शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:26 IST

अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वाळूज महानगर : अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यंदा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी उसणवारी करुन जून महिन्यात कापूस, मका, बाजरी आदींची पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे पिके पाण्याअभावी करपली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकºयांना विहिरी, बोअरचे पाणी देऊन या हंगामातील पिके कशी-बशी जगविली होती. यानंतर महिनाभरानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने पिकांना जिवदान मिळाले. मात्र, संपूर्ण पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उत्पादनाची मोठ्या प्रमाणात घट झाली असून, शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. खरीप हंगामात जेमतेम उत्पादन झाल्याने कर्ज व उसणवारी केलेले पैसे कसे फेडावे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. परिसरातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पासह अनेक गावांतील पाझर तलावात जलसाठा न झाल्यामुळे शेतकºयांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. परतीच्या पावसानेही दगा दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याची भिती शेतकºयातून वर्तविली जात आहे.महसूल विभागातर्फे गंगापूर तालुक्यात पीक पाहणी केली असता तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गंगापूर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी निवदेनात करण्यात आली आहे. निवेदनावर युवक काँग्रेसचे महासचिव सय्यद अलीम यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद