.  कचरा कुठे टाकतोय हे   सांगितल्यावर पंचक्रोशीतील नागरिक विरोध करतात. त्यामुळे आम्ही ही बाब गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी नमूद केले.

काहीही करा, पण कचऱ्यावर प्रक्रिया करून द्यामहापालिकेने जंगजंग पछाडल्यानंतरही नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून द्यायला तयार नाहीत. घंटागाडी पाठवूनही नागरिक रस्त्यावर मिक्स कचरा टाकतच आहेत. मागील दोन महिन्यांपासून कचरा न उचलल्याने २० ते २५ हजार मेट्रिक टन कचरा ठिकठिकाणी पडून आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. सोमवारी कंपन्या आपला डेमो सादर करतील. त्यानंतर लगेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे तात्पुरते काम देण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. साडेचार महिन्यांत महापालिकेने कचरा प्रश्नावर ठोस निर्णयच घेतला नाही.

आणीबाणीमुळे घेतला निर्णयकचरा प्रश्नात औरंगाबादकर कमालीचे संतप्त होत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने मंगळवारी तातडीने विविध कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती जकात नाका, चिकलठाणा, हर्सूल येथे पडून असलेल्या कचऱ्यावर त्वरित कंपन्यांनी प्रक्रिया करून द्यावी. दररोज निघणाऱ्या कचऱ्यावरही प्रक्रिया करण्याचे दायित्व कंपन्यांवर सोपविण्यात येणार आहे. 

जकात नाक्यावर डेमोसोमवार ९ जुलै रोजी देशभरातील कंपन्यांना डेमो सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. सध्या पडून असलेल्या मिक्स कचऱ्यावर प्रक्रिया करून दाखवावी, अशी विनंती करण्यात येणार आहे. चांगला डेमो असलेल्या कंपनीला जागेवरच काम देण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद