शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

निधी तर भरमसाठ मिळाला; पण खर्चासाठी ग्रामपंचायतींसमोर पेच

By विजय सरवदे | Updated: January 21, 2024 11:30 IST

जानेवारी अखेरपर्यंत ५० टक्के निधी खर्चाची अट

छत्रपती संभाजीनगर : पंधराव्या वित्त आयोगाच्या बंधित व अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ६४ कोटी २८ लाख ७० हजार रुपये एवढा निधी मिळाला आहे. मात्र, जानेवारी अखेरपर्यंत ५० टक्के निधी खर्च करण्याची अट सरपंचांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एवढ्या कमी कालावधीत कामांचे नियोजन आणि खर्च कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

जिल्ह्यातील ८५८ ग्रामपंचायतींच्या खात्यावर बंधित निधीचा पहिला हप्ता ऑक्टोबरमध्ये, तर अबंधित निधीचा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा झाला. वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या विकास आराखड्यातील कामावर तो खर्च करायचा आहे. दरम्यान, अनेक ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच नव्याने निवडून आले आहेत. त्यामुळे कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे आणि त्याचे नियोजन कसे करायचे, यावरच त्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे. तथापि, भरमसाठ निधी तर मिळाला; पण एवढ्या कमी अवधीत ५० टक्के रक्कम कशी खर्च करता येईल, हा प्रश्न अनेक सरपंचांना सतावत आहे.

हा निधी शासनाने चार-पाच महिने अगोदर दिला असता, तर कामांचे नियोजन व खर्च करण्यास भरपूर वेळ मिळाला असता, असा सूर सरपंचांच्या चर्चेतून निघाला आहे. अनेक सरपंच नवखे आहेत. त्यांच्या मनात शासकीय निधी खर्च करण्याची भीती आहे. किमान मार्च अखेरपर्यंत मुदत द्यायला हवी होती, असे सरपंचांचे म्हणणे आहे. विकास आराखड्यात समावेश नसलेल्या कामांसाठी ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागणार आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

पुरेसा वेळ दिला पाहिजे होतापिसादेवी ग्रामपंचायतीचे सरपंच आजीनाथ धामणे म्हणाले की, १५ व्या वित्त आयोगाचा निधी चार-पाच महिन्यांपूर्वीच द्यायला हवा होता. निधी मिळाला म्हणून कुठेही खर्च कसा करता येईल? शासकीय निधीचा ताळेबंद लागला पाहिजे. यासाठी शासनाने खर्चासाठी पुरेसा अवधी देणे अपेक्षित आहे.

बंधित व अबंधित निधीचा पहिला हप्तातालुका - ग्रामपंचायती - निधीछत्रपती संभाजीनगर : ११४ - १० कोटी ९ लाख २७ हजारफुलंब्री : ७१ - ४ कोटी ३८ लाख २ हजारसिल्लोड : १०४ - ८ कोटी ८४ लाख ३७ हजारसोयगाव : ४५ - ३ कोटी ६ लाख ८७ हजारकन्नड : १३७ - ८ कोटी ७७ लाख ४ हजारखुलताबाद : ३८ - २ कोटी ९० लाख ३२ हजारगंगापूर : १०७ - ९ कोटी ३७ लाख १७ हजारवैजापूर : १३३ - ७ कोटी ८९ लाख ७५ हजारपैठण : १०९ - ८ कोटी ९५ लाख ८९ हजार

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत