शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

उजाड झालेल्या देवगिरी कारखान्याचे भविष्य अधांतरी

By admin | Updated: May 12, 2015 00:54 IST

फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने उजाड झाला आहे. त्यामुळे आता कारखान्याचे भविष्य अधांतरी झाले आहे.

फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने उजाड झाला आहे. त्यामुळे आता कारखान्याचे भविष्य अधांतरी झाले आहे. कारखाना बंद झाल्यामुळे सुमारे साडेसातशे कर्मचारी बेघर झाले आहेत. अनेकांना पोटासाठी स्थलांतर करावे लागले आहे. शेतकऱ्यांच्या उसालाही कोणी वाली राहिलेला नाही.फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखाना १९९३ साली अस्तित्वात आला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून डॉ. नामदेवराव गाडेकर होते. ९४-९५ साली कारखान्याने पहिले गाळप केले. या काळात कारखाना परिसरात उसाचे क्षेत्र भक्कम होते. त्यामुळे कारखाना पाच वर्षे व्यवस्थित चालला; पण त्यानंतर कारखान्याला ग्रहण लागले. अचानक दुसऱ्याच्या हाती कारखाना गेला. पुढे प्रशासक नेमला गेला. यामुळे कारखान्याची अधोगती झाली. वीस वर्षांच्या कार्यकाळात कारखाना केवळ आठ वर्षे व्यवस्थित चालला. मध्यंतरी क्षमतेपेक्षा कमी गाळप झाल्याने कारखाना आर्थिकदृष्ट्या तोट्यात आला. या काळात मशिनरीवर गंज चढला, साहित्याची चोरी झाली. आता कारखाना परिसर उजाड झाला आहे.कारखाना सुरू करण्याची ओरड नाहीदेवगिरी साखर कारखान्याचे फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. कारखाना बंद झाल्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले. मात्र, त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कधीही आवाज उठविला नाही. याचा परिणाम होऊन उसाचे क्षेत्र घटले; पण कारखाना काही सुरू झाला नाही. आता केवळ एक लाख टन ऊस आहे. कर्मचाऱ्यांनी पगार मिळावा म्हणून अनेक वेळा आंदोलने केली.