शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तहसील खात्यावर निधी वर्ग

By admin | Updated: March 27, 2016 23:57 IST

परभणी : खरीप २०१५ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तहसील कार्यालयांनी नोंदविलेल्या मागणीनुसार ३० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला

परभणी : खरीप २०१५ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तहसील कार्यालयांनी नोंदविलेल्या मागणीनुसार ३० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी पाथरी व मानवत हे दोन तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील तहसीलदारांच्या खात्यावर हा निधी वर्ग केला आहे़ त्यामुळे लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप सुरू होणार आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने ४०० कोटी रुपयांची मागणी नोंदविली होती़ त्यानुसार आतापर्यंत १८५ कोटी ७५ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत़ प्राप्त अनुदानापैकी बहुतांश अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे़ खरीप २०१५ च्या हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वाटप सुरू असताना अनेक शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिले असल्याने प्रत्येक तहसील कार्यालयाने वाढीव अनुदानाची मागणी केली होती़ त्यानुसार जिल्हाभरातून ५५ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती़ त्या तुलनेत जिल्ह्याला ३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ तसेच पाथरी तहसील कार्यालयाने २३ मार्च रोजी ४८ लाख ९ हजार १२० रुपयांचा निधी समर्पित केला होता़ शासनाकडून प्राप्त झालेले ३० कोटी आणि पाथरी तहसील कार्यालयाने समर्पित केलेले ४८ लाख ९ हजार १२० रुपये असे ३० कोटी ४८ लाख ९ हजार १२० रुपये जिल्हा प्रशासनाने त्या त्या तहसील कार्यालयाला मागणीनुसार वर्ग केले आहेत.