शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

मातीच्या मूर्तींचे बुकिंग होते ‘हाऊसफुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 19:06 IST

गणेशोत्सव : पर्यावरणपूरक उत्सवाकडे औरंगाबादकरांचा कल

ठळक मुद्देशाडू मातीच्या मूर्तींचे शहरात १० ते १५ स्टॉलअनेकांना हात हलवतच परत यावे लागले. 

औरंगाबाद : शाडू मातीच्या गणेशमूर्ती घेण्यासाठी आधीपासूनच नावनोंदणी करावी लागते; परंतु बऱ्याच जणांना ही बाब माहिती नसल्यामुळे किंवा ऐनवेळी गेलो तरी गणेशमूर्ती निश्चितच मिळेल, या गैरसमजामुळे शाडू मातीच्या गणेशमूर्ती घेण्यासाठी गेलेल्या बऱ्याच गणेशभक्तांना सर्व मूर्तींचे ‘हाऊसफुल’ बुकिंग झालेले दिसून आले. 

ही बाब औरंगाबादकरांसाठी निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे पर्यावरणपूरकगणेशोत्सव साजरा करण्यासाठी औरंगाबादकरांची झपाट्याने वाटचाल सुरू आहे हे दिसून येते. सोमवारी अनेक गणेशभक्तांना हा अनुभव आला. पर्यावरणपूरकगणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपलाही हातभार लागावा, यासाठी अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तिकारांचे स्टॉल गाठले; पण तेथील सर्वच मूर्ती अगोदरपासूनच आरक्षित झालेल्या असल्यामुळे अनेकांना हात हलवतच परत यावे लागले. 

शाडू मातीच्या मूर्तींचे शहरात १० ते १५ स्टॉल असून बहुतांश स्टॉलवर ही परिस्थिती दिसून आली. यावर्षी पहिल्यांदाच शाडू मातीचा गणपती घेण्यासाठी गेलो; पण येथील आरक्षित केलेले गणपती पाहून औरंगाबादकर पर्यावरणपे्रमी होत आहेत, हे कळले. चार ते पाच स्टॉलवर फिरूनही यावर्षी आम्हाला शाडू मातीचा गणपती मिळू शकला नाही. त्यामुळे नाईलाजाने प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती घेतली; पण पुढच्या वर्षी मात्र निश्चितपणे अगोदरच बुकिंग करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घेणार, असे मनोगत एका गणेशभक्ताने व्यक्त केले. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण