शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

पाथरी आगारात विद्यार्थिनींची गांधीगिरी

By admin | Updated: July 12, 2014 01:12 IST

पाथरी : मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रत्येक तालुकास्तरावर राज्य शासनाने पाच बसेस उपलब्ध करून दिल्या असल्या तरी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना बसच मिळत नाहीत.

पाथरी : मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रत्येक तालुकास्तरावर राज्य शासनाने पाच बसेस उपलब्ध करून दिल्या असल्या तरी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना बसच मिळत नाहीत. ११ जुलै रोजी सकाळी १० च्या सुमारास खेर्डा पाटीवर मुली बसमध्ये प्रवास करण्यासाठी उभ्या असतानाही चालकाने बस न थांबविल्याने अखेर या मुलींनी पाथरी आगार व्यवस्थापकाची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून गांधीगिरी केली. मागील तीन वर्षांपासून राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील मुलींना शहरामध्ये शिक्षणासाठी येण्यासाठी सोय व्हावी म्हणून बसेस उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली. प्रत्येक तालुकास्तरावर ग्रामीण भागाचे मार्ग ठरवून देऊन मानव विकासाच्या बसचा आराखडा तयार करण्यात येतो. शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर कोणी नियंत्रण ठेवायचे? हा गहण प्रश्न आहे. आगाराचे कर्मचारी मनमानी करतात, शिक्षण विभागाला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, पंचायत समितीचे सोयरसूतक नाही आणि शाळेची काही जबाबदारी नाही म्हणून याबाबत कोणीच जबाबदारी घेण्यास तयार नाही. ११ जुलै रोजी पाथरी आगाराची नाथरा-पाथरी ही बस खेर्डामार्गे पाथरीकडे येत होती. खेर्डा पाटीवर या बसची वाट पाहत अनेक विद्यार्थिनी थांबल्या होत्या. परंतु चालकाने या पाटीवर बसच उभी केली नाही. गावातील ग्रा. पं. सदस्य सुरेश आमले आणि विकास वायेळ यांनी या बसचा पाठलाग करून बस पुन्हा खेर्डा पाटीवर परत आणली. याबसमध्ये बसून या विद्यार्थिनींना थेट आगार व्यवस्थापकाकडे नेण्यात आले. (वार्ताहर)शाळेसाठी विद्यार्थिनी रस्त्यावरदररोज शाळेत येण्यासाठी उशिर होत आहे. मानव विकासच्या बस पाटीवर थांबविल्या जात नाही. शासनाचा या योजनेचा लाभच होत नसल्याने या बसमधील संगीता सिताफळे, जना लांडगे, यशोदा सिताफळे, राधा सिताफळे, शिल्पा भाग्यवंत, साक्षी आमले, भालके यांनी डेपो मॅनेजर मोेरे यांचा हार घालून गांधीगिरीने सत्कार केला. तसेच यावेळी सदाशिव थोरात, राहूल ढगे, के.प् ाी. पांढरे, बालासाहेब डख, जम्मू खान पठाण यांंनी डेपो मॅनेजरसोबत चर्चा करून बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली. पाथरी तालुक्यातील खेर्डा पाटीवर मानव विकासची बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थिनींनी आगार व्यवस्थापकास हार घालून गांधीगिरी करून आपल्या व्यथा मांडल्या.