शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ; संवेदनशील जायकवाडी धरण दहा दिवसांपासून अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 19:43 IST

थकीत बिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने धरण नियंत्रण कक्षात मेणबत्ती लावून कामकाज सुरू आहे.

पैठण (औरंगाबाद) : मराठवाड्याची लाईफ लाईन व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेले जायकवाडी धरण गेल्या दहा दिवसांपासून अंधारात आहे. एक लाखांचे बिल थकल्याने महावितरणने टोकाची असंवेदनशील भूमिका घेत थेट धरणाचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. 

जून महिन्यापासून धरणात आवक होते, त्या दृष्टीने धरणावर अनेक उपाय योजना केल्या जातात. या कालावधीत धरणावर बारीक लक्ष ठेवले जाते. मात्र, थकीत बिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने धरण नियंत्रण कक्षात मेणबत्ती लावून कामकाज सुरू आहे. जायकवाडी धरणाचे नियमित बील अदा करण्यात येते. महामंडळाच्या कार्यवाहीत एखादे बील भरण्यास थोडा विलंब होऊ शकतो राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन जायकवाडी धरणावरील विद्युत पुरवठा खंडीत करू नये, असे लेखी पत्र जायकवाडी प्रशासनाने महावितरण कंपनीला दिलेले आहे. परंतु या पत्राला केराची टोपली दाखवत जानेवारी महिन्यात सुध्दा धरणाचा पुरवठा खंडीत करण्यात आला होता. धरण सुरक्षेचे गांभीर्य लक्षात न घेता थेट विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. 

बिल भरले आता रिकनेक्शन चार्जेस भरा....दरम्यान, धरणाचे थकीत वीज बील अदा करण्यात आले आहे. परंतु, आता रिकनेक्शन जार्जेस भरा तरच विद्युत पुरवठा जोडण्यात येईल अशी भूमिका महावितरणने घेतल्याने बिल भरूनही धरण परिसर अंधारात आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे महावितरण कंपनीला काही देणेघेणे नाही का? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. 

जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे...धरण सुरक्षितता कायदा २०२१ नुसार मर्मस्थळ म्हणून घोषित केलेल्या धरणाचा विद्युतपुरवठा खंडीत करता येत नाही. धरण सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी महावितरण कंपनीस सूचना द्याव्यात अशी मागणी जेष्ठ समाजसेवक दिनेश पारीख यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणmahavitaranमहावितरण