शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:26 IST

अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यंदा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी उसणवारी करुन जून महिन्यात कापूस, मका, बाजरी आदींची पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे पिके पाण्याअभावी करपली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकºयांना विहिरी, बोअरचे पाणी देऊन या हंगामातील पिके कशी-बशी जगविली होती. यानंतर महिनाभरानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने पिकांना जिवदान मिळाले. मात्र, संपूर्ण पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उत्पादनाची मोठ्या प्रमाणात घट झाली असून, शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. खरीप हंगामात जेमतेम उत्पादन झाल्याने कर्ज व उसणवारी केलेले पैसे कसे फेडावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. परिसरातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पासह अनेक गावांतील पाझर तलावात जलसाठा न झाल्यामुळे शेतकºयांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. परतीच्या पावसानेही दगा दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याची भिती शेतकºयातून वर्तविली जात आहे.महसूल विभागातर्फे गंगापूर तालुक्यात पीक पाहणी केली असता तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गंगापूर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी निवदेनात करण्यात आली आहे. निवेदनावर युवक काँग्रेसचे महासचिव सय्यद अलीम यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद