शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

निधी तर भरमसाठ मिळाला; पण खर्चासाठी ग्रामपंचायतींसमोर पेच

By विजय सरवदे | Updated: January 21, 2024 11:30 IST

जानेवारी अखेरपर्यंत ५० टक्के निधी खर्चाची अट

छत्रपती संभाजीनगर : पंधराव्या वित्त आयोगाच्या बंधित व अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ६४ कोटी २८ लाख ७० हजार रुपये एवढा निधी मिळाला आहे. मात्र, जानेवारी अखेरपर्यंत ५० टक्के निधी खर्च करण्याची अट सरपंचांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एवढ्या कमी कालावधीत कामांचे नियोजन आणि खर्च कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

जिल्ह्यातील ८५८ ग्रामपंचायतींच्या खात्यावर बंधित निधीचा पहिला हप्ता ऑक्टोबरमध्ये, तर अबंधित निधीचा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा झाला. वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या विकास आराखड्यातील कामावर तो खर्च करायचा आहे. दरम्यान, अनेक ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच नव्याने निवडून आले आहेत. त्यामुळे कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे आणि त्याचे नियोजन कसे करायचे, यावरच त्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे. तथापि, भरमसाठ निधी तर मिळाला; पण एवढ्या कमी अवधीत ५० टक्के रक्कम कशी खर्च करता येईल, हा प्रश्न अनेक सरपंचांना सतावत आहे.

हा निधी शासनाने चार-पाच महिने अगोदर दिला असता, तर कामांचे नियोजन व खर्च करण्यास भरपूर वेळ मिळाला असता, असा सूर सरपंचांच्या चर्चेतून निघाला आहे. अनेक सरपंच नवखे आहेत. त्यांच्या मनात शासकीय निधी खर्च करण्याची भीती आहे. किमान मार्च अखेरपर्यंत मुदत द्यायला हवी होती, असे सरपंचांचे म्हणणे आहे. विकास आराखड्यात समावेश नसलेल्या कामांसाठी ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागणार आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

पुरेसा वेळ दिला पाहिजे होतापिसादेवी ग्रामपंचायतीचे सरपंच आजीनाथ धामणे म्हणाले की, १५ व्या वित्त आयोगाचा निधी चार-पाच महिन्यांपूर्वीच द्यायला हवा होता. निधी मिळाला म्हणून कुठेही खर्च कसा करता येईल? शासकीय निधीचा ताळेबंद लागला पाहिजे. यासाठी शासनाने खर्चासाठी पुरेसा अवधी देणे अपेक्षित आहे.

बंधित व अबंधित निधीचा पहिला हप्तातालुका - ग्रामपंचायती - निधीछत्रपती संभाजीनगर : ११४ - १० कोटी ९ लाख २७ हजारफुलंब्री : ७१ - ४ कोटी ३८ लाख २ हजारसिल्लोड : १०४ - ८ कोटी ८४ लाख ३७ हजारसोयगाव : ४५ - ३ कोटी ६ लाख ८७ हजारकन्नड : १३७ - ८ कोटी ७७ लाख ४ हजारखुलताबाद : ३८ - २ कोटी ९० लाख ३२ हजारगंगापूर : १०७ - ९ कोटी ३७ लाख १७ हजारवैजापूर : १३३ - ७ कोटी ८९ लाख ७५ हजारपैठण : १०९ - ८ कोटी ९५ लाख ८९ हजार

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत