शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ; संवेदनशील जायकवाडी धरण दहा दिवसांपासून अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 19:43 IST

थकीत बिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने धरण नियंत्रण कक्षात मेणबत्ती लावून कामकाज सुरू आहे.

पैठण (औरंगाबाद) : मराठवाड्याची लाईफ लाईन व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेले जायकवाडी धरण गेल्या दहा दिवसांपासून अंधारात आहे. एक लाखांचे बिल थकल्याने महावितरणने टोकाची असंवेदनशील भूमिका घेत थेट धरणाचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. 

जून महिन्यापासून धरणात आवक होते, त्या दृष्टीने धरणावर अनेक उपाय योजना केल्या जातात. या कालावधीत धरणावर बारीक लक्ष ठेवले जाते. मात्र, थकीत बिलामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने धरण नियंत्रण कक्षात मेणबत्ती लावून कामकाज सुरू आहे. जायकवाडी धरणाचे नियमित बील अदा करण्यात येते. महामंडळाच्या कार्यवाहीत एखादे बील भरण्यास थोडा विलंब होऊ शकतो राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन जायकवाडी धरणावरील विद्युत पुरवठा खंडीत करू नये, असे लेखी पत्र जायकवाडी प्रशासनाने महावितरण कंपनीला दिलेले आहे. परंतु या पत्राला केराची टोपली दाखवत जानेवारी महिन्यात सुध्दा धरणाचा पुरवठा खंडीत करण्यात आला होता. धरण सुरक्षेचे गांभीर्य लक्षात न घेता थेट विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. 

बिल भरले आता रिकनेक्शन चार्जेस भरा....दरम्यान, धरणाचे थकीत वीज बील अदा करण्यात आले आहे. परंतु, आता रिकनेक्शन जार्जेस भरा तरच विद्युत पुरवठा जोडण्यात येईल अशी भूमिका महावितरणने घेतल्याने बिल भरूनही धरण परिसर अंधारात आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे महावितरण कंपनीला काही देणेघेणे नाही का? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. 

जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे...धरण सुरक्षितता कायदा २०२१ नुसार मर्मस्थळ म्हणून घोषित केलेल्या धरणाचा विद्युतपुरवठा खंडीत करता येत नाही. धरण सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी महावितरण कंपनीस सूचना द्याव्यात अशी मागणी जेष्ठ समाजसेवक दिनेश पारीख यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणmahavitaranमहावितरण