शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

बदलीसाठी बनवेगिरी करणाऱ्या शिक्षकांना अभय; औरंगाबाद जिल्हा परिषदेची कारवाईत दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 18:13 IST

खोट्या माहितीच्या आधारे सोयीच्या शाळेवर बदली करून घेणाऱ्या ८० शिक्षकांची जिल्हा परिषद प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी चौकशी पूर्ण केली.

ठळक मुद्देशिक्षकांनी खोटी माहिती भरून राज्यस्तरीय बदली कक्षाची दिशाभूल के ल्याच्या तक्रारी  प्राप्त झाल्या होत्या.प्रशासनाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली. त्यामध्ये बहुतांश शिक्षक दोषी आढळले; परंतु अद्याप एकाही शिक्षकाविरुद्ध कारवाई नाही.

औरंगाबाद : खोट्या माहितीच्या आधारे सोयीच्या शाळेवर बदली करून घेणाऱ्या ८० शिक्षकांची जिल्हा परिषद प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी चौकशी पूर्ण केली. त्यामध्ये बहुतांश शिक्षक दोषी आढळले; परंतु अद्याप एकाही शिक्षकाविरुद्ध कारवाई केलेली नाही.

सार्वत्रिक बदलीच्या वेळी आॅनलाईन नोंदणी करताना प्रामुख्याने संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये काही शिक्षकांनी खोटी माहिती भरून राज्यस्तरीय बदली कक्षाची दिशाभूल के ल्याच्या तक्रारी  प्राप्त झाल्या होत्या. प्रशासनाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली. तत्पूर्वी, सर्व तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तक्रारींची सत्यता पडताळण्यात आली. त्यामध्ये ८० शिक्षक संशयास्पद आढळून आले होते.  खोटी माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांमुळे २१५ एकल शिक्षिकांना दुर्गम व दूर अंतरावरील शाळांवर बदलीने पदस्थापना मिळाली आहे, तर २३५ पती-पत्नी शिक्षकांना विभक्त व्हावे लागले. त्यामुळे सध्या अनेक जण दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत.

२१ जून रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सिरसे यांच्या उपस्थितीत जि.प. सभागृहात शिक्षकांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल, सर्व गटशिक्षणाधिकारी,  विस्तार अधिकाऱ्यांनी आॅनलाईन नोंदणीच्या वेळी राज्यस्तरीय बदली कक्षाला सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली. दोषी शिक्षकांचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना सादर झाला.  

तथापि, बदलीच्या वेळी खोटी माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. दोषी शिक्षकांची एक वेतनवाढ बंद करावी. अशा शिक्षकांची बदली रद्द करून त्यांच्यामुळे विस्थापित शिक्षकांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्यांना पदस्थापना द्यावी व विस्थापित शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळांवर पुन्हा पदस्थापना द्यावी, असेही ग्रामविकास विभागाचे आदेश आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाच्या या आदेशांकडे जि.प.ने दुर्लक्ष केले आहे. 

आठवडा अखेर कारवाईयासंदर्भात शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, मेडिकल बोर्डाकडून ७-८ शिक्षकांनी आरोग्याचे प्रमाणपत्र जोडलेले होते. त्यांची सत्यता तपासणीसाठी ते बोर्डाकडे पाठविले आहे; पण त्यांच्याकडून अद्याप अहवाल आलेला नाही. दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांचीही काही प्रमाणपत्रे आहेत. त्यांचाही अहवाल आलेला नाही. फक्त जिल्हा आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झालेला आहे. या आठवडाअखेर अहवाल प्राप्त होतील. त्यानंतर लगेच कारवाई प्रस्तावित केली जाईल.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदTransferबदली