शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळ्यांची धूम; नियम धाब्यावर बसवून वऱ्हाडींचा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 14:36 IST

corona virus in Aurangabad : अजूनही लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी आहे. पण या नियमाचे कोणीच पालन करताना दिसत नाही.

ठळक मुद्देमंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार मनपा हद्दीत लहान मोठे ३०० मंगलकार्यालये, लॉन्स आहेत. गणेश जयंती व वसंत पंचमी या दोन दिवसांत ४००पेक्षा अधिक लग्न सोहळे पार पडले.

औरंगाबाद : गणेश जयंती व वसंतपंचमीला शहरात ४००पेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडले. कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर असतानाही पाचशे ते हजार वऱ्हाडी लग्नात सहभागी होत आहेत. सॅनिटायझर लावणे सोडाच पण मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग आदी सर्व नियम धाब्यावर बसवून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री सतत जनतेला आवाहन करत आहे. अजूनही लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी आहे. पण या नियमाचे कोणीच पालन करताना दिसत नाही. लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी शहरातील काही मंगल कार्यालये, लॉन्सची पाहणी केली. परवानगी ५० जणांची पण प्रत्यक्षात लग्नात ५०० ते १००० वऱ्हाडी जमल्याचे दिसून आले. कोरोनाची कोणालाच भीती दिसत नव्हती. सर्वच समारंभात १५ ते २० टक्के लोकांनीच मास्क लावल्याचे दिसले. सॅनिटायझरच्या बाटल्या नावालाच ठेवल्या होत्या. फिजिकल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडाला होता. शहराबाहेरील बीडबायपास, चिकलठाणा परिसरातील लॉन्स, मंगल कार्यालयात तर नियमाची ऐसी की तैशी करण्यात येत आहे. लग्नाला पूर्वीसारखी प्रचंड गर्दी होत आहे. शेकडो लोक पंगतीत बसत आहेत. मात्र, शहरात काही लग्न सोहळे यास अपवाद ठरले. लग्नाच्या वेगवेगळ्या विधीसाठी आमंत्रितांची विभागणी केल्याचे दिसून आले. मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार मनपा हद्दीत लहान मोठे ३०० मंगलकार्यालये, लॉन्स आहेत. गणेश जयंती व वसंत पंचमी या दोन दिवसांत ४००पेक्षा अधिक लग्न सोहळे पार पडले.

 

वऱ्हाडी ऐकत नाहीत

आम्ही मंगल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारवर सॅनिटायझर ठेवले आहे. अक्षदांसोबत प्रत्येकाला मास्क दिले जात आहे. पण वऱ्हाडी नियम पाळत नाहीत. आम्ही फलकही लावले, कर्मचारी नियम पाळण्याच्या सूचना देतात पण वऱ्हाडी ऐकत नाहीत.

- प्रशांत शेळके, अध्यक्ष, मंगल कार्यालय-लॉन्स असोसिएशन

 

शहरात पालन, पण...

शहरातील मंगलकार्यालयात मनपा व पोलिसांच्या धाकाने काही प्रमाणात नियम पाळले जात आहे, पण खुल्या मैदानावर, शहराबाहेरील लॉन्सवर नियम धाब्यावर बसविले जात आहेत. नियम पाळण्यासाठी असोसिएशने आवाहन केले आहे.

- विलास कोरडे, सचिव, मंगल कार्यालय-लॉन्स असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादmarriageलग्न